शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

तर कसा होणार उदयोन्मुख खेळाडूंचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:22 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या क्रीडा संकुलाची अवस्था पाहण्यासारखी आहे.

ठळक मुद्देआज राष्टÑीय क्रीडा दिवस : निधीची वाणवा कायम

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या क्रीडा संकुलाची अवस्था पाहण्यासारखी आहे. क्रीडांगण अथवा मैदान आहे पण सुविधा नाही, अशी वस्तुस्थिती आहे. खेडाळूंचा विकासापेक्षा अधिकाºयांचाच विकास झाला काय? असे स्पष्ट क्रीडापटू व क्रीडाप्रेमी बोलु लागले आहेत. राष्टÑीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही क्रीडागंणाची व्यथा. सदर क्रीडा संकुल नावापुरते असून क्रीडा सुविधांचा येथे प्रचंड वाणवा आहे. निधीची बोंब कायम असल्याने विकास कसा करावा असा युक्तीवाद क्रीडा अधिकारी नेहमी करतात. राज्य शासनानेही क्रीडा संकुलाच्या विकासाबाबत गांभीर्य दाखविले नाहीमैदानात चिखलच चिखलक्रीडांगण कसे असावे असा कुणी प्रश्न विचारल्यास तर ते भंडारा येथील क्रीडा संकुलासारखे निश्चितच नसावे, असा सल्ला दिला जाईल. सध्या स्थितीत या क्रीडांगणात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे. धावपट्टीवर पाणी साचून राहत असल्याने बांधणी व दर्जा कसा असावा असा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. धावपट्टीच्या बाजुला असलेल्या नालीवरील लोखंडी आच्छादन तुटलेले असून नालीमध्ये झाडीझुडपी वाढली आहेत. क्रीडांगणातील स्वच्छता करायलाही जिल्हा क्रीडा कार्यालयाला निधी उपलब्ध होत नसावा काय? असा प्राथमिक सवाल क्रीडांगणाची स्थिती बघीतल्यावर उपस्थित होतो.जिल्हा क्रीडा पुरस्काराला दांडीखेळाडूंना शिकविण्यासोबतच त्यांच्यातील उपजत गुणांना वाव देण्याची शिकवण प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक देत असतो. अश्या मार्गदर्शक किंवा प्रशिक्षकांना दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देवून त्यांना प्रोत्साहीत करण्यात येते. सन २०१६-१७ अंतर्गत देण्यात येणाºया क्रीडा पुरस्काराला यावर्षी जिल्हा प्रशासनातर्फे दांडी मारण्यात आली. सदर पुरस्कार २६ जानेवारी, १ मे किंवा १५ आॅगस्ट रोजी देण्यात येते. परंतु यावर्षी या पुरस्काराचे वाटप झाले नाही.खेळाडूंचा विकास जेवढा त्यांच्या आत्मशक्तीवर अवलंबून आहे. तेवढीच आवश्यकता मुलभूत क्रीडा सुविधांचीही आहे. निधीचा तुटवडा कायम असल्याने व राजकीय अनास्था असल्याने खेळाडूंचा विकास होत नाही. हीच या जिल्ह्यातील खेळाडूंची शोकांतिका आहे. याकडे क्रीडा विभागासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.- प्रविण कळंबे,फुटबॉल प्रशिक्षक, भंडारा