शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विरली केंद्रावर बारदाना येणार तरी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:54 IST

गेल्या १५ - २० दिवसांपासून बारदान्याअभावी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी रखडली आहे. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा संतप्त सवाल : १ हजार ८९० क्विंटल धानाची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : गेल्या १५ - २० दिवसांपासून बारदान्याअभावी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी रखडली आहे. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. दरम्यान या केंद्रावर बारदाना येणार तरी केव्हा? असा परिसरातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.पंचशील सहकारी धान गिरणी मासळच्या वतीने विरली (बु.) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गोदामात आधारभूत धान खरेदीसाठी उपकेंद्र सुरु करण्यात आले. या उपकेंद्रावर बारदाणा असेपर्यंत ५९ शेतकऱ्यांच्या १ हजार ८९० क्विंटल ४० किलो धानाची खरेदी करण्यात आली. मात्र १५-२० दिवसांपूर्वी या केंद्रावरील बारदाना संपल्यामुळे धान खरेदी बंद झाली. या केंद्रावर बारदाणा येण्याची चिन्हेच दिसत नसल्याने आणि पैशांची नितांत गरज असल्याने शेतकऱ्यांवर पडीक दराने व्यापाऱ्यांना आपला धान विकण्याच पाळी आली आहे. त्यामुळे सध्या व्यापाऱ्यांची चलती असून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे.या खरेदी केंद्राच्या एजंट संस्थेचे अध्यक्ष हरगोविंद नखाते वारंवार दोन दिवसात बारदाणा येईल असे आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहेत. असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्याचप्रमाणे या प्रकारासाठी एजंट संस्थेचा भोंगळ कारभार कारणीभूत असण्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.दरम्यान आज ना उद्या बारदाणा येईल आणि धान खरेदी पूर्ववत सुरु होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांचे हजारो पोती धान खरेदी केंद्राच्या प्रांगणात उघड्यावर पडून आहेत. या उघड्यावरील धानाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर असून केंद्रावर चौकीदार नेमण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.जिल्हा पणन अधिकारी अनभिज्ञगेल्या १५-२० दिवसांपासून बारदाण्याअभावी हे धान खरेदी केंद्र बंद पडले असताना जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे मात्र यावषियी अज्ञानात आहेत. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आॅनलाईन खरेदीचा हवाला देवून सदर केंद्र सुरु असल्याचे ठामपणे सांगितले.त्यामुळे त्यांना या केंद्रावर बारदान्याची गरज असल्याची मागणी केंद्रचालकांनी केली की नाही असा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे गेल्या १५ दिवसांपासून दररोजच्या अपडेटमध्ये १ हजार ८९० क्विंटल ४० किलोची खरेदी दिसत असताना सदर केंद्रावर खरेदी सुरु आहे की बंद, हे जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे आले नाही असा प्रश्नही निर्माण होतो. शेतकºयांच्या समस्येकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींकडेही वेळ नाही, ही बाब खरी ठरली आहे.या केंद्रावर धान खरेदी सुरु असल्याचे सांगून जिल्हा पणन अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. या केंद्रावर मिलर्सकडून आलेला बारदाणा वापरण्यायोग्य नसल्याने तो परत करण्यात आला. लवकरच चांगला बारदाणा येईल आणि केंद्र पूर्ववत सुरु होईल.-हरगोविंद नखाते, अध्यक्ष, पंचशील सह. धान गिरणी मासळ.नुकतेच मिलर्ससोबत बोलणे झाले आहे. उद्यापर्यंत सदर केंद्रावर बारदाणा पोहचेल आणि धान खरेदी पूर्ववत सुरु होईल.-गणेश खर्चे, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा