शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

मागील दुष्काळाची पुनरावृत्ती होईल का?

By admin | Updated: August 22, 2016 00:26 IST

कधी अस्मानी तर कधी सुलतानी निसर्गाच्या या अवकृपेमुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकरी हवालदिल : नैराश्याच्या गर्तेत शेतकरीविलास बन्सोड उसर्राकधी अस्मानी तर कधी सुलतानी निसर्गाच्या या अवकृपेमुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील सतत दोन वर्षापासून दुष्काळाचे चक्र सुरु आहे. तेव्हा यंदाही मागील दुष्काळाची पुनरावृत्ती होईल का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.सुरुवातीला वरुन राजाच्या उशिरा झालेल्या आगमनाने शेतकरी चिंतातूर होता. चातक पक्षाप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पाहत होता. अखेर मेघ बरसले व शेतकरी कामाला लागला. अशातच जास्त पाणी आल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे कुजून नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यानंतर मुख्य रोवणी झाल्यानंतर काही दिवसातच धान पिकाला लष्करी अळीमुळे धानपिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. उसर्रा परिसरातील उसर्रा, सालई (खुर्द), टाकला, बपेरा (आंबागड), टांगा, सालई (बुज), धोप, ताडगाव, सिहरी आदी भागात तर लष्करी अळीनी शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. यातच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांचे मन समाधान करुन काही उपाययोजना सुचविल्या, पण निसर्गाच्या या अवकृपेमुळे मात्र पूर्णत: आर्थिक संकटात सापडला आहे.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांनी कुणी सेवा सहकारी सोसायटी मधून, कुणी सहकारी पतसंस्थेकडून तर कुणी सोने गहाण करुन एवढेच नव्हे तर कुणी अ‍ैवध सावकारी व्यक्तीकडून कर्ज काढून शेती लागवड केली. पण यंदाही शेतकऱ्यांच्या हाती भातपिके भेटतात की नाही, अशी बिकट अवस्था सध्या शेतकऱ्यांना सर्व दूर दिसत आहे. शेतकरी संपूर्णत: नैराशेच्या गर्तेत सापडला असून मागील दोन वर्षापासून असलेले कर्ज कसे फेडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या शेतावर असलेले लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी आपल्या शेतीकडे पाठ फिरवत असतानाचे चित्र सर्वदूर दिसत आहे. शेती आतापासूनच कोरडी व्हायला लागली आहे.धान पिकासाठी पेंचचे पाणी सोडाभंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी धानाला सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परीषद सदस्य प्यारेलाल वाघमारे यांनी नागपूर विभागाचे पाटबंधारे व्यवस्थापन कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शेतकऱ्यांना धानासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी भंडारा सर्कलला सोडण्यात यावे, शेतकऱ्यांच्या निंदनासाठी तसेच लष्करी अळी धानावर लागल्यामुळे औषधी फवारणीकरीता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. काही प्रमाणात धानाची रोवणी अडकलेली आहेत. त्याकरीता पेंच प्रकल्पाचे पाणी त्वरीत सोडण्यात यावे, यामध्ये हत्तीडोई, मोहदुरा, जाख, गुंजेपार, नवेगाव, टवेपार, खुर्शीपार, पांढराबोडी, भोजापूर, केसलवाडा, शुक्रवारी तसेच सोनुली, दाभा, जमनी या गावातील शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे,अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्यारेलाल वाघमारे यांनी निवेदनातून दिला आहे.लष्करी अळीचा प्रादुर्भाव असून यावर कृषी विभागाकडून उपाययोजना व शेतकऱ्यांना भेटून सल्ला देण्याचे काम सुरु आहे. पंजाबराव कृषि विद्यापिठ यांनी सुचविलेल्या प्रमाणे डायक्लोरीवास औषघीची मागणी केली आहे.- किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी मोहाडी