शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

डाव्या कालव्याचे काम कधी पूर्ण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:07 IST

गोसेखुर्द प्रकल्पातून कोंढा परिसरात बारमाही पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांची इच्छा यावर्षी देखील पूर्ण होणार नाही. प्रकल्पाचा डावा कालवा कोंढा परिसरातून जातो.

ठळक मुद्देबांधकाम धिम्यागतीने : १० कि.मी.च्या पुढील बांधकाम ठप्प, चौरास भागातील शेतकऱ्यांचा सवाल, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा कोसरा : गोसेखुर्द प्रकल्पातून कोंढा परिसरात बारमाही पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांची इच्छा यावर्षी देखील पूर्ण होणार नाही. प्रकल्पाचा डावा कालवा कोंढा परिसरातून जातो. या कालव्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र धरणापासून १० कि.मी. च्या पुढे कालव्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या कालव्यातून बाराही महिने पाणी मिळण्याची आशा धूसर झाली आहे.इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन १९८४ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री स्व.पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्त करण्यात आले. तेव्हापासून २४ वर्षांचा कालावधी झाला. पण हा प्रकल्प पूर्ण होऊन शेतकºयांना बाराही महिने पाणी पुरवठा करू शकला नाही. प्रकल्पाचा उजवा कालवा तेवढा सुरु झाला असून शेतकºयांना पाणी पुरवठा करीत आहे. डावा कालवा हा ३५ कि.मी. लांबीचा असून देखील अजूनपर्यंत पूर्ण होऊ शकला नाही. या कालव्याच्या कामात अनियमितता आढळल्याने कामाची तोडफोड करून ते काम पुन्हा करण्यात येत आहे. या कालव्याच्या कामात सिंचन विभागाचे अनेक अधिकारी, अभियंता निलंबित झाले. तरी देखील या कालव्याच्या कामात वेग आलेला नाही. ० ते १० कि.मी. पर्यंत डाव्या कालव्याचे काम श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन, कंपनीला आहे. यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. पण डाव्या कालव्याचे काम १० कि.मी. च्या समोर भांगडिया कन्स्ट्रक्शन कंपनीला आहे. त्यांचे काम देखील पाडण्यात आले. त्या कामासाठी जनमंच ही स्वयंसेवी संस्थेनी नागपूर उच्च न्यायालयात कामाच्या अनियमितेबद्दल प्रकरण दाखल करून ते काम पाडून नव्याने अस्तरीकरणाचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र डाव्या कालव्याचे १० कि.मी. नंतरचे काम भांगडिया कन्स्ट्रक्शन कंपनीने पाहिजे त्या वेगाने केले नाही. अजून काम जैसे थे अवस्थेत आहे. या कंपनीचे मालक भाजपा पक्षाचे आमदार आहेत. तसेच वरिष्ठ भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले आमदार म्हणून किर्तीकुमार भांगडिया तसेच आमदार मितेश भांगडिया समजले जातात. त्यांच्या कंपनीला हे काम असल्याने त्यांनी वेगाने कालव्याचे काम केले नसल्याची ओरड आहे.चौरास भागात डावा कालवा हा एक वरदान ठरणार आहे. शेतकऱ्यांना बाराही महिने शेतीसाठी पाणी या कालव्यातून मिळणार आहे. पण याचे काम पूर्ण होत नसल्याने चौरास भागातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. चौरास भागातील संपूर्णर् सिंचन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आधी उन्हाळ्यात उन्हाळी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात होती. मात्र विहिरी कोरड्या पडल्याने उन्हाळी धानाची लागवड अत्यल्प केली जात आहे. अशावेळी डावा कालवा कोंढा, आकोट, चिचाळ, सेंद्री, भावड, खैरी, आसगाव, विरली (बु.), लाखांदूर अशा परिसराला वरदान ठरू शकते. परंतू ३५ कि.मी. लांबी असलेल्या कालव्याचे काम केव्हा पूर्ण होईल असे शेतकरी प्रश्न विचारित आहेत. डावा कालव्याचे काम पूर्ण झाल्यावर त्यास उपकालवे देवून शेतकºयांना पाणी देण्यात येणार आहे. सध्या चौरास भागातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. भांगडिया कन्स्ट्रक्शन कंपनीने आपले काम युद्धपातळीवर सुरु केले असते तर यावर्षी पावसापूर्वी हे काम पूर्ण झाले असते. पण तशी चिन्हे दिसत नाही. पावसाळा लागण्यास दोन महिने शिल्लक आहेत. पुढच्या वर्षी देखील कालव्याचे काम पूर्ण होईल याची शक्यता नाही. मोठी आसामी असलेल्या कंपनीवर नियंत्रण आणून ते काम करवून घेणे हे वरिष्ठ अधिकारी वर्गाचे आहे. ते देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे कळते. तेव्हा दरवर्षी पावसाळ्यात आपले धानपिक वाचविण्यासाठी धडपडणारा चौरासचा शेतकरी केव्हा समृद्ध होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. चौरास भागाला न्याय मिळवून देणारे लोकप्रतिनिधी मिळाले नाही. डावा कालव्याचे कामाचे भूमिपूजन होऊन ३४ वर्षानंतर देखील पूर्ण झाले नाही. कालव्याच्या बाजूला ड्रेन तयार केल्या आहेत. तिथे कच्चे पुल धरण विभागाने केले. पण पक्के पुल न केल्याने पावसाळ्याचे पाणी शेतातून निघत नाही. ही देखील समस्या सुटली नाही. कालवा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाराही महिने शेतीसाठी पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना सर्व समस्यावर समाधान मिळेल. धरण विभाग या कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी केव्हा लक्ष देईल, असा प्रश्न चौरासचे शेतकरी विचारत आहेत.