शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गळा आवळून पत्नीचा खून

By admin | Updated: August 19, 2015 00:57 IST

मुलांना क्रूर वागणूक देत असल्याच्या संशयावरून पत्नीशी नेहमी खटके उडायचे. त्यावरुन पती-पत्नीत वाद झाला.

भंडारा : मुलांना क्रूर वागणूक देत असल्याच्या संशयावरून पत्नीशी नेहमी खटके उडायचे. त्यावरुन पती-पत्नीत वाद झाला. संतापाच्या भरात पत्नीला मारहाण केली. एवढ्यावर न थांबला त्याने तोंड दाबून तिचा गळा आवळला यात तिचा मृत्यू झाला. ही घटना पवनी तालुक्यातील वळद येथे सोमवारी रात्री घडली.बबिता हरिदास दुधपचारे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. हरिदास इस्तारी दुधपचारे (३६) असे आरोपी पतीचे नाव आहे. अड्याळ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वळद पुनर्वसन येथील हरिदास दुधपचारे याला पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये आहेत. त्याचा दुसरा विवाह बबीता हिच्याशी झाला असून तिच्यापासून एक वर्षाचा मुलगा आहे. दोन पत्नीच्या संसारात त्याला चार अपत्ये असल्याने पहिल्या पत्नीच्या तीन अपत्यांना बबीता चांगली वागणूक देत नाही, असा संशय घेत होता. तिन्ही मुलांची देखरेख न करता त्यांच्या खाण्यापिण्याकडे बबीता दुर्लक्ष करीत असल्याच्या संशयावरून त्या दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. यातून वाद व्हायचा. वादानंतर मारहाण करायचा. दरम्यान याच कारणावरुन सोमवारला दुपारी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने संतप्त हरिदासने बबीताला काठीने मारहाण केली. मारहाणीत जमिनीवर कोसळल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतरही त्याने तिला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने तोंड दाबून बबिताचा गळा आवळला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर त्याने मृतदेह घरातच दडवून ठेवला. मेंदूच्या झिणझिण्या आणणाऱ्या या घटनेनंतर हरिदासने चारही मुलांची आंघोळ करून दिली. घटनेची माहिती होताच पोलीस पाटील नत्थू दुधपचारे यांनी अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार ए. के. नेवारे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी हरिदासविरूध्द भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. तपास ठाणेदार नेवारे करीत आहे. (शहर प्रतिनिधी)