शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अख्खे घर आगीच्या भक्ष्यस्थानी

By admin | Updated: May 13, 2016 00:26 IST

स्थानिक बजरंग वॉर्डातील रहिवासी व व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नानाजी बावणकर यांचे राहते घरी असलेल्या ...

जीवितहानी टळली : १० ते १५ लाखाचे नुकसानपवनी : स्थानिक बजरंग वॉर्डातील रहिवासी व व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नानाजी बावणकर यांचे राहते घरी असलेल्या प्लॉस्टिक पिशव्या बनविण्याच्या लघु उद्योग केंद्रास रात्री २ वाजताचे सुमारास आग लागली. यात घरातील प्रत्येक वस्तु जळून खाक झाली. लागलेल्या आगीमुळे १० ते १५ लक्ष रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. घर कुलूपबंद असल्याने जीवितहानी टळली.नानाजी बावनकर हे परिवारासह नागपूर येथील नातेवाईकांकडे स्वागत समारंभासाठी गेलेले असल्याने नागपूर येथे मुक्कामाला होते. घराला कुलूप लावलेले होते. रात्री दोनच्या सुमारास रस्त्याचे बाजूला घर असलेल्या भांडारकर कुटूंबातील महिलेला स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला म्हणून घराच्या दिशेने पाहिले असता आगीच्या ज्वाळा खिडकी व दारातून बाहेर पडत होत्या. तिने कुटूंबियांना जागवून घटनेची माहिती दिली. आरडाओरड केली असता शेजारचे सर्व कुटूंब जागे झाले. लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून तीन तासात आग आटोक्यात आणली. मोटारपंप व बोअरवेलचे पाणी टाकून नागरिकांनी आग विझविली परंतू त्यादरम्यान घरातील सोफा, दिवान, एलसीडी टीव्ही, कपाट व कपाटातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. घराचे रस्त्याकडील बाजूचे खोलीत प्लॉस्टिक पिशव्या बारदाना शिवण्याचा लघुउद्योग त्यांचा मुलगा अतुल बावनकर यांनी सुरू केलेला होता. त्यामधील मशीनस व कच्चा माल जळून खाक झाला. आता एवढी जबरदस्त होती की घरात लागलेल्या सिलिंग फॅनचे पाते वितळून वाकलेले आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर पोहचून आग आटोक्यात आणण्यास नागरिकांना मदत केली. सुदैवाने आगीच्या ज्वाळा स्वयंपाकगृहापर्यंत पोहचल्या नाही त्यामुळे गॅस सिलिंडर सुरक्षित राहीला त्यामुळे बजूच्या खोलीत झोपलेल्या त्यांचे पुतणे व त्यांचा परिवार सुरक्षित राहिला. (तालुका प्रतिनिधी)न.प. चे अग्निशमन वाहन कुचकामीगेल्या तीन वर्षापासून न.प. ने अग्नीशमन वाहने खरेदी केलेले आहे. त्यावर २० लक्ष रूपये व ते ठेवण्यासाठी बांधलेल्या इमारतीवर ३० लक्ष रूपये खर्च केले. परंतू वाहन चालक नियुक्त न झाल्याने वाहन धुळखात पडलेले आहे. अग्नीशमन वाहनाची आग विझविण्यासाठी मदत होवू शकली नाही. त्यामुळे पवनीकरांनी नगर पालिका प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला आहे. आतातरी पालिका प्रशासनाची झोप उघडणार काय, असा प्रश्न जळालेले घर पाहताना जमलेले नागरिक विचारत होते. बावनकर कुटूंबियावर फार मोठे संकट कोसळले असल्याने शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.