शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

वाढत्या कोरोना संसर्गामुळे ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा एकदा पंक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST

भंडारा शहरातून थेट रायपूर, नागपूर, यवतमाळ, सोलापूर, औरंगाबाद, पुणे आदी शहरासाठी आजही बुकिंग होत आहे. मात्र पूर्वीप्रमाणे प्रवाशांची गर्दी ...

भंडारा शहरातून थेट रायपूर, नागपूर, यवतमाळ, सोलापूर, औरंगाबाद, पुणे आदी शहरासाठी आजही बुकिंग होत आहे. मात्र पूर्वीप्रमाणे प्रवाशांची गर्दी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. यापूर्वी लग्नसोहळा, धार्मिक विधी कार्यक्रमासाठी या दिवसात बुकिंग होत असत. मात्र सध्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने अनेक बुकिंग रद्द होत आहेत. १८ गाड्या कोरोनापूर्वी धावत होत्या. मात्र आता पुन्हा एकदा वाढत्या कोरोना संसर्गामुळे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे ट्रॅव्हलच्या फेरीतही घट झाली आहे. आता पुन्हा एकदा सरकारने मोठ्या महानगरामध्ये वेळेचे बंधन घातले असल्याने, दररोज धावणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या बसेसही भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात कमी संख्येने धावत आहेत. यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसायावर अवलंबून असणारे ड्रायव्हर, सफाई कामगार, बुकिंग एजंट, प्रवाशांना, खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनाही याचा फटका बसत आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने बँकांच्या पैशाची परतफेड कशी करावी, अशा विवंचनेत अनेक जण आहेत. या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनाही शासनाने दिलासा देण्याची गरज आहे.

बॉक्स

आताच कुठे गाडी रुळावर आली होती...

राज्यात कोरोना संसर्ग येण्यापूर्वी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय चांगल्या स्थितीत चालत होता. राज्यातील मोठ्या महानगरामध्ये तर दररोज ३०० ते ५०० हून अधिक ट्रॅव्हल्स धावत होत्या. भंडारा जिल्ह्यात दररोज १५ ते २० ट्रॅव्हल्स धावतात. मात्र आता कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या शहरामध्ये, विविध जिल्ह्यात लॉकडाऊन झाल्याने ट्रॅव्हल्स व्यावसायिक, तिकीट बुकिंग करणारे चालक व वाहक यांच्या रोजगाराचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट

कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता पूर्वीसारखा प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने व्यावसायिकांचा दररोजचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. या व्यवसायात आर्थिक भांडवल मोठे लागत असल्याने बँकांचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न आहे. ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे उत्पन्नही घटले आहे. आमच्या कुटुंबाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुणवंत तिडके, भूषण ट्रॅव्हल्स भंडारा.

कोट

कोरोनापूर्वी जसे रायपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरासाठी भंडारा येथून बुकिंग व्हायची, तशीच बुकिंग व्हायची तसेच आजही होत आहे. मात्र अलीकडे १५ दिवसात प्रवाशांची संख्या घटली आहे. ट्रॅव्हल्सचा प्रवास आजही संपूर्ण सुरक्षितच आहे.

सुमेश नागदिवे, सुमेश ट्रॅव्हल्स,भंडारा.

कोट

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. आताच कुठे चार महिने चांगली सुरुवात झाली होती. तोपर्यंत पुन्हा एकदा संसर्ग वाढत असल्याने ट्रॅव्हल्स व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. प्रवासी प्रवास करताना जशी काळजी घेतात तसेच आम्हीदेखील सर्व उपाययोजना करतो. मात्र तरी शासनाने आम्हाला मदत करण्याची गरज आहे.

हेमकृष्ण वाडीभस्मे, हरेश ट्रॅव्हल्स, भंडारा.