शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

उन्हाळी धानपिकांना भारनियमनाचा फटका

By admin | Updated: April 24, 2017 00:55 IST

निवडणुकीच्या काळात स्वत:चे हित साध्य करण्यासाठी निवडणूकीत उभे असलेले उमेदवार विविध पोकळ आश्वासनाची फुसके बार सोडून,..

लोकप्रतिनिधींचे आश्वासन पोकळ : पंचभाई यांचा आंदोलनाचा इशाराचिचाळ : निवडणुकीच्या काळात स्वत:चे हित साध्य करण्यासाठी निवडणूकीत उभे असलेले उमेदवार विविध पोकळ आश्वासनाची फुसके बार सोडून, ‘आम्ही तुमच्यासाठी हे ते करु’ म्हणून मतांचा जोगवा मागतात. निवडून आल्यावर ते लोकप्रतिनिधी क्षेत्रात ढूंकूनही पाहत नसल्याची प्रचिती पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. १६ तास विद्युत पुरवठा देण्याचे ठोस आश्वासन देवूनही आश्वासनाची पूर्तता न केल्याने बळीराजाची धान शेती धोक्यात आली आहे.अत्यल्प पावसामुळे खरीप धानशेती होरपळून निघाली. इतकेच नाही तर पावसाळयाच्या प्रारंभापासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने निर्सगावर अवलंबून असणाऱ्या बळीराजाने तलाव, बोळीतील इंजिनद्वारे पाणी देवून रोवणी केली. कित्येक शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय नसल्याने त्यांची पऱ्हे शेतातच राहली होती. इतकेच नाही तर रब्बीतील कळधान्याच्या उत्पादनापासून शेतकरीवर्ग वंचित राहीला. निसर्गाची अवकृपा व दिर्घकालीन विद्युत भारनियमन यांचा धान शेतीवर जबर फटका बसला परिणामी खरीप हंगामातील शेतीच्या खर्चाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. भाजप शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितार्थ उन्हाळी धान पिकांना व बागायती पिकांना १६ तासाचा विद्युत पुरवठा मिळावा यासाठी भाजपा प्रणित साकोली, तुमसर व भंडारा क्षेत्रातील आमदारांनी आंदोलन पुकारले मात्र सदर आंदोलनाचे श्रेय साकोली क्षेत्राचे आमदार बाळा काशिवार यांनी श्रेय लाटून आपल्या क्षेत्रात १६ तासाचा विद्युत पुरवठा केला. भंडारा क्षेत्रातील आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी लालीपाप देण्यात आले. पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्यालाही १६ तपास विद्युत पुरवठा मिळेल ही आस ठेवून खरीपातील तुट भरुन काढण्याच्या हेतूने ज्यांचे कृषिपंप आहे. अशानी नव्यां उमेदीने नवीन जोखीम पत्कारून बागायती पिके व उन्हाळी धान शेती लागली. पवनी तालुक्यातील चिचाळ, कोंढा, भावड, सेंद्री, खैरी, भेंडाळा, पालोरा, आसगाव आदी गावाला चौरास म्हणून संबोधले जातो. मात्र तालुक्यात शहरी भागाला २४ तास विद्युत पुरवठा होत आहे. ज्यांचा शेतकऱ्यांना कोणताच लाभ होत नाही तर चौरास म्हणून शेती करणारा ग्रामीण भागात १२ तास सिंगल फेस व १२ तास थ्रि फेस विद्युत पुरवठा होत आहे. विद्युत विभागाच्या व लोकप्रतिनिधीच्या निर्दयी सेवेमुळे इथेई शेतकऱ्यांच्या अपेक्षा तडीस गेल्या.येथील कृषीपंपाना व गाववस्त्यांना २४ तासाताून केवळ १२ तास थ्री फेस विद्युत पुरवठा मिळतो. धान व बागयती पिकाच्या दृष्टीने हा कालावधी फारच कमी असल्याने सध्याच्या तापमानाने पिके होरपळून निघाली आहेत. सदर पिकांना १६ ते १८ तास विद्युत पुरवठा आवश्यक आहे. या विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे अलीकडे गावांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या भेळसावू लागली. या सबंधाने संबधीतांनी मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक प्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली. प्रसंगी निदर्शनेही करण्यात आली. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने हितावह ठरेल अशी कोणतीही तडजोड अथवा कारवाही करण्यात आली नाही. धानपीकाला १६ तास विद्युत पुरवठा करण्याची मागणी आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केली आहे.(वार्ताहर)पवनी तालुक्यतील चौरास भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिचाळ, कोंढा, पालोरा, भेंडाळा, आसगाव, भावड, सेंद्री, ब्रम्ही आदी गावातील धान पीके गर्भालयात असून पाण्याअभावी धान पिके करपत असल्याने या चौरास भागाला १६ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा अन्यता आझाद शेतकरी संघाच्यावतीने तुतारी मोर्चा काढण्यात येईल.- किशोर पंचभाईअध्यक्ष, आझाद शेतकरी संघटना पवनी