शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:03 IST

जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची दाहकता वाढली असून त्याचा सर्वात जास्त परिणाम वन्यप्राण्यांवर होत असून पाण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर फिरत आहेत. जंगलातील पाणवठे चार महिन्यांपुर्वीच आटल्याने अनेक वन्यजीव पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसत आहेत. त्यातच अलीकडे बिबट्याने हल्ला केलेल्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक पाणवठे आटले : वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची दाहकता वाढली असून त्याचा सर्वात जास्त परिणाम वन्यप्राण्यांवर होत असून पाण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर फिरत आहेत. जंगलातील पाणवठे चार महिन्यांपुर्वीच आटल्याने अनेक वन्यजीव पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसत आहेत. त्यातच अलीकडे बिबट्याने हल्ला केलेल्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.वन्यजीवांचा अभयारण्य शेजारी बफरझोनमध्ये तसेच पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर अनेक वन्यप्राणी एकत्र जमत असल्याने हिच ठिकाणे शिकाऱ्यांसाठी मोक्याचे ठरत आहेत. प्राणी चारा व पाण्याच्या शोधात शेतशिवारात व गावरस्त्यांकडे धुमाकूळ घालत असून वनविभागानी सजगता दाखविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्य प्राण्यांच्या विविधतेने समृध्द आहे. तृणभक्ष्य प्राण्याबरोबर हिंस्त्र प्राण्यांची संख्या ही जास्त असल्याने येथे कृत्रीम पाणवठे तयार करण्याची गरज आहे.परंतु वनविभाग डोळे झाक करीत असून जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वनविभागाची अत्यंत महत्वाची भुमिका आहे. ऐन उन्हाळ्याच्या पर्वावर प्राण्यांची भटकंती चिंताजनक ठरत आहे. पाणवठ्यावरील प्राण्यांची शिकार होण्याची शक्यता बळावली आहे. अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांच्या त्रासांमुळे शेतकरीही विद्युत करंटने प्राण्यांना मारल्याच्या घटना घडल्या आहेत.कोका अभयारण्याला लागून भंडारा, मोहाडी, लाखनी, साकोली तालुक्याच्या सीमा असून येथे मोठी वनसंपदा आहे.प्राण्यांचा रहिवास येथे कायम असल्याने अनेक ठिकाणी पाणवठे तयार करण्याची गरज वाढली आहे. परंतू जिल्हा प्रशासन देखील जैवविविधते संदर्भात ठोस उपाययोजना राबवित नसल्याने प्राण्यांचा अधिवास धोक्यात येत आहे.त्यामुळे चारही बाजुला वन्यजीवांचा बफर झोन परिसरात रहिवासी दिसून येतो. पाण्याच्या शोधात असलेले हरिण, रानडुकर, निलगाय हे गोसेखुर्दच्या खोल नहरात पडल्याने जखमी झाल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले असून जलाशयात असलेला जलसाठा अल्प आहे. त्यामुळे वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती दिवसेंदिवस वाढते आहे.वनांच्या आगीवर नियंत्रण आवश्यकदरवर्षीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे जिल्ह्यात वणवा लागता असल्याने अत्यंत दुर्मिळ असणाºया वनस्पतींसह प्राण्यांना धोका पोहचत आहे. तरी देखील वनविभागाकडून गावोगावी जनजागृती केली जात नाही. ग्रामस्तरावर असणाऱ्या वनसमित्या या फक्त केवळ नावालाच आहेत. त्यांच्याकडूनही कोणतीही विचारपूस अथवा वनकर्मचाऱ्यांवर कोणताही वचक राहिलेला दिसून येत नाही. अनेक गावात तर गावासाठी असणारा वनरक्षक गावकऱ्यांना परिचीत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी जनजागृतीची गरज आहे.