शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पैसे घेणारे ‘ते’ अधिकारी कोण?

By admin | Updated: March 11, 2017 00:24 IST

रेतीघाटांचे लिलाव झाले असले तरी पैशाच्या भरोश्यावर साकोली तालुक्यात रेतीचा अवैध गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे.

प्रकरण रेती तस्करीचे : वरिष्ठांची बघ्याची भूमिका!साकोली : रेतीघाटांचे लिलाव झाले असले तरी पैशाच्या भरोश्यावर साकोली तालुक्यात रेतीचा अवैध गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. शासनाला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र पोलीस विभागातील ‘एक’ अधिकारी रेतीमाफीयांकडून हप्ता घेत असून त्या रात्री दरम्यान रेतीची अवैध वाहतुक सुरु असल्याची चर्चा आहे.साकोली तालुक्यात फक्त तीन रेतीघाटांचा लिलाव झाला असून इतर तीन रेतीघाटांचा लिलाव झाला नाही. ज्या रेतीघाटचा लिलाव झाला आहे त्या रेतीघाटावर रॉयल्टीची किंमत एक हजार रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे एक हजार रुपये जास्त घेतात. या कारणावरुन रेतीतस्कर रेतीघाटावरुन रेती आणण्याऐवजी अवैध मार्गाने रात्री रेतीची चोरी करतात. व स्तस्त दराने रेती विकतात. यात ग्राहकांचा जरी फायदा झाला तरी शासनाचा कोट्यवधींचा महसुल बुडत आहे.महसुल विभागाचे अधिकारी हे फक्त दिवसाच फिरत असतात तेही पहाटे पाच ते सकाळी दहा वाजेपर्यंत नंतर तलाठी, मंडळ अधिकारी व तहसिलदार आपआपल्या कार्यालयात जाऊन बसतात. सायंकाळी बरेच तलाठी मुख्यालयी न राहता बाहेरगावाहून ये-जा करतात. त्यामुळे रात्री महसुल विभागाचे एकही अधिकारी रेती तस्करी थांबविण्यास असमर्थ ठरले आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष आहे.रात्री गस्तीवर पोलीस असतात. पोलिसानी आपल्याला पकडू नये या भितीमुळे काही रेती तस्करांनी पोलिसांना आपल्या मर्जीत आणले आहे. एवढेच नाही तर एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने हप्ता वसुली निश्चित करण्यात आली असून ज्यांच्याकडून हप्ता जात आहे. त्या रेतीतस्करांचा ट्रॅक्टरला पकडलाच जात नाही. एखाद्या पोलिसाचे हे ट्रॅक्टर पकडल्यास त्याला कार्यवाही न करता ट्रॅक्टर सोडण्याचे आदेश देण्यात येते अशीही चर्चा खुद्द पोलिस कर्मचाऱ्यांकडून ऐकीवात आहे तर काही पोलीस कर्मचारीच याची तक्रार वरिष्ठांना करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांकडे तक्रारसाकोली तालुक्यातील या अवैध रेती तस्करीची व अवैध हप्ता वसुलीची तक्रार मुख्यमंत्र्याकडे गोपनीय पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.मुख्यालयी राहण्याची सक्ती करासाकोली तालुक्यातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकारी हे मुख्यालयी न राहता साकोली, लाखनी, भंडारा या ठिकाणी राहतात. त्यामुळे सकाळी ११ ते ५ पर्यंत आपली नोकरी करुन रेतीतस्करांना रान मोकळे सोडतात. त्यामुळे जिल्हाधिकारी या प्रकरणात स्वत: लक्ष घालुन मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे अशी मागणी आहे.पोलीस चौकशीही सुरु करारेतीघाटानजीक व ज्या टेकडीवरुन गिट्टीचे खणन केले जाते, त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरु करण्यात यावी. प्रत्येक ट्रॅक्टरची रॉयल्टी तपासण्यात येऊन तारीख व वेळ पाहण्यात यावी. जेणेकरुन एका रॉयल्टीचा उपयोग एकाच वेळी घेता येईल.