शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अवकाळी पावसात धानासह कडपा ओला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 05:00 IST

गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने फुलोऱ्यावर आलेल्या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केली आहे. परंतु सततच्या ढगाळ वातावरणाने अळींचा प्रादूर्भाव वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात तूर पीक सलग पद्धतीने न घेता बांधावर घेतली जाते. घरी खाण्यापुरती तूर शेतात लावली जाते. परंतु आता या ढगाळ वातावरणाने तूर नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत हतबल झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देथंडीचा जोर वाढला : दोन दिवसांपासून ढगाळी वातावरणाने शेतकरी धास्तावला

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या पावसात आधारभूत केंद्रावरील धानासह कडपा ओला झाला आहे. थंडीचा जोर वाढला असून ढगाळी वातावरणाने शेतकरी धास्तावला आहे. पावसाने मळणीचे काम ठप्प झाले असून काढलेला धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होवून दुपारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्री भंडारा शहरासह अनेक भागात पाऊस कोसळला. शुक्रवारीसुद्धा संपूर्ण दिवसभर ढगाळी वातावरण दिसून आले. वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे. सध्या शेतशिवारात धान मळणीचे काम वेगात सुरू आहे. परंतु या अवकाळी पावसाने संपूर्ण काम ठप्प झाले आहे. काढलेला धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अनेकांकडे ताडपत्री व इतर साधने नसल्याने धान ओला होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी आपला धान विक्रीसाठी आधारभूत केंद्रावर नेला आहे. तो धानही ओला होण्याची भीती आहे. पावसाळी वातावरणाने शेतकरी धान झाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. गत खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना नैसर्गीक संकटाचा सामना करावा लागत आहे. आता धान घरी येत असतानाही या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा संकटात टाकले आहे. गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने फुलोऱ्यावर आलेल्या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केली आहे. परंतु सततच्या ढगाळ वातावरणाने अळींचा प्रादूर्भाव वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात तूर पीक सलग पद्धतीने न घेता बांधावर घेतली जाते. घरी खाण्यापुरती तूर शेतात लावली जाते. परंतु आता या ढगाळ वातावरणाने तूर नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत हतबल झाल्याचे चित्र आहे.

आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांची धावपळअवकाळी पावसाची टांगती तलवार असून हवामान खात्याने आणखी दोन दिवस पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी धान घेवून गेलेल्या शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. पावसाने धान ओला झाल्यास त्याचा दर्जा खालावतो. प्रसंगी ओले झालेले धान पाखर होताच आणि या धानाला कोणतीही किंमत राहत नाही. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्रावर मोजणीचा वेग वाढवावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊस