शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

विरली केंद्रावर बारदाना येणार तरी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:54 IST

गेल्या १५ - २० दिवसांपासून बारदान्याअभावी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी रखडली आहे. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा संतप्त सवाल : १ हजार ८९० क्विंटल धानाची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : गेल्या १५ - २० दिवसांपासून बारदान्याअभावी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी रखडली आहे. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. दरम्यान या केंद्रावर बारदाना येणार तरी केव्हा? असा परिसरातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.पंचशील सहकारी धान गिरणी मासळच्या वतीने विरली (बु.) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गोदामात आधारभूत धान खरेदीसाठी उपकेंद्र सुरु करण्यात आले. या उपकेंद्रावर बारदाणा असेपर्यंत ५९ शेतकऱ्यांच्या १ हजार ८९० क्विंटल ४० किलो धानाची खरेदी करण्यात आली. मात्र १५-२० दिवसांपूर्वी या केंद्रावरील बारदाना संपल्यामुळे धान खरेदी बंद झाली. या केंद्रावर बारदाणा येण्याची चिन्हेच दिसत नसल्याने आणि पैशांची नितांत गरज असल्याने शेतकऱ्यांवर पडीक दराने व्यापाऱ्यांना आपला धान विकण्याच पाळी आली आहे. त्यामुळे सध्या व्यापाऱ्यांची चलती असून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे.या खरेदी केंद्राच्या एजंट संस्थेचे अध्यक्ष हरगोविंद नखाते वारंवार दोन दिवसात बारदाणा येईल असे आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहेत. असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्याचप्रमाणे या प्रकारासाठी एजंट संस्थेचा भोंगळ कारभार कारणीभूत असण्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.दरम्यान आज ना उद्या बारदाणा येईल आणि धान खरेदी पूर्ववत सुरु होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांचे हजारो पोती धान खरेदी केंद्राच्या प्रांगणात उघड्यावर पडून आहेत. या उघड्यावरील धानाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर असून केंद्रावर चौकीदार नेमण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.जिल्हा पणन अधिकारी अनभिज्ञगेल्या १५-२० दिवसांपासून बारदाण्याअभावी हे धान खरेदी केंद्र बंद पडले असताना जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे मात्र यावषियी अज्ञानात आहेत. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आॅनलाईन खरेदीचा हवाला देवून सदर केंद्र सुरु असल्याचे ठामपणे सांगितले.त्यामुळे त्यांना या केंद्रावर बारदान्याची गरज असल्याची मागणी केंद्रचालकांनी केली की नाही असा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे गेल्या १५ दिवसांपासून दररोजच्या अपडेटमध्ये १ हजार ८९० क्विंटल ४० किलोची खरेदी दिसत असताना सदर केंद्रावर खरेदी सुरु आहे की बंद, हे जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे आले नाही असा प्रश्नही निर्माण होतो. शेतकºयांच्या समस्येकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींकडेही वेळ नाही, ही बाब खरी ठरली आहे.या केंद्रावर धान खरेदी सुरु असल्याचे सांगून जिल्हा पणन अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. या केंद्रावर मिलर्सकडून आलेला बारदाणा वापरण्यायोग्य नसल्याने तो परत करण्यात आला. लवकरच चांगला बारदाणा येईल आणि केंद्र पूर्ववत सुरु होईल.-हरगोविंद नखाते, अध्यक्ष, पंचशील सह. धान गिरणी मासळ.नुकतेच मिलर्ससोबत बोलणे झाले आहे. उद्यापर्यंत सदर केंद्रावर बारदाणा पोहचेल आणि धान खरेदी पूर्ववत सुरु होईल.-गणेश खर्चे, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा