शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

तर कसा होणार उदयोन्मुख खेळाडूंचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:22 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या क्रीडा संकुलाची अवस्था पाहण्यासारखी आहे.

ठळक मुद्देआज राष्टÑीय क्रीडा दिवस : निधीची वाणवा कायम

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या क्रीडा संकुलाची अवस्था पाहण्यासारखी आहे. क्रीडांगण अथवा मैदान आहे पण सुविधा नाही, अशी वस्तुस्थिती आहे. खेडाळूंचा विकासापेक्षा अधिकाºयांचाच विकास झाला काय? असे स्पष्ट क्रीडापटू व क्रीडाप्रेमी बोलु लागले आहेत. राष्टÑीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही क्रीडागंणाची व्यथा. सदर क्रीडा संकुल नावापुरते असून क्रीडा सुविधांचा येथे प्रचंड वाणवा आहे. निधीची बोंब कायम असल्याने विकास कसा करावा असा युक्तीवाद क्रीडा अधिकारी नेहमी करतात. राज्य शासनानेही क्रीडा संकुलाच्या विकासाबाबत गांभीर्य दाखविले नाहीमैदानात चिखलच चिखलक्रीडांगण कसे असावे असा कुणी प्रश्न विचारल्यास तर ते भंडारा येथील क्रीडा संकुलासारखे निश्चितच नसावे, असा सल्ला दिला जाईल. सध्या स्थितीत या क्रीडांगणात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे. धावपट्टीवर पाणी साचून राहत असल्याने बांधणी व दर्जा कसा असावा असा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. धावपट्टीच्या बाजुला असलेल्या नालीवरील लोखंडी आच्छादन तुटलेले असून नालीमध्ये झाडीझुडपी वाढली आहेत. क्रीडांगणातील स्वच्छता करायलाही जिल्हा क्रीडा कार्यालयाला निधी उपलब्ध होत नसावा काय? असा प्राथमिक सवाल क्रीडांगणाची स्थिती बघीतल्यावर उपस्थित होतो.जिल्हा क्रीडा पुरस्काराला दांडीखेळाडूंना शिकविण्यासोबतच त्यांच्यातील उपजत गुणांना वाव देण्याची शिकवण प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक देत असतो. अश्या मार्गदर्शक किंवा प्रशिक्षकांना दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देवून त्यांना प्रोत्साहीत करण्यात येते. सन २०१६-१७ अंतर्गत देण्यात येणाºया क्रीडा पुरस्काराला यावर्षी जिल्हा प्रशासनातर्फे दांडी मारण्यात आली. सदर पुरस्कार २६ जानेवारी, १ मे किंवा १५ आॅगस्ट रोजी देण्यात येते. परंतु यावर्षी या पुरस्काराचे वाटप झाले नाही.खेळाडूंचा विकास जेवढा त्यांच्या आत्मशक्तीवर अवलंबून आहे. तेवढीच आवश्यकता मुलभूत क्रीडा सुविधांचीही आहे. निधीचा तुटवडा कायम असल्याने व राजकीय अनास्था असल्याने खेळाडूंचा विकास होत नाही. हीच या जिल्ह्यातील खेळाडूंची शोकांतिका आहे. याकडे क्रीडा विभागासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.- प्रविण कळंबे,फुटबॉल प्रशिक्षक, भंडारा