शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही भृूमिकेवर ठाम, विचारांशी कदापि तडजोड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:25 IST

शिक्षणामुळेच प्रगती शक्य आहे. शिक्षणाचे महत्व मोठे असून शिक्षणच मानवाचे रक्षण करते. यापुढे माओवाद, नक्षलवाद चालणार नाही तर केवळ आंबेडकर वाद झालेल. आंबेडकरी चळवळ पुढे घेवून जाण्याची गरज आहे. आम्ही आपल्या भुमिकेवर ठाम असून विचारांशी आम्ही कदापी तडजोड करीत नाही, असे रोकठोक प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केले.

ठळक मुद्देरामदास आठवले : तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शिक्षणामुळेच प्रगती शक्य आहे. शिक्षणाचे महत्व मोठे असून शिक्षणच मानवाचे रक्षण करते. यापुढे माओवाद, नक्षलवाद चालणार नाही तर केवळ आंबेडकर वाद झालेल. आंबेडकरी चळवळ पुढे घेवून जाण्याची गरज आहे. आम्ही आपल्या भुमिकेवर ठाम असून विचारांशी आम्ही कदापी तडजोड करीत नाही, असे रोकठोक प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केले.इंदुताई शिक्षण संस्थेच्या वतीने तुमसर येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ. सच्चिदानंद फुलेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मधुकर कुकडे, आमदार परिणय फुके, माजी कुलसचिव पुरण मेश्राम, राजन वाघमारे, माजी कुलगुरु सुधिर मेश्राम, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष भुपेंद्र थुलकर, डॉ. मधुसुदन फुलेकर, डॉ. एन. एम. खिराडे, डॉ. अनिल हिरेखन, प्रभाकर दुपारे, डॉ. विनोद भोयर, भदंत राहुल बोधी, माजी नगराध्यक्ष गिता कोंडेवार उपस्थित होते.केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, अ‍ॅट्रॉसिटी रद्द करणे, आरक्षण रद्द करणे इत्यादी विरोधात आमची ठोस भूमिका मत्रिमंडळात मांडली. गोरगरीब दलितांचे प्रश्न सोडविताना तडजोड केली जात नाही. आम्हाला देशात आंबेडकरी चळवळ उभी करायची आहे. शांततामय बुद्धाच्या मार्गाने जावे लागे, भीमाने इतिहास बदलविलेला, आम्हाला जयभीमचा नारा हवा, शाळा, महाविद्यालयात मानवतेचे शिक्षण देण्यावर भर दिला. असे सांगत पुन्हा देशात एनडीएचे सरकार येईल असे सांगितले. यावेळी नामदार आठवले यांनी कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी नामदार आठवले यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण व तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले.आमदार परिणय फुके व खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. सच्चिदानंद फुलेकर यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक बिसेन यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक विद्याताई फुलेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.