शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

कुठे गेले ‘अच्छे दिन’

By admin | Updated: July 7, 2015 00:36 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरभरून साथ दिलेल्या भंडारा जिल्हावासियांनी ...

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरभरून साथ दिलेल्या भंडारा जिल्हावासियांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पुरते लोळविले. तत्कालीन सरकारने विकासकामे न केल्यामुळे त्यांना जसा धडा शिकविला तसाच धडा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपला शिकवून मतदारांनी आम्हीचे ‘राजे’ असल्याचे दाखवून दिले.मागील वेळी जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीमध्ये एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपला यावेळी मतदारांनी अर्ध्यापेक्षाही कमी जागा मिळू दिल्या नाहीत. शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन आतापर्यंत शेतकऱ्यांसह सामान्य जनतेची सहानुभूती मिळविलेल्या नाना पटोले आणि मोदी लाटेवर स्वार होऊन निवडून आलेले चरण वाघमारे, बाळा काशीवार, रामचंद्र अवसरे या आमदारद्वयींना ग्रामीण मतदारांनी चांगलीच धोबीपछाड दिली आहे. हवेत राहू नका, जनतेची कामे करा, असाच संदेश मतदारांनी दिलेला आहे. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी हे पक्षाचे नसून सर्व जनतेचे असल्याची जाणीव विसरून विरोधासाठी विरोध करुन सामान्यांच्या मुलभूत प्रश्नांसाठी ताकद उभी न करता विरोधातच वेळ खर्ची घालत असल्यामुळे भाजपवर ही वेळ आली असल्याची चर्चा भाजपच्याच गोटातून व्यक्त होत आहे.प्रफुल्लभार्इंची जादू राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी सातही तालुक्यात ४८ झंझावती प्रचारसभा घेऊन संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. मागीलवेळी केलेली चूक पुन्हा करु नका, अशी भावनिक साद मतदारांना घातली. मतदारांनीही भाईजींवरच्या प्रेमाला भरभरुन साथ दिली. प्रत्येकच प्रचारसभेत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका करीत ‘अच्छे दिन’ आले कां? असा सवाल विचारून मतदारांशी थेट संवाद साधला. लोकसभेत नाकारल्यानंतरही कुठलाही पक्षनिभिवेश न ठेवता थेट लोकांमध्ये जावून त्यांच्या समस्यांना हात घातला. मतदारांची ‘मने’ आणि ‘मते’ जिंकण्यात ते यशस्वी ठरले. राष्ट्रवादीच्या विजयाचे खरे शिल्पकार प्रफुलभाई ठरले असून जनतेने आपले प्रेम हे केवळ भार्इंजीवरच असल्याचे दाखवून दिले आहे. आता त्यांना पक्षातील गटातटाचे राजकारण आणि पक्षातील व्यक्ती वर्चस्वाला आवर घालण्यासाठी लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. तरच निष्ठावान कार्यकर्ते न दुरावता पक्षासोबत कायम राहतील, हाच संदेश निकालातून दिसून आला आहे.वाघायेंचा झंझावातया निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून काँग्रेसने कधी नव्हे तेवढे यश मिळविले. माजी आमदार सेवक वाघाये हे काँग्रेसच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले आहेत. ज्या साकोली विधानसभेचे दोनदा नेतृत्व आणि दोनदा मतदारांनी नाकारल्यानंतर ते पुन्हा जोमाने जनतेत गेले. या विधानसभा क्षेत्रात साकोली, लाखनी व लाखांदूर या तीन तालुक्यात जिल्हा परिषदेचे १८ गट आहेत. त्यापैकी १५ जागांवर निर्विवाद जागा जिंकून आपले नेतृत्व सिद्ध केले. निवडणुकीत आ.विजय वडेट्टीवार यांची रणनीती यशस्वी ठरली. जिल्ह्यात ज्या २० जागा निवडून आलेल्या आहेत त्यात साकोली क्षेत्रातून १५ जागा काँग्रेसच्या वाट्याला मिळाल्या आहेत. उर्वरित पाच जागांमध्ये भंडाऱ्यात तीन तर पवनीत दोन जागा मिळविता आल्या. तुमसर क्षेत्रात ज्या स्वयंघोषित नेत्यांनी ‘पक्षाला यश आले नाही तरी चालेल परंतु, भविष्यात आपल्यासाठी कुणी डोकेदुखी ठरु नये’, या भीतीमुळे तिकीट वाटप करताना अनेकांना डावलले. त्यामुळे तुमसर क्षेत्रात काँग्रेसचा पुरता सफाया झाल्याचे चित्र दिसून आले.