शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

लाखनीत पिण्याचे पाण्याची समस्या केव्हा सुटणार ?

By admin | Updated: October 17, 2015 01:05 IST

जिल्हा परिषदची नळयोजना लाखनी, मुरमाडी व सावरी येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यास अपुरी पडत असल्याने ...

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची मागणी : नगरपंचायतने प्राधिकरणाची योजना चंदन मोटघरे लाखनी जिल्हा परिषदची नळयोजना लाखनी, मुरमाडी व सावरी येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यास अपुरी पडत असल्याने जीवन प्राधिकरणची योजना जिल्हा परिषदेने स्वीकारावी अशी जनतेची मागणी आहे. लाखनी शहराचे नगर पंचायतमध्ये रुंपातर झाल्याने लाखनी व मुरमाडीसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेची गरज निर्माण झाली आहे.लाखनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची १.२५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असलेली नळयोजना १९८२ पासून कार्यरत आहे. साकोली तालुक्यातील जांभळी बंधाऱ्यातील पंपहाऊसवरुन पाणीपुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्यासाठी दोन विंधन विहीर आहेत. पाईपलाईन फुटलेली असल्याने पाण्याचा दुरुपयोग होत असतो. नळयोजना जुनी झाल्यामुळे जांभळीपासून येणारी पाईपलाईन निष्कृष्ट झालेली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेद्वारे मागील सात ते आठ वर्षाेपासून ५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. चुलबंद बंधाऱ्यावरुन नळयोजना तयार आहे यामुळे लाखनी येथील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करता येतो. नळयोजनेचे ट्रायल घेण्यात आले. एक महिना पाणी पुरवण्यात आला. सदर नळयोजनेचा खर्च परवडणारा नसल्यामुळे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने जीवन प्राधिकरणाची योजना स्वीकारण्यास नकार दिला आहे.लाखनी ग्रामपंचायत बरखास्त करुन राज्य शासनाने लाखनीचे नगरपंचायतमध्ये परिवर्तन केले आहे. लाखनी शहराची २० हजारावर लोकसंख्या आहे. त्यामुळे लाखनी व मुरमाडीसाठी स्वतंत्र नळयोजनेची गरज आहे. लाखनी नगर पंचायत झाल्यामुळे जीवन प्राधिकरणची योजना नगर प्रशासनाने स्किारल्यास लाखनीवासियांना पिण्याचे शुध्द पाणी मिळू शकेल. फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याचा प्रश्न बिकट होतो. सद्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लाखनी शहरात सन २०१३-२०१४ मध्ये ५८७ जोडनी होती. थकित असल्यामुळे व पाणी पोहचत नसल्यामुळे जोडणी कमी करण्यात आले. सन २०१४-१५ मध्ये ग्राहकांची संख्या ३०६ वर आली आहे. सन २०१३-१४ ची पाणीपट्टी आकारणीचे उद्दिष्टय २५ लाख ११ हजार होते. त्यापैकी केवळ ४७ हजार वसुल झाले. सन २०१४-१५ चे १२ लाख ३१ हजार रुपये वसुलीचे उद्दिष्टय होते. त्यापैकी ५० हजार रुपये वसुल करण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचा हिसाब कामकाज, अधिकांऱ्याचा दुर्लक्षीतपणा यामुळे ग्राहकांची संख्या रोडावली आहे. नळयोजनेची पाईप अनेक वर्षोपासूनचे असल्यामुळे अंतर्गत नळयोजनेची पाईप फिटींगवर भर देने आवश्यक आहे.मुरमाडी (सावरी) येथे सन २०१३-१४ मध्ये ३३८ कनेक्शन होती त्यातील १६२ जोडणी बंद झाली आहे. सन २०१४-१५ मध्ये केवळ २१८ जोडणी शिल्लक आहे. सावरी येथील ३८ जोडणी अनेक वर्षोपासून बंद आहेत. सन २०१३-१४ मध्ये मुरमाडीचे वसुलीचे उद्दिष्ट १४ लाख ४९ हजार रुपये होते. त्यातील ६५ हजार रुपये वसूल करण्यात आले. सन २०१४-२०१५ मध्ये ९ लाख ३ हजार रुपयाचे वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यातील ८० हजार रुपयाची वसुली झाली आहे. अशोका बिल्डकॉनद्वारे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु असतांनी नळयोजनेमध्ये अनियमितता निर्माण झाली होती. पाणीपुरवठा विभागाचे काम ठप्प झाल्यासारखे होते. मुरमाडी व सावरी ह्या दोन्ही गावाची लोकसंख्या १५ हजारच्यावर आहे. त्यामुळे मुरमाडीसाठी जुनी पाण्याची टाकीसह स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज आहे.