शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

शेतकऱ्यांचे कर्ज केव्हा माफ होणार?

By admin | Updated: January 2, 2017 01:30 IST

धानावे भाव गडगडले आहेत. बाजार समित्यांमध्ये वेळेवर धानाला उचल मिळत नाही.

व्यथा बळीराजाची : दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतरही फायदा नाही करडी (पालोरा) : धानावे भाव गडगडले आहेत. बाजार समित्यांमध्ये वेळेवर धानाला उचल मिळत नाही. धानाला भाव नाही. बोनस दिला गेला नाही. सन २०१४-१५ दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतरही त्याचे फायदे शेतकऱ्यांना दिले गेले नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात जमिनी पडीत राहूनही त्याचा मोबदला देण्याची घोषणा करण्याचे सौजन्य शासनाने दाखविले नाही. भांडवलदार, उद्योगपती, व्यापाऱ्यांचे लाखो करोडोंचे कर्ज माफ करणारे शासनाने मात्र, विश्वासघात केल्याचा व थट्टा चालविल्याचा आरोप जि.प. सदस्या सरिता चौरागडे, पं.स. सदस्य महादेव बुरडे यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यातील विरोधी पक्षालाही शेतकऱ्यांचा विसर पडल्याचे दिसत आहे. शेतकरी दुष्काळाने, अल्प उत्पादन व कमी मिळणाऱ्या भाव होरपळला असताना, रोज आत्महत्या करत असताना, सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी रास्ता, रोको किंवा अन्य आंदोलन होताना दिसत नाही. विरोधक आजही सत्तेत असल्याचा तोरयात असल्याचे दिसत आहे. विरोधाचे राजकारण काँग्रेस व राष्ट्रवादी सारखे जिल्ह्यातील प्रमुख पक्ष विसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील त्यांची सत्ता खिळखिळी झालेली आहे. फक्त जिल्हा परिषदे पुरते राजकारण आजच्या विरोधकांकडे शिल्लक आहे. मात्र अजुनही त्यांची सत्तेशी नशा उतरलेली दिसत नाही. विरोधकांच्या नैराश्यपुर्ण वातावरणामुळेच शेतकऱ्यांचे बुरे दिन आल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून हो आहे. भाजपाने अच्छे दिन आणण्याच्या नावाखाली नोटबंदी केली. नोटबंदीमुळे मागच्या वर्षापेक्षा धानाचे भाव गडगडले आहेत. सन २०१४-१५ मध्ये जिल्हा दुष्कळग्रस्त घोषित केल्याप्रमाणे त्याचे फायदे शेतकऱ्यांना देण्यात यावे, यावर्षीच्या पडित जमिनीला मोबदला देण्याची घोषणा करावी, भांडवलदार, उद्योगपती, व्यापारयंचे लाखो कराडोंडे कर्ज माफ करणारे शानाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या सरिता चौरागडे, महादेव बुरडे यांनी केली आहे. (वार्ताहर) धानाला ५०० रूपये बोनसची मागणी नोटबंदीमुळे धानाला किंमत उरलेली नाही. भाव पडले आहेत. बाजार समित्यामध्ये व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण नाही. मागच्या वर्षीपेक्षाही स्थिती नाजुक झालेली आहे. यावर उपाय म्हणून शासनाने धानाला प्रति क्विंटल ५०० रूपये बोनस जाहीर करावा, शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दर्शवावी, अशी मागणी भारतीय किसान संघाचे यादोराव कापगते यांनी केली आहे. खा. नाना पटोले यांनी धानाला बोनस जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी स्वागतार्ह आहे.