शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

अवकाळी पावसात धानासह कडपा ओला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 05:00 IST

गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने फुलोऱ्यावर आलेल्या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केली आहे. परंतु सततच्या ढगाळ वातावरणाने अळींचा प्रादूर्भाव वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात तूर पीक सलग पद्धतीने न घेता बांधावर घेतली जाते. घरी खाण्यापुरती तूर शेतात लावली जाते. परंतु आता या ढगाळ वातावरणाने तूर नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत हतबल झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देथंडीचा जोर वाढला : दोन दिवसांपासून ढगाळी वातावरणाने शेतकरी धास्तावला

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या पावसात आधारभूत केंद्रावरील धानासह कडपा ओला झाला आहे. थंडीचा जोर वाढला असून ढगाळी वातावरणाने शेतकरी धास्तावला आहे. पावसाने मळणीचे काम ठप्प झाले असून काढलेला धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होवून दुपारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्री भंडारा शहरासह अनेक भागात पाऊस कोसळला. शुक्रवारीसुद्धा संपूर्ण दिवसभर ढगाळी वातावरण दिसून आले. वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे. सध्या शेतशिवारात धान मळणीचे काम वेगात सुरू आहे. परंतु या अवकाळी पावसाने संपूर्ण काम ठप्प झाले आहे. काढलेला धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अनेकांकडे ताडपत्री व इतर साधने नसल्याने धान ओला होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी आपला धान विक्रीसाठी आधारभूत केंद्रावर नेला आहे. तो धानही ओला होण्याची भीती आहे. पावसाळी वातावरणाने शेतकरी धान झाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. गत खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना नैसर्गीक संकटाचा सामना करावा लागत आहे. आता धान घरी येत असतानाही या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा संकटात टाकले आहे. गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने फुलोऱ्यावर आलेल्या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केली आहे. परंतु सततच्या ढगाळ वातावरणाने अळींचा प्रादूर्भाव वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात तूर पीक सलग पद्धतीने न घेता बांधावर घेतली जाते. घरी खाण्यापुरती तूर शेतात लावली जाते. परंतु आता या ढगाळ वातावरणाने तूर नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत हतबल झाल्याचे चित्र आहे.

आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांची धावपळअवकाळी पावसाची टांगती तलवार असून हवामान खात्याने आणखी दोन दिवस पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी धान घेवून गेलेल्या शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. पावसाने धान ओला झाल्यास त्याचा दर्जा खालावतो. प्रसंगी ओले झालेले धान पाखर होताच आणि या धानाला कोणतीही किंमत राहत नाही. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्रावर मोजणीचा वेग वाढवावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊस