शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

ग्रामीण भागात शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:36 IST

बारव्हा : कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद करण्यात आलेल्या शाळा पुढे संक्रमण कमी झाल्यानंतरही काही सबबी सांगून दीड वर्षापासून ...

बारव्हा : कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद करण्यात आलेल्या शाळा पुढे संक्रमण कमी झाल्यानंतरही काही सबबी सांगून दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. काहींचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. मात्र गरिबांच्या मुलांना ही सुविधाही मिळाली नाही. घरी राहून विद्यार्थ्यांसह पालक वैतागले आहेत. आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. त्यामुळे राज्य सरकार शाळा सुरू करण्याचा निर्णय कधी घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षाही झाल्या नाहीत. त्यानंतर जून-२०२१ पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. परंतु शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या नाहीत. जुलैमध्ये शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच १७ ऑगस्टपासून इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. टास्क फोर्सच्या इशाऱ्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यातच दिवाळीनंतर या शाळा सुरू होण्याचे संकेत राज्य शासनाने दिले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर लग्न, हॉटेल, बार, दुकाने, मॉल, बस, रेल्वे यासह इतर बाबींना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे उदासीन धोरण असल्याचा आरोप काही शिक्षणतज्ज्ज्ञांनी केला आहे. प्रशासन व तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

टास्क फोर्समधील तज्ज्ञांचा शाळा सुरू करण्याला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे शाळा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बॉक्स बालमनावर विपरीत परिणाम शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकर ठोस निर्णय घेत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा नसल्याने ऑनलाईनच्या नावावर शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये शालेय विद्याथ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याची माहिती काही शिक्षकांनी दिली असून, याला पालकांसह डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे. मुलांच्या वर्तनात बदल जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षणातील रुची कमी मुले घरी असल्याने ती पालकांसोबत रोज गर्दीत जात आहेत. काही शेतातील कामे करतात तर काही गटागटाने खेळत असतात. यात त्यांना मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासह अन्य उपाययोजनांचे भान नसते. त्यांचा संपूर्ण वेळ खेळण्यात जात असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांची शिक्षणातील रुची कमी होत असल्याचेही पालकांनी सांगितले, याबाबत शिक्षकांच्या संघटना आक्रमक भूमिका न घेता गप्प असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे.

कोट

कोरोना संक्रमण कमी झाले की निर्बंध उठविले जातात. वाढले की करण्याबाबत शासनाचे उदासीन धोरण पुन्हा लावले जातात. हाच निकष शाळेला लावून शाळा सुरू कराव्यात.

- महादेव खटके, शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारव्हा.

शाळा बंद असल्याने मुले आमच्यासोबत लान, बारसे, बाजार, इतर घरगुती कार्यक्रमात येतात. आम्ही दिवसभर शेतात असतो, तेव्हा मुले घोळक्याने गावात खेळतात. शाळा सुरू झाल्या तर ते शाळेत सुरक्षित राहतील व शिक्षणही होईल. त्यामुळे सरकारने लवकर शाळा सुरू कराव्यात.

-रवी झोडे, पालक