शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षकांची वेतनश्रेणी केव्हा वाढणार?

By admin | Updated: April 6, 2016 00:29 IST

राज्यातील ९ हजार ३०० वनरक्षक पायाभूत गट ‘क’चे क्षेत्रीय कर्मचारी असून २४ तास आपले कर्तव्य दुर्गम नक्षलग्रस्त, आदिवासी क्षेत्र,

वेतनश्रेणी सुधारण्याची गरज : कार्यक्षमता वाढविण्यासाठी मनोबल वाढण्याची गरजभंडारा : राज्यातील ९ हजार ३०० वनरक्षक पायाभूत गट ‘क’चे क्षेत्रीय कर्मचारी असून २४ तास आपले कर्तव्य दुर्गम नक्षलग्रस्त, आदिवासी क्षेत्र, अतिदुर्गम जंगल भागात प्रभावीपणे बजावित आहे. कर्तव्य बजावत असताना अनेक क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. वनरक्षकाचे काम व कार्य अत्यंत जोखमीचे असताना इतर विभागाच्या तुलनेत वेतनात मोठी तफावत आहे. पोलीस व महसूल विभागामध्ये कार्यरत समकक्ष कर्मचारीच्या तुलनेत कमी वेतन मिळत आहे. त्यांच्याही वेतनश्रेणीत सुधारणा करण्याची गरज आहे.आजमितीस वनरक्षकांच्या कामात लक्षणीय वाढ झालेली असून वन विभागातील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांना वर्ग चारचे वेतन मंजूर केले आहे. त्यामुळे वनरक्षकांमध्ये नैराशाची भावना वाढीस लागली आहे. यावर शासनाने वेतन श्रेणीत सुधारणा केल्यास मनोबल वाढून कार्यक्षमता वाढेल व प्रभावीपणे वनाचे संरक्षण व संवर्धन होवू शकेल, असे वन संघटनेने म्हटले आहे. महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २० टक्के क्षेत्र वनाच्या अंतर्गत मोडते. वनाचे संरक्षन व विकास करण्याकरिता वनविभागात ११ प्रादेशिक वृत्त, ५१ प्रादेशिक विभाग व प्रादेशिक उपविभाग कार्यरत असून त्यात ४५६ क्षेत्रामध्ये परिक्षेत्र आहे. याशिवाय वनजीव शाखेचे तीन वृत्त आहेत. राष्ट्रीय वन आयोगाने प्रत्येक राज्याचे स्वतंत्र वन धोरण असावे, अशी शिफारस केली होती. त्यानुसार राज्यातील वनक्षेत्राचे प्रमाण किमान ३३ टक्केपर्यंत वाढविण्याचे उद्दीष्ट प्राप्त करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे सन २००८ मध्ये नवे वन धोरण तयार केले. त्यात पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत जमिनीची धूप थांबविणे व पावसाचे पाणी अडविणे आणि यात डोंगराळ वनक्षेत्रांना प्राधान्य देवून वनाचा विकास करणे, वनसंरक्षणाकरिता संयुक्त वनव्यवस्थापनाद्वारे लोकसहभागातून वनसंरक्षणावरती भर देण्यात आला. त्याकरिता वनकर्मचारींना शस्त्र व दारूगोळा पुरवठा करण्यात आला. तसेच तांत्रिक सुधारणा करून प्रत्येक वनविभागाचा जीआयएस प्रणालीचा वापर करून स्वतंत्र कार्य आराखडा तयार करणे, महाराष्ट्र वनसंशोधन संस्थेची स्थापना करणे वनीकरणाकरिता उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व रोपाचा वापर, सेंद्रीय खताचा वापर करण्यास प्रवृत्त करणे, ई-प्रशासनाला चालना देवून वनक्षेत्राची उत्पादकता वाढविणे तसेच आदिवासी व दुर्बल घटकाच्या सहाय्याकरिता निस्तार हक्क देणे, वनऔषधी, तेंदूपत्ता, लाख, मोहफुले, सहद इत्यादी गौण वनोपज गोळा करणे त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून रोजगार निमिर्ती करून देणे, वनावरील ताण कमी करण्याकरिता बायोगॅस व सौर उर्जा वापरास चालना देणे वन्यजीव व व्यवस्थापनाकरिता शिकारीस आळा घालणे, शिकार प्रतिबंधक पथक उभारणी करणे, निसर्ग पर्यटनास चालना देणे, हरीतपट्याची निमिर्तीकरिता नागरी वानिकी प्रकल्पास योग्य तांत्रिकी साहाय्य देवून कार्यान्वित करणे ग्रीन फंडाच्या स्थापनेद्वारे कॅम्पा, वन विकास कर, दोन टक्के ग्रीनलेस लावणे इत्यादी माध्यमातून निधी उभारण्याकरिता चालना देणे अशा शासकीय योजनांची कामे त्यांना करावी लागतात. (शहर प्रतिनिधी)