शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

शेतकऱ्यांचे कर्ज केव्हा माफ होणार?

By admin | Updated: January 2, 2017 01:30 IST

धानावे भाव गडगडले आहेत. बाजार समित्यांमध्ये वेळेवर धानाला उचल मिळत नाही.

व्यथा बळीराजाची : दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतरही फायदा नाही करडी (पालोरा) : धानावे भाव गडगडले आहेत. बाजार समित्यांमध्ये वेळेवर धानाला उचल मिळत नाही. धानाला भाव नाही. बोनस दिला गेला नाही. सन २०१४-१५ दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतरही त्याचे फायदे शेतकऱ्यांना दिले गेले नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात जमिनी पडीत राहूनही त्याचा मोबदला देण्याची घोषणा करण्याचे सौजन्य शासनाने दाखविले नाही. भांडवलदार, उद्योगपती, व्यापाऱ्यांचे लाखो करोडोंचे कर्ज माफ करणारे शासनाने मात्र, विश्वासघात केल्याचा व थट्टा चालविल्याचा आरोप जि.प. सदस्या सरिता चौरागडे, पं.स. सदस्य महादेव बुरडे यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यातील विरोधी पक्षालाही शेतकऱ्यांचा विसर पडल्याचे दिसत आहे. शेतकरी दुष्काळाने, अल्प उत्पादन व कमी मिळणाऱ्या भाव होरपळला असताना, रोज आत्महत्या करत असताना, सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी रास्ता, रोको किंवा अन्य आंदोलन होताना दिसत नाही. विरोधक आजही सत्तेत असल्याचा तोरयात असल्याचे दिसत आहे. विरोधाचे राजकारण काँग्रेस व राष्ट्रवादी सारखे जिल्ह्यातील प्रमुख पक्ष विसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील त्यांची सत्ता खिळखिळी झालेली आहे. फक्त जिल्हा परिषदे पुरते राजकारण आजच्या विरोधकांकडे शिल्लक आहे. मात्र अजुनही त्यांची सत्तेशी नशा उतरलेली दिसत नाही. विरोधकांच्या नैराश्यपुर्ण वातावरणामुळेच शेतकऱ्यांचे बुरे दिन आल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून हो आहे. भाजपाने अच्छे दिन आणण्याच्या नावाखाली नोटबंदी केली. नोटबंदीमुळे मागच्या वर्षापेक्षा धानाचे भाव गडगडले आहेत. सन २०१४-१५ मध्ये जिल्हा दुष्कळग्रस्त घोषित केल्याप्रमाणे त्याचे फायदे शेतकऱ्यांना देण्यात यावे, यावर्षीच्या पडित जमिनीला मोबदला देण्याची घोषणा करावी, भांडवलदार, उद्योगपती, व्यापारयंचे लाखो कराडोंडे कर्ज माफ करणारे शानाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या सरिता चौरागडे, महादेव बुरडे यांनी केली आहे. (वार्ताहर) धानाला ५०० रूपये बोनसची मागणी नोटबंदीमुळे धानाला किंमत उरलेली नाही. भाव पडले आहेत. बाजार समित्यामध्ये व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण नाही. मागच्या वर्षीपेक्षाही स्थिती नाजुक झालेली आहे. यावर उपाय म्हणून शासनाने धानाला प्रति क्विंटल ५०० रूपये बोनस जाहीर करावा, शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दर्शवावी, अशी मागणी भारतीय किसान संघाचे यादोराव कापगते यांनी केली आहे. खा. नाना पटोले यांनी धानाला बोनस जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी स्वागतार्ह आहे.