शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

-तर पवनीचा विकास झाला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 21:48 IST

येथील वैनगंगा नदीवर सन १९८० अगोदर पुल बनायचा होता. त्यामुळे नदीला पूर राहत असल्यामुळे येथील जनतेला पुरातून डोंग्याने जावून सिंदपुरी येथून एस.टी. बसने भंडाऱ्याला जावे लागत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : येथील वैनगंगा नदीवर सन १९८० अगोदर पुल बनायचा होता. त्यामुळे नदीला पूर राहत असल्यामुळे येथील जनतेला पुरातून डोंग्याने जावून सिंदपुरी येथून एस.टी. बसने भंडाऱ्याला जावे लागत होते. त्यामुळे सहा महिने भंडाराशी संपर्क राहत नव्हता. उलट येथून नागपुरला जाणे सोपे होते. त्यामुर्ळं त्यावेळेस येथील जनतेची नागपूर जिल्ह्याला जोडण्याची मागणी होती. त्यावेळेस ही मागणी पूर्ण झाली असती तर ऐतिहासिक प्राचीन पवनी शहराचा विकास व्हायला वेळ लागला नसता.ऐतिहासिक, प्राचीन पवनी शहरामध्ये पर्यटनाचा व इतर विकास करण्यात सर्व काही आहे. पण येथील लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांची विकास करण्यात दूरदृष्टी नाही. त्यामुळे इतर शहरांच्या लोकसंख्या वाढत असताना येथील लोकसंख्या कमी का झाली व त् यावर काय उपाय आाहेत याचे मंथन करण्याची गरज आहे.ज्यावेळेस १९८० पूर्वी वैनगनगा नदीवर पुल बनायचा होता. त्यावेळेस पुरातून जीव मुठीत धरून डोंग्याने नदीतून जावून सिंदपुरीवरून भंडाऱ्याला जावे लागत होते. त्यामुळे पावसाळ्यात सहा महिने पर्यंत भंडाºयाशी संपर्क राहत नव्हता. अतिमहत्वाच्या कामालाच जावे लागत होते. उलट नागपूर दूर असूनही नियमित बससेवा कोणतेही अडथळे न येता नागपुरला जाणे सोपे होते. त्यामुळे नेहमी संपर्क नागपूरशी होता. त्यामुळे येथील जनतेची पवनी शहर नागपूर जिल्ह्याला जोडण्याची मागणी होती पण ही मागणी पूर्ण झाली नाही.वैनगंगा नदीवर पुल तयार करण्याकरिता माजी आ.स्व.रामकृष्ण काटेखाये यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे येथील जनता नेहमी भंडारा मुख्यालयाशी संपर्कात आहे. पण जर येथील जनतेची नागपूर जिल्ह्याला जोडण्याची मागणी पूर्ण झाली असती तर पवनीचा फार मोठा विकास झाला असता.