शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

हवामान खात्याचा अंदाज : शेतकरी चिंतेत

By admin | Updated: June 9, 2014 23:27 IST

मध्य भारतात उलट दिशेने वाहणार्‍या चक्राकार वार्‍याचा प्रभाव व गंगेच्या खोर्‍यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने यंदाच्या मान्सूनसाठी अद्याप अनुकूल वातावरण तयार झालेले नाही.

मान्सूनचे आगमन लांबणीवरभंडारा : मध्य भारतात उलट दिशेने वाहणार्‍या चक्राकार वार्‍याचा प्रभाव व गंगेच्या खोर्‍यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने यंदाच्या मान्सूनसाठी अद्याप अनुकूल वातावरण तयार झालेले नाही. त्यामुळे विदर्भात १५ जूननंतर मान्सून येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली आहे.यंदाचा उन्हाचा तडाखा मोठय़ा प्रमाणात जाणवला. ४५ डिग्रीपर्यंतच्या तापमानाने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. मध्यंतरी वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. मात्र ढगाळ वातावरणाने नागरिकांना दिलासा दिला. मान्सूनची प्रतीक्षा नागरीक व शेतकरी करीत आहेत. उन्हाची तीव्रता कमी होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. त्यामुळे मान्सूनच्या पावसाचा आनंद घेण्याकरिता आता नागरिक उत्सुक आहेत. यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होत आहे. मान्सूनकरिता अजूनही अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही. मान्सूनला उशिरा होत असल्याने काही दिवस उन्हाचा उकाडा नागरिकांना सहन करावा लागणार आहे. केरळमध्ये ४ ते ५ जून रोजी मान्सून पोहोचणार, असा अंदाज वर्तविला गेला असून त्या ठिकाणी मान्सूनचे आगमन होताच तेथून चार ते पाच दिवसात विदर्भातही मान्सून येण्याची शक्यता असते. मात्र गंगेच्या खोर्‍यात पुरेसा कमी दाबाचा पट्टा अजूनही निर्माण झाला नाही. मध्य भारतातही उलट दिशेने चक्रिय वारे वाहत आहे. त्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार आहे. अशा परिस्थितीत मान्सून पश्‍चिम घाटात अडकून राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व बदलामुळे यंदाचा मान्सून १५ ते १८ जून नंतरच येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. जूनमध्ये बेताचाच पाऊस पडणार असून जुलै महिन्यात चांगला पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्याची ४६.0 डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता अजूनही जाणवत आहे. आता तापमानात घट होणार असून लवकरच ढगाळ वातावरण नागरिकांना दिलासा देणार आहे. ढगाळ वातावरणातही काही दिवस उकाडा कायम राहणार असून मान्सूनच्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होणार आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाले होते. मात्र यंदा मान्सून वेळेवर येणार नसल्याचे दिसून येत आहे.यासंदर्भात पर्यावरण अभ्यासक राजकमल जोब यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, गंगेच्या खोर्‍यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे व मध्य भारतात चक्रीय वारे उलट दिशेने वाहत आहे. मान्सूनसाठी ही परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे यंदा मान्सून १५ ते २0 जूननंतर येण्याची शक्यता आहे.(नगर प्रतिनिधी)