शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी केव्हा?

By admin | Updated: November 24, 2015 00:43 IST

सद्यस्थितीत धान कापणी व मळणीचा हंगाम जोमात सुरु आहे. शेतकऱ्यांनी गेले सहा महिने काबाडकष्ट करून धान पिकविले.

धान उत्पादक शेतकरी संकटात : ‘खर्चा रुपय्या, कमाई अठण्णी’ अशी स्थितीहरिश्चंद्र कोरे विरली (बु.) सद्यस्थितीत धान कापणी व मळणीचा हंगाम जोमात सुरु आहे. शेतकऱ्यांनी गेले सहा महिने काबाडकष्ट करून धान पिकविले. मात्र, यासाठी झालेला उत्पादन खर्च आणि मिळालेले उत्पन्न यांचा जमाखर्च मांडताना ‘खर्चा रुपय्या आणि कमाई अठण्णी’ अशी अवस्था झाली आहे. राज्य शासनाने एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताच्या स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी शासनाला मुहुर्त सापडलेला नाही. ही ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे.पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. संकटे ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी कधी किडींचे आक्रमणामुळे धान उत्पादकांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. परिणामी शेतकऱ्यांच्या कर्जाचे ओझे वाढत आहे.यावर्षी अपुरा पाऊस आणि विविध किडींच्या आक्रमणामुळे धानाच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ तर उत्पादनात कमालिची घट झालेली आहे. परिणामी शेतकरी वर्गाला आपल्या जमाखर्चाची तोंड मिळवणी करणे कठीण झाले आहे. वाढलेला उत्पादन खर्च व कमी हमीभावामुळे धान शेती परवडेनाशी झाली आहे. परिणामी काही शेतकऱ्यांनी आपली शेती बटईने देण्याचा मार्ग चोखाळला आहे. काही धाडसी शेतकरी शेती विकून आलेल्या रकमेच्या व्याजातून प्रपंच चालवित आहेत. शेतकऱ्यांची अशी दयनीय अवस्था असताना शेतकऱ्यांचे कैवारी गप्प बसले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी २००४ मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापन करण्यात आला. आॅक्टोबर २००६ मध्ये या आयोगाने शासनाला अहवाल सादर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिफारसी सुचविल्या. त्यामध्ये उत्पादन खर्चाच्या ५० टक्के नफा मिळेल, एवढा शेतीमालाचा हमीभाव असावा, अशी शिफारस करण्यात आली. त्यानंतर २००८ ला कर्मचाऱ्यांसाठी सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आणि आता कर्मचाऱ्यांची बोंब नसताना शासनाने सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे.मागील ९ वर्षापासून मागे पडलेला स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे धाडस सरकारने दाखविले नाही. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारनेही शेतकऱ्यांच्या हिताच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींकडे डोळेझाक केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या चर्चा करुन प्राप्त आकडेवारीनुसार यावर्षी धानशेतीसाठी प्रती एकर सुमारे १७ ते १८ हजार रुपये खर्च आल्याचे सांगितले. मात्र ३-४ महिने काबाडकष्ट करून शेतकऱ्यांच्या हातात जेमतेम १४ ते १५ हजार रुपयापर्यंत उत्पादन आल्याची वस्तुस्थिती आहे.