शहरं
Join us  
Trending Stories
1
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
2
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
3
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
8
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
11
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
13
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
14
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
15
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

अख्खे घर आगीच्या भक्ष्यस्थानी

By admin | Updated: May 13, 2016 00:26 IST

स्थानिक बजरंग वॉर्डातील रहिवासी व व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नानाजी बावणकर यांचे राहते घरी असलेल्या ...

जीवितहानी टळली : १० ते १५ लाखाचे नुकसानपवनी : स्थानिक बजरंग वॉर्डातील रहिवासी व व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नानाजी बावणकर यांचे राहते घरी असलेल्या प्लॉस्टिक पिशव्या बनविण्याच्या लघु उद्योग केंद्रास रात्री २ वाजताचे सुमारास आग लागली. यात घरातील प्रत्येक वस्तु जळून खाक झाली. लागलेल्या आगीमुळे १० ते १५ लक्ष रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. घर कुलूपबंद असल्याने जीवितहानी टळली.नानाजी बावनकर हे परिवारासह नागपूर येथील नातेवाईकांकडे स्वागत समारंभासाठी गेलेले असल्याने नागपूर येथे मुक्कामाला होते. घराला कुलूप लावलेले होते. रात्री दोनच्या सुमारास रस्त्याचे बाजूला घर असलेल्या भांडारकर कुटूंबातील महिलेला स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला म्हणून घराच्या दिशेने पाहिले असता आगीच्या ज्वाळा खिडकी व दारातून बाहेर पडत होत्या. तिने कुटूंबियांना जागवून घटनेची माहिती दिली. आरडाओरड केली असता शेजारचे सर्व कुटूंब जागे झाले. लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून तीन तासात आग आटोक्यात आणली. मोटारपंप व बोअरवेलचे पाणी टाकून नागरिकांनी आग विझविली परंतू त्यादरम्यान घरातील सोफा, दिवान, एलसीडी टीव्ही, कपाट व कपाटातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. घराचे रस्त्याकडील बाजूचे खोलीत प्लॉस्टिक पिशव्या बारदाना शिवण्याचा लघुउद्योग त्यांचा मुलगा अतुल बावनकर यांनी सुरू केलेला होता. त्यामधील मशीनस व कच्चा माल जळून खाक झाला. आता एवढी जबरदस्त होती की घरात लागलेल्या सिलिंग फॅनचे पाते वितळून वाकलेले आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर पोहचून आग आटोक्यात आणण्यास नागरिकांना मदत केली. सुदैवाने आगीच्या ज्वाळा स्वयंपाकगृहापर्यंत पोहचल्या नाही त्यामुळे गॅस सिलिंडर सुरक्षित राहीला त्यामुळे बजूच्या खोलीत झोपलेल्या त्यांचे पुतणे व त्यांचा परिवार सुरक्षित राहिला. (तालुका प्रतिनिधी)न.प. चे अग्निशमन वाहन कुचकामीगेल्या तीन वर्षापासून न.प. ने अग्नीशमन वाहने खरेदी केलेले आहे. त्यावर २० लक्ष रूपये व ते ठेवण्यासाठी बांधलेल्या इमारतीवर ३० लक्ष रूपये खर्च केले. परंतू वाहन चालक नियुक्त न झाल्याने वाहन धुळखात पडलेले आहे. अग्नीशमन वाहनाची आग विझविण्यासाठी मदत होवू शकली नाही. त्यामुळे पवनीकरांनी नगर पालिका प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला आहे. आतातरी पालिका प्रशासनाची झोप उघडणार काय, असा प्रश्न जळालेले घर पाहताना जमलेले नागरिक विचारत होते. बावनकर कुटूंबियावर फार मोठे संकट कोसळले असल्याने शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.