शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

निवडणूक होणार की नाही, संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या ३९ गटांसाठी निवडणूक होऊ घातली असून, मंगळवारी झालेल्या छाननीत सहा उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. त्यात साकोली तालुक्यातील कुंभली आणि वडद येथील प्रत्येकी एक, भंडारा तालुक्यातील खोकरला दोन, पवनी तालुक्यातील चिचाळ गटातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. आता ३९ गटांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरुष, तर १६३ महिलांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी निवडणूक होत असून, ११ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसी जागा वगळून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्वघोषित कार्यक्रमानुसार घेण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र, राजकीय नेत्यांनी आरक्षण नाही तर निवडणुका नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे निवडणूक होणार की नाही, असा संभ्रम या निवडणुकीत उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. सर्वांचे लक्ष आता शासनाच्या आदेशाकडे लागले आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने ६ डिसेंबर रोजी नागरिकांचा मागास प्रवर्गातील निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३ गटातील आणि पंचायत समितीच्या २५ गणातील निवडणूक स्थगित करण्यात आली. विशेष म्हणजे या गण व गटातील नामांकनाची छाननीही करण्यात आली नाही. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षण नाही तर निवडणूक नाही, अशी भूमिका घेतली. ओबीसी क्रांती मोर्चाने तर निवडणुका झाल्या तर ओबीसी समाज बांधवांनी या निवडणुकीत मतदान करू नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सर्वच निवडणुकीला स्थगिती मिळणार काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक उमेदवारांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. मंगळवारी अर्जांची छाननी झाली. आता १३ डिसेंबरला उमेदवारी मागे घेतल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे; परंतु ऐनवेळी निवडणुकीला स्थगिती मिळाली तर आपला पैसा पाण्यात तर जाणार नाही ना, अशी भीतीही उमेदवारांना लागली आहे. सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांना मात्र ही निवडणूक व्हावी, असे मनोमन वाटत आहे. परंतु त्याच पक्षाचे नेते मात्र निवडणूक स्थगित करण्याची भाषा करत आहे.

जि. प. मध्ये सहा, तर पं. स. मध्ये ११ नामांकन रद्द- जिल्हा परिषदेच्या ३९ गटांसाठी निवडणूक होऊ घातली असून, मंगळवारी झालेल्या छाननीत सहा उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. त्यात साकोली तालुक्यातील कुंभली आणि वडद येथील प्रत्येकी एक, भंडारा तालुक्यातील खोकरला दोन, पवनी तालुक्यातील चिचाळ गटातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. आता ३९ गटांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरुष, तर १६३ महिलांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी निवडणूक होत असून, ११ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी, साकोली तालुक्यातील बोदरा, लाखनी तालुक्यातील कनेरी, भंडारा तालुक्यातील बेला, ठाणा, सावरी येथून प्रत्येकी एक, तर पवनी तालुक्यातील अड्याळ गणातून तीन तर आकोट व मांगली गणातून प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आता ७९ जागांसाठी ५४४ उमेदवार रिंगणात असून, त्यात ३२० पुरुष आणि २२४ महिलांचा समावेश आहे.

१३ गटांमध्ये १०७ उमेदवारांचे नामांकन- जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या या १३ गटांमधून १०७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. त्यात तुमसर तालुक्यातून २२, मोहाडी १८, लाखनी ३९, भंडारा १२, पवनी तालुक्यातील सात उमेदवारांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक लाखनी तालुक्यातील ३९ उमेदवारांचा समावेश असून या तालुक्यातील चार गटांची निवडणूक स्थगित झाली आहे.

२५ गणातील १५७ उमेदवारांचा जीव टांगणीला- पंचायत समितीच्या २५ जागांसाठी १५७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यात तुमसर तालुक्यात २९, मोहाडी २१, साकोली १९, लाखनी १४, भंडारा ३७, पवनी २१, लाखांदूर १६ उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांनी नामांकन दाखल केले.  परंतु छाननीनंतर प्रक्रिया थांबली आहे. आता निवडणूक कधी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. सर्वांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद