शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

भंडारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य, ...

भंडारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य, नोकरदार व ज्येष्ठांना काय मिळाले, याचा ऊहापोह सुरू झाला आहे. सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय उलाढाल व धडाडीचे निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया तर कुठे निराशाजनक अर्थसंकल्प सादर केल्याची बाब समोर येत आहे. याच अनुषंगाने ‘लोकमत’ने सर्वसामान्यांची किंबहुना अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. यात कुठे खुशी तर कुठे गम अशी बाब अधोरेखित झाली.

शैक्षणिक बाबतीत केंद्र सरकारने नवीन शिक्षण पद्धतीचा बदल केल्यानंतर देशात नवीन विद्यापीठे व अन्य धोरणात्मक बदल केले जाणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे मारक नसून तारक आहेत, असा आशावाद अर्थसंकल्पात सादर करून शेतकऱ्यांच्या पदरी नेमके काय मिळणार हे मात्र सांगितले नाही. हमीभाव किती व कोण ठरविणार याची शाश्वती नसल्याच्याही शेतकरी वर्गांच्या प्रतिक्रिया आहेत. यावरच केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे तोट्याचे व बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचा हा प्रकार असल्याचेही आता अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर बोलले जात आहे. तर दुसरीकडे बळीराजाला अधिक बळकटी देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

व्यापार (उद्योग) क्षेत्रात नवीन रोजगार देणारा अर्थसंकल्प असल्याचे काहींचे म्हणणे आहे. यासह बँकिंग क्षेत्रात २० हजार कोटी रुपयांचा दिलेला बूस्टर इकाॅनाॅमीला बळकट करणारा असल्याचेही म्हटले जात आहे. हीच बाब उद्योग क्षेत्राला तारेल. याशिवाय बाजारपेठेत विनिमय मूल्य वाढविण्यासाठी लाभांशावर कर सूट देण्याचा निर्णयही योग्य असल्याचे उद्योग क्षेत्रातील नागरिकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे सामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना या घोषणेतून काहीच साध्य होणार नसल्याचेही काहींचे म्हणणे आहे.

आरोग्य क्षेत्रात केंद्र सरकारने भरीव मदतीसह प्रत्येक जिल्हास्थळी फाॅरेन्सिक लॅब स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. याचा जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होऊन वेळ व पैशाची बचत होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. तर दुसरीकडे हा निर्णय अंमलबजावणीसाठी प्रत्यक्षरीत्या केव्हा पावले उचलणार याची शाश्वती नसल्याचे बोलले जात आहे. याबाबत काही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनीही निधीच्या योग्य विनियोगाबाबत शंका असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.

जीवनोपयोगी बाब असलेल्या गॅस सिलिंडरसह अन्य इंधनावर गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना लाभ किंवा दिलासा मिळाला नसल्याचेच अर्थसंकल्पातून दिसून आले. वाढलेले सिलिंडर्सचे दर गृहिणींसाठी मोठे अडचणींचे ठरलेले आहे. अर्थसंकल्पात याबाबत दिलासादायक घोषणा होईल असे वाटत होते. मात्र तसे काही झाले नाही. परिणामी गरजू व मध्यमवर्गीय नागरिकांना महागाईची झळ बसणार असल्याचेच स्पष्ट झाले आहे. याबाबत गृहिणींची मतेही तितकीच प्रखर आहेत.

दळणवळण क्षेत्रात अतिरिक्त भार बसत असल्याने साहित्य व साधनांच्या दरवाढीतही फरक जाणवणार असल्याचे बोलले जात असून याचा फटका लघु व्यवसायिक यांनाही बसणार आहे. मध्यम व मोठ्या व्यावसायिकांना याची झळ कमी प्रमाणात बसणार असली तरी इंधनाच्या किमती अजून वाढतील काय, असा प्रश्नही प्रतिक्रियेदरम्यान उपस्थित करण्यात आला. ज्येष्ठांसाठी कर सवलत दिली आहे. मात्र वयोवृद्धांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी विद्यमान स्थितीत करण्यासंदर्भात कुठलेही कठोर पाऊल उचलण्यात आले नाही. मालाच्या किमतीत चढउतार कायम असल्याने किराणा दुकानदारांसह अन्य मालाच्या पुरवठ्यावर व वाहतुकीवर दडपण येईल अशी प्रतिक्रियाही काही दुकानदारांनी व्यक्त केली.