शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

अख्खे घर आगीच्या भक्ष्यस्थानी

By admin | Updated: May 13, 2016 00:26 IST

स्थानिक बजरंग वॉर्डातील रहिवासी व व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नानाजी बावणकर यांचे राहते घरी असलेल्या ...

जीवितहानी टळली : १० ते १५ लाखाचे नुकसानपवनी : स्थानिक बजरंग वॉर्डातील रहिवासी व व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नानाजी बावणकर यांचे राहते घरी असलेल्या प्लॉस्टिक पिशव्या बनविण्याच्या लघु उद्योग केंद्रास रात्री २ वाजताचे सुमारास आग लागली. यात घरातील प्रत्येक वस्तु जळून खाक झाली. लागलेल्या आगीमुळे १० ते १५ लक्ष रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. घर कुलूपबंद असल्याने जीवितहानी टळली.नानाजी बावनकर हे परिवारासह नागपूर येथील नातेवाईकांकडे स्वागत समारंभासाठी गेलेले असल्याने नागपूर येथे मुक्कामाला होते. घराला कुलूप लावलेले होते. रात्री दोनच्या सुमारास रस्त्याचे बाजूला घर असलेल्या भांडारकर कुटूंबातील महिलेला स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला म्हणून घराच्या दिशेने पाहिले असता आगीच्या ज्वाळा खिडकी व दारातून बाहेर पडत होत्या. तिने कुटूंबियांना जागवून घटनेची माहिती दिली. आरडाओरड केली असता शेजारचे सर्व कुटूंब जागे झाले. लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून तीन तासात आग आटोक्यात आणली. मोटारपंप व बोअरवेलचे पाणी टाकून नागरिकांनी आग विझविली परंतू त्यादरम्यान घरातील सोफा, दिवान, एलसीडी टीव्ही, कपाट व कपाटातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. घराचे रस्त्याकडील बाजूचे खोलीत प्लॉस्टिक पिशव्या बारदाना शिवण्याचा लघुउद्योग त्यांचा मुलगा अतुल बावनकर यांनी सुरू केलेला होता. त्यामधील मशीनस व कच्चा माल जळून खाक झाला. आता एवढी जबरदस्त होती की घरात लागलेल्या सिलिंग फॅनचे पाते वितळून वाकलेले आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर पोहचून आग आटोक्यात आणण्यास नागरिकांना मदत केली. सुदैवाने आगीच्या ज्वाळा स्वयंपाकगृहापर्यंत पोहचल्या नाही त्यामुळे गॅस सिलिंडर सुरक्षित राहीला त्यामुळे बजूच्या खोलीत झोपलेल्या त्यांचे पुतणे व त्यांचा परिवार सुरक्षित राहिला. (तालुका प्रतिनिधी)न.प. चे अग्निशमन वाहन कुचकामीगेल्या तीन वर्षापासून न.प. ने अग्नीशमन वाहने खरेदी केलेले आहे. त्यावर २० लक्ष रूपये व ते ठेवण्यासाठी बांधलेल्या इमारतीवर ३० लक्ष रूपये खर्च केले. परंतू वाहन चालक नियुक्त न झाल्याने वाहन धुळखात पडलेले आहे. अग्नीशमन वाहनाची आग विझविण्यासाठी मदत होवू शकली नाही. त्यामुळे पवनीकरांनी नगर पालिका प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला आहे. आतातरी पालिका प्रशासनाची झोप उघडणार काय, असा प्रश्न जळालेले घर पाहताना जमलेले नागरिक विचारत होते. बावनकर कुटूंबियावर फार मोठे संकट कोसळले असल्याने शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.