शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

‘त्यांच्या’ आयुष्यात अच्छे दिन केव्हा येणार!

By admin | Updated: December 24, 2014 22:55 IST

भंडारा जिल्ह्यात थोड्या प्रमाणात विखुरलेला असला शेती उपयोगी औजारे तयार करणारा लोहार समाज आजही विकासापासून वंचित आहे. यंत्राद्वारे शेतकी अवजारे तयार होत असल्याने

लोहार व्यवसाय दुष्काळाच्या छायेतचिचाळ : भंडारा जिल्ह्यात थोड्या प्रमाणात विखुरलेला असला शेती उपयोगी औजारे तयार करणारा लोहार समाज आजही विकासापासून वंचित आहे. यंत्राद्वारे शेतकी अवजारे तयार होत असल्याने लोहान समाजाच्या व्यवसायावर दुष्काळी परिस्थितीची गडद छाया पसरलेली आहे.'लोहार' या नावानुसार लोह म्हणजे लोखंड आणि लोखंडाच्या विविध वस्तु बनविणारा लोहार आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे दयनीय अवस्था भोगित आहे. जिल्ह्यात या समाजाचे लोक झाडाच्या सावलीत किंवा तलावालगत दुकाने मांडून कामे करताना आढळतात. लहानशा घरात किंवा गवताच्या झोपडीत कुटूंबियासोबत उदरनिर्वाह करीत असतात. प्राचीन काळात लोहार ही उच्च जात समजली जायची शेतकऱ्यांच्या कृषि विषयक कामासाठी लागणारे औजारे, बंडीची चाके, लाकडी, नांगराचा फार वखराची फास, धान्य कटाई करिता लागणारा विळा इत्यादी शेती उपयोगी साधने तयार करून लोहार पोठ भरतीत असे. पुर्वीच्या राजेशाही अस्तित्वात युद्धाची हत्यारे बनविणारा मुख्य कारागीर हा लोहारच असल्यामुळे त्याला राजश्रय प्राप्त होता. आता यंत्राद्वारे होणारे लोखंडी वस्तूचे उत्पादन ज्यात मुख्यत्वे शेतीचे औजारे तसेच घरगुती वापरण्याच्या वस्तू दर्जेदार व कमी खर्चीत उत्पादीत होत असल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा शेती हंगामाचे औजारे यंत्राद्वारे तयार करीत आहेत. परिणामी मृग नक्षत्रापासून लोहार समाजातील कारागीराची उपासमार होत आहे. त्यामुळे परंपरागत लोहारी कामाचा हळूहळू ऱ्हास होत गेला. सध्या लोहाराला भरपूर काम मिळणे दुरापस्त झाले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावत गेली आणि आज तो अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे.लोहार समाज आधिच अशिक्षित अडाणी, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक राजकीय क्षेत्रात अंध:कारमय जीवन जगणाऱ्या लोहार समाजाचे राजकीय पुढाऱ्याने समस्या उचलून न धरल्याने लोहार व गाडी लोहार समाज संघटने मार्फत समाजातील काही बुद्धीजीव, समाज कर्तव्यदक्ष समाज बांधवांनी पुढाकार घेवून लोहार व पोटजाती गाडी लोहार, घिसाडी लोहार, चितोडी लोहार, कोकणी लोहार, राजपूत लोहार, खाती, खातवाडी लोहार कन्नड लोहार, परदेशी लोहार, हिन्दू लोहार व मराठा लोहार यांना भटक्या जातीमध्ये समाविष्ठ करून १५ जाती पैकी कोणत्याही जातीची नोंद आली तरी लोहार या एकच भटक्या जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणून संघटनेमार्फत मोर्चे, अधिवेशने, धरणे, आंदोलनाची दखल घेत शासनाने दि.१ मार्च २००६ रोजी लोहार समाजाला भटक्या जमाती (ब) मध्ये समाविष्ठ केले. मात्र जिल्ह्यातील बऱ्याच तहसील कार्यालयात शासनाचे आदेश येवूनही समाजातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना लोहार, गाडी लोहार, घिसाडी लोहार, चितोडी लोहार, कोकणी लोहार, राजपूत लोहार, खाती, खातवाडी लोहार, कन्नड लोहार आदी या सर्व एकच जात असतानाही मात्र तहसील कार्यालयातून विनाकारण त्रास देत असल्याचे लोहार समाज पवनी तालुका उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)