शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: May 25, 2017 00:16 IST

तुमसर तालुक्यातील जनतेची तृष्णा भागविण्याकरिता बावनथडी धरणातून ८३ क्युबीकचा प्रवाह बुधवारी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला.

८३ क्युबिक पाणी सोडले : वाघमारे यांच्या प्रयत्नाला यशलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील जनतेची तृष्णा भागविण्याकरिता बावनथडी धरणातून ८३ क्युबीकचा प्रवाह बुधवारी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घालून पाणी विसर्ग करण्याकरिता बाध्य केले.तुमसर तालुक्यात यावर्षी भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. बावनथडीतथा वैनगंगेचे नदीपात्र कोरडे पडले आहे. मार्च महिन्यातच पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती. तत्पूर्वी धान पिकाकरिता सुमारे एक महिन्यापूर्वी बावनथडी धरणातून नदीपात्रात पाणी विसर्ग केले होते. सध्या वैनगंगा नदीकाठावरील पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहेत. शहरासह व तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याकरिता बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करणे एकमेव पर्याय शिल्लक होता. त्या अनुषंगाने तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आ.चरण वाघमारे यांच्यासमोर समस्या मांडली.तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, पाणी पुरवठा सभापती मेहताबसिंग ठाकुर यांनी मुंबईत आ.चरण वाघमारे यांची भेट घेऊन शहराच्या पाणीपुरवठ्याची माहिती दिली. शहरात तीव्र जलसंकट निर्माण झाले असून बावनथडीचे पाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही. हीच स्थिती तालुक्याची आहे.आ.चरण वाघमारे यांनी राज्याचे जलसचिव तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाणीटंचाईची सविस्तर माहिती दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांचेशी चर्चा करून बावनथडी धरणाचे पाणी विसर्ग करण्यास होकार दिला. बुधवारी सकाळी १० वाजता दुपारी ३ वाजता बावनथडी धरणातून ८३ क्युबीकचा प्रवाह दीपात्रात विसर्ग करण्यात आला. बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.एस. गेडाम यांनी पाणी विसर्ग करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.