शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम करीत राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:20 IST

केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पोकळ आश्वासने देऊन राजकारण केले जात आहे. कर्जमाफी योजना, नोटबंदी, जीएसटी यासह अन्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक ठरले आहेत.

ठळक मुद्देनाना पटोले : चारभट्टी येथील हनुमान मंदिर देवस्थानात हनुमान चालीसा पठन, महाप्रसाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पोकळ आश्वासने देऊन राजकारण केले जात आहे. कर्जमाफी योजना, नोटबंदी, जीएसटी यासह अन्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक ठरले आहेत. मागील वर्षी याच ठिकाणी ‘सरसकट कर्जमाफी न झाल्यास राजीनामा देऊन, जिथे जाणार तिथे लाईन लावणार’ असे बोललो होतो. आपण बोललेला शब्द खरा ठरला आहे. येणारा काळ आपला आहे. राजकारणापलीकडे शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम करणार आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.चारभट्टी/पुयार येथील हनुमान मंदिर देवस्थान येथे हनुमान चालीसा पठण व महाप्रसाद कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला खासदार मधुकर कुकडे, जिल्हा परीषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, स्वामी दिनेशानंद पाण्डेय, गोंदिया जिल्हा परीषद अध्यक्षा सीमा मडावी, सभापती मंगला बगमारे, सविता ब्राम्हणकर, विनोद पटोले, सीमा भुरे, राजू कारेमोरे, जेसा मोटवानी, चंद्रशेखर ठवरे, शेषराव गिरीपुंजे, रमेश पारधी, भारत खंडाईत, सरपंच निलेश नाकतोडे आदी उपस्थित होते.पटोले म्हणाले, भाजपा सरकारने दरवर्षी एक कोटी लोकांना रोजगार देण्याचे म्हटले होते. अजूनही रोजगाराची संधी उपलब्ध झालेली नाही. शेतकºयांच्या दीड पट हमी भाव आजपर्यत दिलेला नाही. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात पेटून उठले पाहिजेत. कोणत्याही कार्याची सुरवात या मंदिरातील पूजा आटोपून करत असतो. आपण या ठिकाणी जे बोलतो ते कृतीत उतरते असेही पटोले म्हणाले.खासदार मधुकर कुकडे म्हणाले, राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना भिकेला लावले असून, शेतकºयांना सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, यासाठी देवाने या सरकारला सदबुद्धी द्यावी. कार्यक्रमाच्या सुरवातीला हनुमान मंदिर देवस्थानात पूजा पाठ करून, हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. त्यानंतर गायक मनीष सोनी यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील चार ते पाच हजार लोक उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन रामचंद्र राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी अशोक चांडक, सुभाष खिलवानी यांच्यासह नाना पटोले मित्र परिवाराने सहकार्य केले.