शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

हेल्मेट वापरण्याला तरुणींचा नकार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:44 IST

सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन चालवताना हेल्मेट वापरणे फारच गरजेचे आहे. परंतु आजही अनेकांना हेल्मेट हे ओझेच वाटते. तरुणीच्या बाबतीत विचारले तर त्यांना हेल्मेट अगदीच नको असते.

ठळक मुद्देदुचाकी सुसाट : पण हेल्मेटचा मात्र कंटाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन चालवताना हेल्मेट वापरणे फारच गरजेचे आहे. परंतु आजही अनेकांना हेल्मेट हे ओझेच वाटते. तरुणीच्या बाबतीत विचारले तर त्यांना हेल्मेट अगदीच नको असते. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. त्याचा दुचाकीवरचा वावरही वाढला आहे. पंरतु शहरातील वाहतूक दिवसेंदिवस धोकादायक होत असताना सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे सोडून तरुणीनी हेल्मेटलाच नाकारले आहे. याबाबत शहराचा अभ्यास केला असता पुरुषाच्या तुलनेत फारच कमी महिला वा तरुणी हेल्मेट वापरत असल्याचे निदर्शनास आले.म्हणे, सोबत बाळगायला त्रास जातो!आजच्या धकाधकीच्या जीवनात शहरी संस्कृतीमध्ये बरची कामे ही वाटून घेतली जातात. नोकरी करणाऱ्या स्त्रिया तर गाडी चालवतातच पण नोकरी न करणाºया स्त्रियादेखील अनेक कारणामुळे गाडी चालवताना आपण नेहमीच पाहतो. मग गाडी टू व्हीलर असो वा फोर व्हीलर... महिलाच गाडी चालविण्याचे प्रमाण पुरुषाप्रमाणेच वाढत आहे. पण तुलानात्मकदृष्ट्या गाडी चालवतान महिला या पुरुषापेक्षा कमी प्रमाणात हेल्मेट वापरतात. पण, त्याचा वेग मात्र कुठेही कमी नसतो, अशा स्थितीत अपघात घडल्यास मोठी इजा होऊ शकते. हेल्मेट हे वापरायला व बाळगायला सोपे नसते, हे अगदी मान्य परंतु या एका कारणामुळे हेल्मेट नाकारुन स्वत:चा जीव धोक्यात टाकणे हे शहानपणाचे लक्षण अजिबात नाही. याबाबत सदर प्रतिनिधीने शहरातील तरुणीच्या प्रतिक्रया घेतल्या तेव्हा त्यानीही हेल्मेटचे महत्व मान्य केले पण, कॉलेज, शिकवाणी वर्गास जायचे असल्यास हेल्मेट सोबत घेऊन फिरायला त्रास होत असल्याचे सांगितले.वाहन चालविताना हेल्मेट वापरणे गरजेचेखरतर प्रत्येकाचा जीव हा त्याला महत्त्वाचा वाटत असतो, मग ती महिला असो वा पुरुष, म्हणूनच गाडी चालवताना हेल्मेट हे वापरायलाच हवे. याबाबत महिलांना विचारले असता त्याविषयीची एवढी जागरुकता नाही, हेल्मेट ठेवायला आणि वापरायला संकोच वाटतो, असे अनेक महिलांचे म्हणणे आहे.अनेक वेळा गाडी चालवून झाल्यावर हेल्मेट ठेवायचे कुठे, हा प्रश्नच पडतो. पण कारणे काहीही असोत गाडी चालवताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे, हे कुणीच विसरता कामा नये. हेल्मेट हे वाहन चालकाना अपघातापासून बचावात्मक सुरक्षा प्रदान करते. त्यामुळे हेल्मेटचे महत्त्व आहे.विविध क्षेत्रात महिला कार्यरत असून देखील त्यांना हेल्मेट वापरणे योग्य वाटत नाही, जोपर्यंत स्वत:च्या मनातून हेल्मेट न वापरण्याचा विचार जात नाही. तोपर्यंत आपण हेल्मेट घालूच शकत नाही. त्यामुळे हेल्मेटची सक्ती करण्यापेक्षा स्वत:च स्वत:ला सक्ती करणे आवश्यक आहे.-यशोधरा वासनिक, भंडारामी हेल्मेट वापरते, कारण मला गाडी चालवताना हेल्मेट घातल्यामुळे सुरक्षित वाटते, जर माझे नातेवाईक हेल्मेट वापरुन गाडी चालवू शकतात. तर मी देखील चालवू शकते. महिलांनी हेल्मेट घालून गाडी चालवल्यास अ‍ॅक्सिडेंटच्या त्रासातून आणि वेदनातून वाचता येऊ शकते.-पूनम शाहू, लाखनी