शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पवनी येथील दिवाण घाट नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

भोसलेकालीन दिवाण घाट शहराचे वैभव आहे. पवनी येथील नागरिक वैनगंगेवर स्नानासाठी याच घाटावर जात होते. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. मोठा दरवाजा तर चिरे निखळल्याने बंद करावा लागला आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक स्थळ दुर्लक्षित । पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता, मात्र कायम दुर्लक्ष

अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवनी शहरातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित असून शहराचे वैभव असलेला दिवाण घाट आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पर्यटन विकासाकडे कुणाचेही लक्ष नसल्याने हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे.विदर्भासाठी पर्यटनाचे प्रमुख केंद्र होण्याची क्षमता पवनी नगरात आहे. पवन राजाची पवनी असा उल्लेख पौराणिक ग्रंथात असून सम्राट अशोकाचे वास्तव्य या पवनी नगरात होते. संपन्न ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरात पर्यटनस्थळांची मांदियाळी आहे. महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य. सिंदपुरी येथील आंतरराष्ट्रीय महासमाधीभूमी, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश, धरणीधर गणेश, रांजीतील गणपती यासह ऐतीहासिक परकोट, जवाहर गेट स्तूप या शहरात आहेत. वैनगंगा नदीच्या विशाल पात्राच्या तिरावर देखणे घाट आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता या सर्व स्थळांत आहे. परंतु इच्छाशक्तीअभावी दिवाण घाटासारखा ऐतिहासिक वारसा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.भोसलेकालीन दिवाण घाट शहराचे वैभव आहे. पवनी येथील नागरिक वैनगंगेवर स्नानासाठी याच घाटावर जात होते. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. मोठा दरवाजा तर चिरे निखळल्याने बंद करावा लागला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर हा वारसा नामशेष होण्याची भीती आहे. शहरातील वैजेश्वर घाटाला महत्व दिले जाते. परंतु दिवाण घाटाकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही.पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न हवेभारतीय पुरातत्व विभाग महाराष्ट्र पर्यटन विकास, नगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या नामशेष होत असलेल्या घाटांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत नाही. पवनीतील नागरिकांना अजीबात फायदा नसलेल्या बाबींवर लक्षवेधी रुपये खर्च करण्यात धन्यता वाटते. परंतु पर्यटनाला चालना मिळेल असे ऐतिहासिक घाट दुर्लक्षित केले जात आहे. या घाटांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र सध्या दिवाण घाटाच्या सौंदर्यीकरणासाठी कोणत्याही उपाययोजना नाही.

टॅग्स :Fortगड