शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

कोल्हापुरी बंधाऱ्याचे पुनरूज्जीवन केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 01:10 IST

उन्हाळ्यात पाण्यासाठी ओरड होत असते. ग्रामीण भागात नाला व नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

लोखंडी पाट्या चोरीला : जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना अच्छे दिनची प्रतीक्षाराजू बांते मोहाडी उन्हाळ्यात पाण्यासाठी ओरड होत असते. ग्रामीण भागात नाला व नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आघाडी शासनाच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला युतीच्या कार्यकाळात अच्छे दिन येतील का असा प्रश्न आहे.जलयुक्त शिवार अभियान ही युती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. तथापि, कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतीला पाणी मिळावे या उद्देशाने गावातून वाहणाऱ्या नदी नाल्यावर बंधाऱ्याची संकल्पना मांडण्यात आली होती. गावोगावी मोठ्या प्रमाणात बंधारे बांधले गेले होते. २००१ ते २००५ या वर्षात कोल्हापुरी बंधारे बांधले गेले. बंधाऱ्यातून पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी मदत होईल, असा हेतू होता. कालांतराने मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव, सिरसोली, मोहाडी, दहेगाव येथे ३२ ठिकाणी बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरावस्था झाली आहे. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले हे बंधारे निकामी पडले आहेत. कान्हळगाव (सिरसोली) येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट्स चोरीला गेले. पाच वर्षापूर्वी याच बंधाऱ्याच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आला. परंतु पाणी ‘ना अडले - ना जमिनीत जिरले’. जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून जुन्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र बांधलेले कोल्हापुरी बंधारे क्षुल्लक किमतीच्या लोखंडी प्लेटअभावी दुरुस्तीची वाट बघत आहेत. शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाने मोहीम हाती घेण्याची गरज आहे. मात्र नवीन बंधारे बांधण्यासाठी लाखोंचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. कोल्हापुरी बंधाऱ्याची डागडुजी केल्यास उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते. उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडतात. अशावेळी जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागते. बंधाऱ्यात पाणी थांबले तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते.१५ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१६-१७ या वर्षासाठी मोहाडी तालुक्यातील महालगाव, धोप, आधळगाव, डोंगरगाव, पालडोंगरी, चिचोली, नवेगाव, ताडगाव, जांब, हिवरा या दहा गावांचा समावे, करण्यात आला आहे. २०१५-१६ या वर्षात १५ गावांची निवड करण्यात आली होती.