शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

उन्हाळी धानपिकांना भारनियमनाचा फटका

By admin | Updated: April 24, 2017 00:55 IST

निवडणुकीच्या काळात स्वत:चे हित साध्य करण्यासाठी निवडणूकीत उभे असलेले उमेदवार विविध पोकळ आश्वासनाची फुसके बार सोडून,..

लोकप्रतिनिधींचे आश्वासन पोकळ : पंचभाई यांचा आंदोलनाचा इशाराचिचाळ : निवडणुकीच्या काळात स्वत:चे हित साध्य करण्यासाठी निवडणूकीत उभे असलेले उमेदवार विविध पोकळ आश्वासनाची फुसके बार सोडून, ‘आम्ही तुमच्यासाठी हे ते करु’ म्हणून मतांचा जोगवा मागतात. निवडून आल्यावर ते लोकप्रतिनिधी क्षेत्रात ढूंकूनही पाहत नसल्याची प्रचिती पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. १६ तास विद्युत पुरवठा देण्याचे ठोस आश्वासन देवूनही आश्वासनाची पूर्तता न केल्याने बळीराजाची धान शेती धोक्यात आली आहे.अत्यल्प पावसामुळे खरीप धानशेती होरपळून निघाली. इतकेच नाही तर पावसाळयाच्या प्रारंभापासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने निर्सगावर अवलंबून असणाऱ्या बळीराजाने तलाव, बोळीतील इंजिनद्वारे पाणी देवून रोवणी केली. कित्येक शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय नसल्याने त्यांची पऱ्हे शेतातच राहली होती. इतकेच नाही तर रब्बीतील कळधान्याच्या उत्पादनापासून शेतकरीवर्ग वंचित राहीला. निसर्गाची अवकृपा व दिर्घकालीन विद्युत भारनियमन यांचा धान शेतीवर जबर फटका बसला परिणामी खरीप हंगामातील शेतीच्या खर्चाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. भाजप शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितार्थ उन्हाळी धान पिकांना व बागायती पिकांना १६ तासाचा विद्युत पुरवठा मिळावा यासाठी भाजपा प्रणित साकोली, तुमसर व भंडारा क्षेत्रातील आमदारांनी आंदोलन पुकारले मात्र सदर आंदोलनाचे श्रेय साकोली क्षेत्राचे आमदार बाळा काशिवार यांनी श्रेय लाटून आपल्या क्षेत्रात १६ तासाचा विद्युत पुरवठा केला. भंडारा क्षेत्रातील आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी लालीपाप देण्यात आले. पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्यालाही १६ तपास विद्युत पुरवठा मिळेल ही आस ठेवून खरीपातील तुट भरुन काढण्याच्या हेतूने ज्यांचे कृषिपंप आहे. अशानी नव्यां उमेदीने नवीन जोखीम पत्कारून बागायती पिके व उन्हाळी धान शेती लागली. पवनी तालुक्यातील चिचाळ, कोंढा, भावड, सेंद्री, खैरी, भेंडाळा, पालोरा, आसगाव आदी गावाला चौरास म्हणून संबोधले जातो. मात्र तालुक्यात शहरी भागाला २४ तास विद्युत पुरवठा होत आहे. ज्यांचा शेतकऱ्यांना कोणताच लाभ होत नाही तर चौरास म्हणून शेती करणारा ग्रामीण भागात १२ तास सिंगल फेस व १२ तास थ्रि फेस विद्युत पुरवठा होत आहे. विद्युत विभागाच्या व लोकप्रतिनिधीच्या निर्दयी सेवेमुळे इथेई शेतकऱ्यांच्या अपेक्षा तडीस गेल्या.येथील कृषीपंपाना व गाववस्त्यांना २४ तासाताून केवळ १२ तास थ्री फेस विद्युत पुरवठा मिळतो. धान व बागयती पिकाच्या दृष्टीने हा कालावधी फारच कमी असल्याने सध्याच्या तापमानाने पिके होरपळून निघाली आहेत. सदर पिकांना १६ ते १८ तास विद्युत पुरवठा आवश्यक आहे. या विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे अलीकडे गावांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या भेळसावू लागली. या सबंधाने संबधीतांनी मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक प्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली. प्रसंगी निदर्शनेही करण्यात आली. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने हितावह ठरेल अशी कोणतीही तडजोड अथवा कारवाही करण्यात आली नाही. धानपीकाला १६ तास विद्युत पुरवठा करण्याची मागणी आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केली आहे.(वार्ताहर)पवनी तालुक्यतील चौरास भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिचाळ, कोंढा, पालोरा, भेंडाळा, आसगाव, भावड, सेंद्री, ब्रम्ही आदी गावातील धान पीके गर्भालयात असून पाण्याअभावी धान पिके करपत असल्याने या चौरास भागाला १६ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा अन्यता आझाद शेतकरी संघाच्यावतीने तुतारी मोर्चा काढण्यात येईल.- किशोर पंचभाईअध्यक्ष, आझाद शेतकरी संघटना पवनी