शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:37 IST

तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने मध्यप्रदेशातील ४० गावे तथा तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात जलसंकट निर्माण झाल्याने रविवारी सकाळी ११ वाजता बावनथडी (राजीवसागर) धरणातून पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

ठळक मुद्देसोमवारी पुन्हा सोडणार पाणी : नदीकाठावरील गावांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने मध्यप्रदेशातील ४० गावे तथा तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात जलसंकट निर्माण झाल्याने रविवारी सकाळी ११ वाजता बावनथडी (राजीवसागर) धरणातून पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोमवारी पुन्हा पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तुमसरचे आ. चरण वाघमारे, मध्यप्रदेशातील आ. के.डी. देशमुख, बालाघाटचे खासदार बोधसिंग भगत यांच्या प्रयत्नामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याचा संयुक्त प्रकल्प बावनथडी नदीवर राजीवसागर आहे. दोन्ही राज्याला समप्रमाणात पाण्याचा वाटप करण्यात येते. मध्यप्रदेशातील बालाघाट, वाराशिवनीसह परिसरातील ४० ते ५० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व शेतीकरिता पाण्याची नितांत गरज आहे. तुमसर तालुक्यातील बावनथडी नदी काठावरील गावातही पिण्याचे पाणी व शेतीकरिता धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.आ. चरण वाघमारे, मध्यप्रदेशातील आ. के.डी. देशमुख, खा. बोधसिंग भगत यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकारी, तथा राज्य सरकारला पाण्याचा विसर्ग करण्याकरिता साकडे घातले होते. बावनथडी नदी सध्या कोरडी पडली आहे. पाच टीएमसी पाणी रविवारी सोडण्यात आले, परंतु कोरडी नदी असल्याने पाणी नदीत जिरले. मोवाडपर्यंत पाणी जाण्याकरिता पुन्हा पाच टीएमसी पाणी सोमवारी सोडणार असल्याची माहिती मध्यप्रदेशातील धरणाचे तांत्रिक कर्मचारी ठाकरे यांनी लोकमतला दिली. बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गेडाम, उपविभागीय अधिकारी पाखमोडे यांचेशी संपर्क केल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला नाही.