शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

सुकळीत रानडुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

सिहोरा परिसरात सातपुडापर्वत रांगांचे जंगल आहे. जंगलात मुक्तसंचार करणारे वन्यप्राणी गावाचे दिशेने धाव घेत आहे. वैनगंगा नदीच्या काठावरील सुकळी (नकुल) गावांचे शेतशिवारात सचिन रहांगडाले या युवा शेतकऱ्यांचे दोन एकर शेती आहे. त्यांनी शेतशिवारात धान पुंजणे तयार केलेले आहे. संपूर्ण पुंजण्यांची नासधुस रानडुकरांनी केली आहे.

ठळक मुद्देधान पुंजण्याचे प्रचंड नुकसान : आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या सुकळी (नकुल) गावाच्या शेतशिवारात असलेल्या धान पुंजण्याची प्रचंड नासाडी रानडुकरांनी केली आहे. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी आहे.सिहोरा परिसरात सातपुडापर्वत रांगांचे जंगल आहे. जंगलात मुक्तसंचार करणारे वन्यप्राणी गावाचे दिशेने धाव घेत आहे. वैनगंगा नदीच्या काठावरील सुकळी (नकुल) गावांचे शेतशिवारात सचिन रहांगडाले या युवा शेतकऱ्यांचे दोन एकर शेती आहे. त्यांनी शेतशिवारात धान पुंजणे तयार केलेले आहे. संपूर्ण पुंजण्यांची नासधुस रानडुकरांनी केली आहे. यामुळे त्यांनी घरात अन्नाचा एक दानाही आणला नाही. या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकरी सचिन यांनी बपेरा वन विभाग कार्यालयात माहिती दिली. कार्यरत कर्मचाऱ्यांनी त्यांना आवश्यक दस्तावेज तयार करण्याकरिता सांगितले. तथा नुकसानीचा पंचनामा करणार असल्याची माहिती दिली. परंतु आठवडाभराचा कालावधी लोटला असताना तीन किमी अंतरावर असणारे कर्मचारी शेतशिवारात पोहचले नाहीत. यानंतर सचिन रहांगडाले यांनी तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय गाठले. कार्यालयात असणाºया कर्मचाऱ्यांना त्यांनी नासाडीचे फोटो दाखविले तथा मदत कार्यात सहकार्य सांगितले. परंतु असहकार्याची भूमिका कर्मचाºयांनी घेतली.या शिवाय धान पुंजणे नासाडीची मदत शासनाकडून मिळत नाही, असे सांगण्यात आले. यामुळे शेतकरी नाराज झाले आहे. ओला दुष्काळाचा अनुभव घेत असताना शेतकरी शेतशिवारात अन्न धान्य बचावासाठी प्रयत्न करित आहे. या अन्नधान्याची नासाडी वन्यप्राणी करित असल्याने शेतकऱ्याची आता जगण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. नुकसानग्रस्त मदतीच्या नावावर वन विभागाची यंत्रणा हात झटकत आहे. धान पुंजण्याना आर्थिक मदत नियमात नसेल तर लोकसभेत तसा मदतीचा कायदा पारित करण्यात येत नाही. यामुळे शेतकरी नुकसान सोसत आहे. वन विभागाची यंत्रणा मदतीकरिता उदासिन दिसून येत आहे.धान पुंजण्यांचे नुकसान रानडुकरांनी केले असताना वन विभागाची यंत्रणा असहकार्याची भूमिका घेत आहे.-संजय रहांगडाले, नुकसानग्रस्त शेतकरी, सुकळी नकुल.

टॅग्स :agricultureशेती