शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे कर्ज केव्हा माफ होणार?

By admin | Updated: January 2, 2017 01:30 IST

धानावे भाव गडगडले आहेत. बाजार समित्यांमध्ये वेळेवर धानाला उचल मिळत नाही.

व्यथा बळीराजाची : दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतरही फायदा नाही करडी (पालोरा) : धानावे भाव गडगडले आहेत. बाजार समित्यांमध्ये वेळेवर धानाला उचल मिळत नाही. धानाला भाव नाही. बोनस दिला गेला नाही. सन २०१४-१५ दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतरही त्याचे फायदे शेतकऱ्यांना दिले गेले नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात जमिनी पडीत राहूनही त्याचा मोबदला देण्याची घोषणा करण्याचे सौजन्य शासनाने दाखविले नाही. भांडवलदार, उद्योगपती, व्यापाऱ्यांचे लाखो करोडोंचे कर्ज माफ करणारे शासनाने मात्र, विश्वासघात केल्याचा व थट्टा चालविल्याचा आरोप जि.प. सदस्या सरिता चौरागडे, पं.स. सदस्य महादेव बुरडे यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यातील विरोधी पक्षालाही शेतकऱ्यांचा विसर पडल्याचे दिसत आहे. शेतकरी दुष्काळाने, अल्प उत्पादन व कमी मिळणाऱ्या भाव होरपळला असताना, रोज आत्महत्या करत असताना, सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी रास्ता, रोको किंवा अन्य आंदोलन होताना दिसत नाही. विरोधक आजही सत्तेत असल्याचा तोरयात असल्याचे दिसत आहे. विरोधाचे राजकारण काँग्रेस व राष्ट्रवादी सारखे जिल्ह्यातील प्रमुख पक्ष विसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील त्यांची सत्ता खिळखिळी झालेली आहे. फक्त जिल्हा परिषदे पुरते राजकारण आजच्या विरोधकांकडे शिल्लक आहे. मात्र अजुनही त्यांची सत्तेशी नशा उतरलेली दिसत नाही. विरोधकांच्या नैराश्यपुर्ण वातावरणामुळेच शेतकऱ्यांचे बुरे दिन आल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून हो आहे. भाजपाने अच्छे दिन आणण्याच्या नावाखाली नोटबंदी केली. नोटबंदीमुळे मागच्या वर्षापेक्षा धानाचे भाव गडगडले आहेत. सन २०१४-१५ मध्ये जिल्हा दुष्कळग्रस्त घोषित केल्याप्रमाणे त्याचे फायदे शेतकऱ्यांना देण्यात यावे, यावर्षीच्या पडित जमिनीला मोबदला देण्याची घोषणा करावी, भांडवलदार, उद्योगपती, व्यापारयंचे लाखो कराडोंडे कर्ज माफ करणारे शानाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या सरिता चौरागडे, महादेव बुरडे यांनी केली आहे. (वार्ताहर) धानाला ५०० रूपये बोनसची मागणी नोटबंदीमुळे धानाला किंमत उरलेली नाही. भाव पडले आहेत. बाजार समित्यामध्ये व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण नाही. मागच्या वर्षीपेक्षाही स्थिती नाजुक झालेली आहे. यावर उपाय म्हणून शासनाने धानाला प्रति क्विंटल ५०० रूपये बोनस जाहीर करावा, शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दर्शवावी, अशी मागणी भारतीय किसान संघाचे यादोराव कापगते यांनी केली आहे. खा. नाना पटोले यांनी धानाला बोनस जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी स्वागतार्ह आहे.