शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पवनी येथील दिवाण घाट नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

भोसलेकालीन दिवाण घाट शहराचे वैभव आहे. पवनी येथील नागरिक वैनगंगेवर स्नानासाठी याच घाटावर जात होते. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. मोठा दरवाजा तर चिरे निखळल्याने बंद करावा लागला आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक स्थळ दुर्लक्षित । पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता, मात्र कायम दुर्लक्ष

अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवनी शहरातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित असून शहराचे वैभव असलेला दिवाण घाट आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पर्यटन विकासाकडे कुणाचेही लक्ष नसल्याने हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे.विदर्भासाठी पर्यटनाचे प्रमुख केंद्र होण्याची क्षमता पवनी नगरात आहे. पवन राजाची पवनी असा उल्लेख पौराणिक ग्रंथात असून सम्राट अशोकाचे वास्तव्य या पवनी नगरात होते. संपन्न ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरात पर्यटनस्थळांची मांदियाळी आहे. महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य. सिंदपुरी येथील आंतरराष्ट्रीय महासमाधीभूमी, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश, धरणीधर गणेश, रांजीतील गणपती यासह ऐतीहासिक परकोट, जवाहर गेट स्तूप या शहरात आहेत. वैनगंगा नदीच्या विशाल पात्राच्या तिरावर देखणे घाट आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता या सर्व स्थळांत आहे. परंतु इच्छाशक्तीअभावी दिवाण घाटासारखा ऐतिहासिक वारसा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.भोसलेकालीन दिवाण घाट शहराचे वैभव आहे. पवनी येथील नागरिक वैनगंगेवर स्नानासाठी याच घाटावर जात होते. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. मोठा दरवाजा तर चिरे निखळल्याने बंद करावा लागला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर हा वारसा नामशेष होण्याची भीती आहे. शहरातील वैजेश्वर घाटाला महत्व दिले जाते. परंतु दिवाण घाटाकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही.पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न हवेभारतीय पुरातत्व विभाग महाराष्ट्र पर्यटन विकास, नगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या नामशेष होत असलेल्या घाटांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत नाही. पवनीतील नागरिकांना अजीबात फायदा नसलेल्या बाबींवर लक्षवेधी रुपये खर्च करण्यात धन्यता वाटते. परंतु पर्यटनाला चालना मिळेल असे ऐतिहासिक घाट दुर्लक्षित केले जात आहे. या घाटांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र सध्या दिवाण घाटाच्या सौंदर्यीकरणासाठी कोणत्याही उपाययोजना नाही.

टॅग्स :Fortगड