शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी केव्हा?

By admin | Updated: November 24, 2015 00:43 IST

सद्यस्थितीत धान कापणी व मळणीचा हंगाम जोमात सुरु आहे. शेतकऱ्यांनी गेले सहा महिने काबाडकष्ट करून धान पिकविले.

धान उत्पादक शेतकरी संकटात : ‘खर्चा रुपय्या, कमाई अठण्णी’ अशी स्थितीहरिश्चंद्र कोरे विरली (बु.) सद्यस्थितीत धान कापणी व मळणीचा हंगाम जोमात सुरु आहे. शेतकऱ्यांनी गेले सहा महिने काबाडकष्ट करून धान पिकविले. मात्र, यासाठी झालेला उत्पादन खर्च आणि मिळालेले उत्पन्न यांचा जमाखर्च मांडताना ‘खर्चा रुपय्या आणि कमाई अठण्णी’ अशी अवस्था झाली आहे. राज्य शासनाने एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताच्या स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी शासनाला मुहुर्त सापडलेला नाही. ही ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे.पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. संकटे ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी कधी किडींचे आक्रमणामुळे धान उत्पादकांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. परिणामी शेतकऱ्यांच्या कर्जाचे ओझे वाढत आहे.यावर्षी अपुरा पाऊस आणि विविध किडींच्या आक्रमणामुळे धानाच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ तर उत्पादनात कमालिची घट झालेली आहे. परिणामी शेतकरी वर्गाला आपल्या जमाखर्चाची तोंड मिळवणी करणे कठीण झाले आहे. वाढलेला उत्पादन खर्च व कमी हमीभावामुळे धान शेती परवडेनाशी झाली आहे. परिणामी काही शेतकऱ्यांनी आपली शेती बटईने देण्याचा मार्ग चोखाळला आहे. काही धाडसी शेतकरी शेती विकून आलेल्या रकमेच्या व्याजातून प्रपंच चालवित आहेत. शेतकऱ्यांची अशी दयनीय अवस्था असताना शेतकऱ्यांचे कैवारी गप्प बसले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी २००४ मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापन करण्यात आला. आॅक्टोबर २००६ मध्ये या आयोगाने शासनाला अहवाल सादर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिफारसी सुचविल्या. त्यामध्ये उत्पादन खर्चाच्या ५० टक्के नफा मिळेल, एवढा शेतीमालाचा हमीभाव असावा, अशी शिफारस करण्यात आली. त्यानंतर २००८ ला कर्मचाऱ्यांसाठी सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आणि आता कर्मचाऱ्यांची बोंब नसताना शासनाने सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे.मागील ९ वर्षापासून मागे पडलेला स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे धाडस सरकारने दाखविले नाही. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारनेही शेतकऱ्यांच्या हिताच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींकडे डोळेझाक केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या चर्चा करुन प्राप्त आकडेवारीनुसार यावर्षी धानशेतीसाठी प्रती एकर सुमारे १७ ते १८ हजार रुपये खर्च आल्याचे सांगितले. मात्र ३-४ महिने काबाडकष्ट करून शेतकऱ्यांच्या हातात जेमतेम १४ ते १५ हजार रुपयापर्यंत उत्पादन आल्याची वस्तुस्थिती आहे.