शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

महापुरात ओले धान्य अद्यापही गोदामातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 05:00 IST

वैनगंगा नदीला २९ व ३१ ऑगस्ट रोजी महापूर आला होता. या महापूराने भंडारा शहरासह जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. शेकडो हेक्टर जमीन आणि घरांना याचा फटका बसला. यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या पुरवठा विभागाच्या तीन पैकी दोन गोदामात पुराचे पाणी शिरले. या दोन्ही गोदामात पाच ते सहा फुट पाणी होते. विशेष या गोदामात १७ हजार क्विंटल धान्य ठेवलेले होते.

ठळक मुद्देप्रयोगशाळा अहवालाची प्रतीक्षा : सहा हजार क्विंटल धान्य, वैनगंगा नदीच्या महापुराचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या महापूरात येथील शासकीय गोदामातील तब्बल सहा हजार २६३ क्विंटल धान्य ओले झाले होते. या धान्याला दुर्गंधीही सुटली होती. प्रयोगशाळेत पाठविलेल्या नमुन्याचा अहवाल अद्यापही प्राप्त झाला नाही. त्यामुळे या धान्याची विल्हेवाट लावता आली नाही. आजही महापूरात ओले झालेले धान्य शासकीय गोदामात पडून आहे.वैनगंगा नदीला २९ व ३१ ऑगस्ट रोजी महापूर आला होता. या महापूराने भंडारा शहरासह जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. शेकडो हेक्टर जमीन आणि घरांना याचा फटका बसला. यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या पुरवठा विभागाच्या तीन पैकी दोन गोदामात पुराचे पाणी शिरले. या दोन्ही गोदामात पाच ते सहा फुट पाणी होते. विशेष या गोदामात १७ हजार क्विंटल धान्य ठेवलेले होते. त्यात तांदूळ नऊ हजार ४७२ क्विंटल, गहू सहा हजार २१५ क्विंटल, तूर डाळ ७०० क्विंटल, चना डाळ ५४५ क्विंटल, हरभरा सहा क्विंटल आणि साखर १४४ क्विंटलचा समावेश होता. महापूरात तांदूळ ३८२६ क्विंटल, गहू १८३३ क्विंटल, तूर डाळ २६६ क्विंटल, चना डाळ १८८ क्विंटल, हरभरा सहा क्विंटल आणि महापूरात संपूर्ण साखर विरघळून गेली होती.ओले झालेले धान्य वाचविण्यासाठी तात्काळ वाळविण्यासाठी गोदामाबाहेर काढले होते. परंतु त्याला प्रचंड दुर्गंधी सुटली. आता पूर उलटून दोन महिने झाले तरी हे धान्य आजही गोदामात पडून आहे. त्या मागचे कारण म्हणजे नागपूर आणि पूणे येथील प्रयोग शाळेत पाठविलेला अहवाल अद्यापही प्रशासनाला प्राप्त झाला नाही. आता हे धान्य मानव अथवा जनावरास खाण्यायोग्य आहे की नाही या अहवालाची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे तहसील प्रशासनाने पुणे येथील आरोग्य सेवा संचालक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, सहायक संचालक पशूसंवर्धन रोग संशोधन शाखा व पशू संवर्धन प्रयोगशाळेकडे नमुने पाठविले आहे. यासोबतच नागपूर येथील प्रयोगशाळेतही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तांदूळ, गहू, तूरडाळ, हरभरा, साखर यांचे प्रत्येकी ५० किलोचे नमुने पाठविण्यात आले.महापुरात ओले झालेल्या धान्याचे नमुने पुणे आणि नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. नागपूरचा अहवाल प्राप्त झाला असून पुण्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल प्राप्त होताच तात्काळ धान्याची विल्हेवाट लावली जाईल.- साहेबराव राठोड,तहसीलदार, भंडाराधान्य खाण्यास अयोग्यभंडारा तहसील प्रशासनाने नागपूर येथाील प्रयोग शाळेत पाठविलेल्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला. सदर अहवालानुसार ओले झालेले धान्य मानवास खाण्यास अयोग्य असल्यास अहवाल प्राप्त झाला आहे. महापूरातओले झालेले धान्य आता जनावरांच्या खाण्यास योग्य आहे की नाही याची प्रशासनाला प्रतीक्षा असून त्यानंतरच त्याची विल्हेवाट लावली जाईल. मात्र तोपर्यंत गोदामात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे.

टॅग्स :floodपूर