शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

‘अच्छे दिन’ कधी येणार?

By admin | Updated: January 18, 2015 22:39 IST

खासगी स्वयंसेवी संस्थेद्वारा अस्थिव्यंग मतिमंद, मुकबधीर, कर्णबधीर व अंध अशा अपंगाच्या विशेष निवासी, अनिवासी शाळा कर्मशाळा राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

भंडारा : खासगी स्वयंसेवी संस्थेद्वारा अस्थिव्यंग मतिमंद, मुकबधीर, कर्णबधीर व अंध अशा अपंगाच्या विशेष निवासी, अनिवासी शाळा कर्मशाळा राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविल्या जातात. मात्र या संस्था मागील १३ वर्षांपासून विनाअनुदान तसेच कायम विनाअनुदान तत्वावर अपंगाची सेवा करीत आहेत. या शाळा, कर्मशाळांना शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. या अपंगाच्या शाळा, कर्मशाळेतील संस्थाचालक व कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. शासनाच्या 'अच्छे दिन' या अपंगाच्या विशेष शाळा कर्मशाळांना कधी येणार, असा प्रश्न संस्थाचालक व कर्मचारी करीत आहेत. या अपंगाच्या विशेष शाळा कर्मशाळा अपंग कल्याण आयुक्ताकडून मान्यता प्राप्त आहेत. राज्यात ८८७ अपंगाच्या विशेष शाळा कर्मशाळा अनुदानापासुन वंचित आहेत. तर जिल्हयातील २९ शाळांपैकी १९ शाळा कायम विनाअनुदानीत आहेत.शासन शिक्षण, कौशल्य शिक्षण, तसेच व्यवसायभिमूख प्रशिक्षााचा बोजवारा करीत असतांना विशेष मुलांना शिक्षण, प्रशिक्षण देणाऱ्या तसेच त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या अपंगाच्या शाळा कर्मशाळांना गेल्या १३ वर्षापासून अनुदानाचे सर्व निकष पुर्ण करणाऱ्या संस्थांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचारी व संस्थाचालक आर्थिक विवंचनत सापडले आहेत. अपंगाच्या संस्थाना अनुदान नसल्यामुळे विशेष विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या निवासाच्या आरोग्याच्या व त्यांच्या पुनर्वसनाच्या सर्व खर्च संस्थाचालकाला सोसावा लागत आहे. अनुदानाच्या मागणीसाठी तसेच कायम विनाअनुदानीत शाळा कर्मशाळांतील कर्मचाऱ्यांना संथ मान्यता व आकृतीबंध मान्यता मिळण्यासाठी व अनुदानीत शाळा कर्मशाळांतील अतिरिक्त कंत्राटी मानधनावरील तसेच संस्थेवरील कर्मचाऱ्यांना पदनामाप्रमाणे वेतन श्रेणी वर कायम करण्यासाठी प्रादेशिक अपंग शाळा कर्मचारी संस्थाचालक संघटनेच्या वतीने शाळा कर्मशाळा बंद साखळी उपोषण १२ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु आहे. गणेश हुकरे, देवील नेपाले, फिरोज खान पठान, रविन मत, प्रमोद साखरे यांच्या नेतृत्वात उदय माथुरकर, नासीर पठाण, कैलास गेडाम, बन्सोड आदी कर्मचारी व संस्थाचालक साखळी उपोषण करीत आहेत.या आंदोलनामुळे जिल्हयातील १,४०० अपंग विद्यार्थी शिक्षण व प्रशिक्षणापासुन वंचित झाले आहेत. त्यामुळे या विशेष विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेता शाळा कर्मशाळांना तात्काळ अनुदान दयावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष देवीलाल नेपाले यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)