शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे कर्ज केव्हा माफ होणार?

By admin | Updated: January 2, 2017 01:30 IST

धानावे भाव गडगडले आहेत. बाजार समित्यांमध्ये वेळेवर धानाला उचल मिळत नाही.

व्यथा बळीराजाची : दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतरही फायदा नाही करडी (पालोरा) : धानावे भाव गडगडले आहेत. बाजार समित्यांमध्ये वेळेवर धानाला उचल मिळत नाही. धानाला भाव नाही. बोनस दिला गेला नाही. सन २०१४-१५ दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतरही त्याचे फायदे शेतकऱ्यांना दिले गेले नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात जमिनी पडीत राहूनही त्याचा मोबदला देण्याची घोषणा करण्याचे सौजन्य शासनाने दाखविले नाही. भांडवलदार, उद्योगपती, व्यापाऱ्यांचे लाखो करोडोंचे कर्ज माफ करणारे शासनाने मात्र, विश्वासघात केल्याचा व थट्टा चालविल्याचा आरोप जि.प. सदस्या सरिता चौरागडे, पं.स. सदस्य महादेव बुरडे यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यातील विरोधी पक्षालाही शेतकऱ्यांचा विसर पडल्याचे दिसत आहे. शेतकरी दुष्काळाने, अल्प उत्पादन व कमी मिळणाऱ्या भाव होरपळला असताना, रोज आत्महत्या करत असताना, सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी रास्ता, रोको किंवा अन्य आंदोलन होताना दिसत नाही. विरोधक आजही सत्तेत असल्याचा तोरयात असल्याचे दिसत आहे. विरोधाचे राजकारण काँग्रेस व राष्ट्रवादी सारखे जिल्ह्यातील प्रमुख पक्ष विसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील त्यांची सत्ता खिळखिळी झालेली आहे. फक्त जिल्हा परिषदे पुरते राजकारण आजच्या विरोधकांकडे शिल्लक आहे. मात्र अजुनही त्यांची सत्तेशी नशा उतरलेली दिसत नाही. विरोधकांच्या नैराश्यपुर्ण वातावरणामुळेच शेतकऱ्यांचे बुरे दिन आल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून हो आहे. भाजपाने अच्छे दिन आणण्याच्या नावाखाली नोटबंदी केली. नोटबंदीमुळे मागच्या वर्षापेक्षा धानाचे भाव गडगडले आहेत. सन २०१४-१५ मध्ये जिल्हा दुष्कळग्रस्त घोषित केल्याप्रमाणे त्याचे फायदे शेतकऱ्यांना देण्यात यावे, यावर्षीच्या पडित जमिनीला मोबदला देण्याची घोषणा करावी, भांडवलदार, उद्योगपती, व्यापारयंचे लाखो कराडोंडे कर्ज माफ करणारे शानाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या सरिता चौरागडे, महादेव बुरडे यांनी केली आहे. (वार्ताहर) धानाला ५०० रूपये बोनसची मागणी नोटबंदीमुळे धानाला किंमत उरलेली नाही. भाव पडले आहेत. बाजार समित्यामध्ये व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण नाही. मागच्या वर्षीपेक्षाही स्थिती नाजुक झालेली आहे. यावर उपाय म्हणून शासनाने धानाला प्रति क्विंटल ५०० रूपये बोनस जाहीर करावा, शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दर्शवावी, अशी मागणी भारतीय किसान संघाचे यादोराव कापगते यांनी केली आहे. खा. नाना पटोले यांनी धानाला बोनस जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी स्वागतार्ह आहे.