शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम करीत राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:20 IST

केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पोकळ आश्वासने देऊन राजकारण केले जात आहे. कर्जमाफी योजना, नोटबंदी, जीएसटी यासह अन्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक ठरले आहेत.

ठळक मुद्देनाना पटोले : चारभट्टी येथील हनुमान मंदिर देवस्थानात हनुमान चालीसा पठन, महाप्रसाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पोकळ आश्वासने देऊन राजकारण केले जात आहे. कर्जमाफी योजना, नोटबंदी, जीएसटी यासह अन्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक ठरले आहेत. मागील वर्षी याच ठिकाणी ‘सरसकट कर्जमाफी न झाल्यास राजीनामा देऊन, जिथे जाणार तिथे लाईन लावणार’ असे बोललो होतो. आपण बोललेला शब्द खरा ठरला आहे. येणारा काळ आपला आहे. राजकारणापलीकडे शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम करणार आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.चारभट्टी/पुयार येथील हनुमान मंदिर देवस्थान येथे हनुमान चालीसा पठण व महाप्रसाद कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला खासदार मधुकर कुकडे, जिल्हा परीषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, स्वामी दिनेशानंद पाण्डेय, गोंदिया जिल्हा परीषद अध्यक्षा सीमा मडावी, सभापती मंगला बगमारे, सविता ब्राम्हणकर, विनोद पटोले, सीमा भुरे, राजू कारेमोरे, जेसा मोटवानी, चंद्रशेखर ठवरे, शेषराव गिरीपुंजे, रमेश पारधी, भारत खंडाईत, सरपंच निलेश नाकतोडे आदी उपस्थित होते.पटोले म्हणाले, भाजपा सरकारने दरवर्षी एक कोटी लोकांना रोजगार देण्याचे म्हटले होते. अजूनही रोजगाराची संधी उपलब्ध झालेली नाही. शेतकºयांच्या दीड पट हमी भाव आजपर्यत दिलेला नाही. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात पेटून उठले पाहिजेत. कोणत्याही कार्याची सुरवात या मंदिरातील पूजा आटोपून करत असतो. आपण या ठिकाणी जे बोलतो ते कृतीत उतरते असेही पटोले म्हणाले.खासदार मधुकर कुकडे म्हणाले, राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना भिकेला लावले असून, शेतकºयांना सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, यासाठी देवाने या सरकारला सदबुद्धी द्यावी. कार्यक्रमाच्या सुरवातीला हनुमान मंदिर देवस्थानात पूजा पाठ करून, हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. त्यानंतर गायक मनीष सोनी यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील चार ते पाच हजार लोक उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन रामचंद्र राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी अशोक चांडक, सुभाष खिलवानी यांच्यासह नाना पटोले मित्र परिवाराने सहकार्य केले.