शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताचे ‘ते’ डाग कुणी लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:04 IST

२४ जूनला सायंकाळी ६ वाजता आशिष चौरे हा मद्यप्राशन करून माझ्या कार्यालयात येऊन धिंगाणा घालू लागला. त्यामुळे मी स्वत: तुमसरच्या पोलीस निरीक्षकांना बोलावले. पोलिसांनी त्याला घेऊन गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंकज कारेमोरेच्या कार्यालयात पत्रपरिषद घेतली. त्यावेळी त्याच्या टी-शर्टवर रक्ताचे डाग होते. कोणतीही मारहाण केली नसताना रक्ताचे डाग लावून मला गोवण्यात येत आहे.

ठळक मुद्देचरण वाघमारे : मला गोवण्याचे षडयंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : २४ जूनला सायंकाळी ६ वाजता आशिष चौरे हा मद्यप्राशन करून माझ्या कार्यालयात येऊन धिंगाणा घालू लागला. त्यामुळे मी स्वत: तुमसरच्या पोलीस निरीक्षकांना बोलावले. पोलिसांनी त्याला घेऊन गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंकज कारेमोरेच्या कार्यालयात पत्रपरिषद घेतली. त्यावेळी त्याच्या टी-शर्टवर रक्ताचे डाग होते. कोणतीही मारहाण केली नसताना रक्ताचे डाग लावून मला गोवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रपरिषदेत केली.यावेळी ते म्हणाले, माझ्या कार्यालयात चौरे यांना कुणीही मारहाण केली नाही. पोलिसांनी त्याला घेऊन गेल्यानंतर तो प्रकृती बरी वाटत नसल्याचे सांगितल्यामुळे त्याला उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार करून डिस्चार्ज देण्यात आले. त्यानंतर त्याला भंडारा जिल्हा रूग्णालयात पाठविले. दुसऱ्या दिवशी २५ जूनला दुपारी १२ वाजता आशिष चौरे भंडारा रूग्णालयातून तुमसरला जाण्यासाठी निघाला. त्यानंतर ३ वाजेच्या सुमारास पंकज कारेमोरेच्या कार्यालयात पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेत टी-शर्ट रक्ताने माखल्याचे दिसून आले. पत्रपरिषद संपल्यानंतर तो कुठे गेला, त्या रात्री कुठे होता, पत्रपरिषदेसाठी भंडारा रूग्णालयातून तुमसरात कुणाच्या परवानगीने आला. डॉक्टरांनी त्याला जाताना नोंदी घेतल्या का? २६ जूनला चौरेला पाहण्यासाठी माजी खासदार नाना पटोले गेले त्यावेळी तो रूग्णालयात होता. यासर्व प्रकरणात मला गोवण्यात येत असल्याचा आरोपही आ.वाघमारे यांनी केला.पोलिसांनी त्याला नेले त्यावेळी त्याला जखमा होत्या का? दुसऱ्या दिवशी त्याच्या टी-शर्टवर रक्त कुठून आले, ते रक्त कुणी लावले, याचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी करून ती टी-शर्ट फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून त्यातील सत्यता बाहेर यावी, अशी मागणीही त्यांनी केली.त्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई कराछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कल्याण योजने अंतर्गत ज्या शेतकºयांच्या खात्यात अद्यापपर्यंत पैसे जमा झालेले नाही. अशा शेतकऱ्यांना बँकेचे अधिकारी त्रास देत आहेत. त्यांच्याकडून कोणीही सक्तीची वसुली करू नये, असे शासनाचे निर्देश असतानाही बँकेचे अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शेतकºयांना त्रास देणाऱ्या बँकेच्या अशा अधिकाºयांविरूद्ध कारवाई करण्याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे आ.वाघमारे यांनी सांगितले.