शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:37 IST

तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने मध्यप्रदेशातील ४० गावे तथा तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात जलसंकट निर्माण झाल्याने रविवारी सकाळी ११ वाजता बावनथडी (राजीवसागर) धरणातून पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

ठळक मुद्देसोमवारी पुन्हा सोडणार पाणी : नदीकाठावरील गावांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने मध्यप्रदेशातील ४० गावे तथा तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात जलसंकट निर्माण झाल्याने रविवारी सकाळी ११ वाजता बावनथडी (राजीवसागर) धरणातून पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोमवारी पुन्हा पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तुमसरचे आ. चरण वाघमारे, मध्यप्रदेशातील आ. के.डी. देशमुख, बालाघाटचे खासदार बोधसिंग भगत यांच्या प्रयत्नामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याचा संयुक्त प्रकल्प बावनथडी नदीवर राजीवसागर आहे. दोन्ही राज्याला समप्रमाणात पाण्याचा वाटप करण्यात येते. मध्यप्रदेशातील बालाघाट, वाराशिवनीसह परिसरातील ४० ते ५० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व शेतीकरिता पाण्याची नितांत गरज आहे. तुमसर तालुक्यातील बावनथडी नदी काठावरील गावातही पिण्याचे पाणी व शेतीकरिता धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.आ. चरण वाघमारे, मध्यप्रदेशातील आ. के.डी. देशमुख, खा. बोधसिंग भगत यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकारी, तथा राज्य सरकारला पाण्याचा विसर्ग करण्याकरिता साकडे घातले होते. बावनथडी नदी सध्या कोरडी पडली आहे. पाच टीएमसी पाणी रविवारी सोडण्यात आले, परंतु कोरडी नदी असल्याने पाणी नदीत जिरले. मोवाडपर्यंत पाणी जाण्याकरिता पुन्हा पाच टीएमसी पाणी सोमवारी सोडणार असल्याची माहिती मध्यप्रदेशातील धरणाचे तांत्रिक कर्मचारी ठाकरे यांनी लोकमतला दिली. बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गेडाम, उपविभागीय अधिकारी पाखमोडे यांचेशी संपर्क केल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला नाही.