शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रानटी डुकरांच्या उपद्रवाने शेत पिकाचे सुमार नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

शेतकरी हतबल पालांदूर : रानडुकरांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांना चिंतेचा विषय ठरलेला आहे. कालपर्यंत हरभऱ्याची सुमार नुकसान केलेल्या रानटी डुकरांनी ...

शेतकरी हतबल

पालांदूर : रानडुकरांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांना चिंतेचा विषय ठरलेला आहे. कालपर्यंत हरभऱ्याची सुमार नुकसान केलेल्या रानटी डुकरांनी आता आपला मोर्चा गर्भावस्थेत असलेल्या धान पिकावर वळवलेला आहे. डोळ्यादेखत होत असलेले नुकसान शेतकऱ्यांना हतबल करीत आहे.

पालांदूर परिसरात नदी-नाले व झुडपी जंगलांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. रानटी डुकरांच्या नैसर्गिक अधिवासासाठी हे ठिकाण खूप मोठे वरदान ठरले आहे. दिवसाला या ठिकाणी विश्रांती घेऊन रात्रीला सैन्यासारखे पिकावर तुटून पडतात. रात्रीच्या अंधारात बेधुंद होत पिकांची सुमार नुकसान करतात. शेतकऱ्यांना यांचा बंदोबस्त करताना कायद्याच्या आडकाठी तयार झाल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज झाला आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतात हल्ली धान पिकाव्यतिरिक्त इतर दुसरे पीक दुर्लभ आहे. त्यामुळे रानटी डुक्कर उन्हाच्या झळा सहन करण्याच्या अनुषंगाने धानाच्या चिखलात स्वताला लोटून घेतात. त्यामुळे गर्भावस्थेत असलेले पीक जमीनदोस्त होत आहेत. काही ठिकाणी धान पिकाला कात्री प्रमाणे कापलेही आहेत. रात्रीच्या अंधारात शेतावर पंप सुरू करायला जावेच लागते. तेव्हा हे सगळे चित्र डोळ्यासमोर येऊनही शेतकरी भीतिपोटी काही करू शकत नाही. वनविभागाने पुढाकार घेत, यातून शेतकरी वर्गाला काहीतरी मार्ग दाखवावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.

चुलबंद खोरा सदाबहार आहे.

नदी-नाल्यांचा आसरा असल्याने वर्षभर रानटी डुकरांचा या परिसरात हक्काचा मुक्काम आहे. खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तीनही हंगामात रानडुकरांचा उपद्रव शेतकरी वर्गाला सहन करावा लागतो. रानटी डुकरांचे जत्थेच्या जत्थे रात्रीच्या अंधारात बघायला मिळतात. त्यांचा बंदोबस्त करणे कठीण नाही, परंतु वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये हात बांधले असल्याने शेतकरी राजा निरुपाय ठरला आहे.

सुमारे पाच एकर शेतात हरबऱ्याचे पीक जोमात आले होते. फळधारणा होईपर्यंत अपेक्षित डुकरांचा त्रास नव्हता. मात्र, हरबऱ्याने घेंगरे पकडल्यानंतर रानटी डुक्कर यांचा उपद्रव असह्य ठरला. सुमारे चाळीस पोती अपेक्षित असणारा हरभरा केवळ १४ पोती एवढाच झाला. आता धान पिकाचेही नुकसान करीत आहेत. वनविभागाकडे मागणी करूनही अत्यल्प मिळत असल्याने व कागदोपत्री समस्या मोठी असल्याने दाद मागितली नाही.

- प्रभाकर कडूकार,

नुकसानग्रस्त (बारमाही) शेतकरी पालांदूर.