शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्याचे पुनरूज्जीवन केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 01:10 IST

उन्हाळ्यात पाण्यासाठी ओरड होत असते. ग्रामीण भागात नाला व नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

लोखंडी पाट्या चोरीला : जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना अच्छे दिनची प्रतीक्षाराजू बांते मोहाडी उन्हाळ्यात पाण्यासाठी ओरड होत असते. ग्रामीण भागात नाला व नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आघाडी शासनाच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला युतीच्या कार्यकाळात अच्छे दिन येतील का असा प्रश्न आहे.जलयुक्त शिवार अभियान ही युती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. तथापि, कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतीला पाणी मिळावे या उद्देशाने गावातून वाहणाऱ्या नदी नाल्यावर बंधाऱ्याची संकल्पना मांडण्यात आली होती. गावोगावी मोठ्या प्रमाणात बंधारे बांधले गेले होते. २००१ ते २००५ या वर्षात कोल्हापुरी बंधारे बांधले गेले. बंधाऱ्यातून पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी मदत होईल, असा हेतू होता. कालांतराने मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव, सिरसोली, मोहाडी, दहेगाव येथे ३२ ठिकाणी बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरावस्था झाली आहे. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले हे बंधारे निकामी पडले आहेत. कान्हळगाव (सिरसोली) येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट्स चोरीला गेले. पाच वर्षापूर्वी याच बंधाऱ्याच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आला. परंतु पाणी ‘ना अडले - ना जमिनीत जिरले’. जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून जुन्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र बांधलेले कोल्हापुरी बंधारे क्षुल्लक किमतीच्या लोखंडी प्लेटअभावी दुरुस्तीची वाट बघत आहेत. शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाने मोहीम हाती घेण्याची गरज आहे. मात्र नवीन बंधारे बांधण्यासाठी लाखोंचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. कोल्हापुरी बंधाऱ्याची डागडुजी केल्यास उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते. उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडतात. अशावेळी जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागते. बंधाऱ्यात पाणी थांबले तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते.१५ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१६-१७ या वर्षासाठी मोहाडी तालुक्यातील महालगाव, धोप, आधळगाव, डोंगरगाव, पालडोंगरी, चिचोली, नवेगाव, ताडगाव, जांब, हिवरा या दहा गावांचा समावे, करण्यात आला आहे. २०१५-१६ या वर्षात १५ गावांची निवड करण्यात आली होती.