शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:37 IST

तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने मध्यप्रदेशातील ४० गावे तथा तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात जलसंकट निर्माण झाल्याने रविवारी सकाळी ११ वाजता बावनथडी (राजीवसागर) धरणातून पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

ठळक मुद्देसोमवारी पुन्हा सोडणार पाणी : नदीकाठावरील गावांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने मध्यप्रदेशातील ४० गावे तथा तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात जलसंकट निर्माण झाल्याने रविवारी सकाळी ११ वाजता बावनथडी (राजीवसागर) धरणातून पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोमवारी पुन्हा पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तुमसरचे आ. चरण वाघमारे, मध्यप्रदेशातील आ. के.डी. देशमुख, बालाघाटचे खासदार बोधसिंग भगत यांच्या प्रयत्नामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याचा संयुक्त प्रकल्प बावनथडी नदीवर राजीवसागर आहे. दोन्ही राज्याला समप्रमाणात पाण्याचा वाटप करण्यात येते. मध्यप्रदेशातील बालाघाट, वाराशिवनीसह परिसरातील ४० ते ५० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व शेतीकरिता पाण्याची नितांत गरज आहे. तुमसर तालुक्यातील बावनथडी नदी काठावरील गावातही पिण्याचे पाणी व शेतीकरिता धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.आ. चरण वाघमारे, मध्यप्रदेशातील आ. के.डी. देशमुख, खा. बोधसिंग भगत यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकारी, तथा राज्य सरकारला पाण्याचा विसर्ग करण्याकरिता साकडे घातले होते. बावनथडी नदी सध्या कोरडी पडली आहे. पाच टीएमसी पाणी रविवारी सोडण्यात आले, परंतु कोरडी नदी असल्याने पाणी नदीत जिरले. मोवाडपर्यंत पाणी जाण्याकरिता पुन्हा पाच टीएमसी पाणी सोमवारी सोडणार असल्याची माहिती मध्यप्रदेशातील धरणाचे तांत्रिक कर्मचारी ठाकरे यांनी लोकमतला दिली. बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गेडाम, उपविभागीय अधिकारी पाखमोडे यांचेशी संपर्क केल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला नाही.