शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

३९ लाख रुपयांचा पाणी पट्टीकर थकीत

By admin | Updated: March 12, 2016 00:35 IST

दीड लक्ष नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या भंडारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी पाणी पट्टीकर लक्षावधी रूपयांनी अडवून ठेवला आहे.

इंद्रपाल कटकवार भंडारादीड लक्ष नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या भंडारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी पाणी पट्टीकर लक्षावधी रूपयांनी अडवून ठेवला आहे. जवळपास ३९ लक्ष रूपये थकीत असल्याने बरीचशी कामेही अडकली आहेत. शहरात शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याची बोंब असताना दुसरीकडे नागरिक व शासकीय कार्यालयांनी लक्षावधींची पाण्याची बिले लटकवून ठेवली आहे.तृष्णातृप्ती करणारे पाणी वैनगंगेच्या पदरात असतानाही भंडारेकरांना शुद्ध पाण्यासाठी तरसावे लागत असल्याचा प्रकाराला भंडारेकर वैतागले. कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मुबलकता यावी, या दृष्टीकोनातून साकारण्यात येणारे प्रयत्न व निर्णय फसले आहेत. भविष्यकालीन योजना अंमलात आणण्याची तयारी सुरू झालेली नाही.हा उन्हाळाही नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठ्यात काढावा लागणार आहे. दुसरीकडे दीड दशकापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून भंडारा शहरात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगर पलिकेच्या खांद्यावर देण्यात आली. आजघडीला शहरात जवळपास १० हजार ५०० च्यावर नळ ग्राहकांची संख्या आहे. ज्या शासकीय कार्यालयांमध्ये पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरवठा केला जातो, त्या कार्यालयांची बिले नियमित असल्याचे दिसून येते.नागरिकांनी वेळेवर पाणी पट्टीकर दिल्यास त्याचा नगर पलिकेला फायदाच होईल. पाण्याची समस्या पाहता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच शहरात कुठेही जलवाहिनी लिकेज असल्यास त्याची माहिती पाणी पुरवठा विभागाला द्यावी, याची तत्काळ दखल घेण्यात येईल.- रवींद्र देवतळे, मुख्याधिकारी, नगर परिषद, भंडारा.१ कोटी ८३ लाख रूपयांचे उद्दिष्टभंडारा नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सन २०१५-१६ मध्ये १ कोटी ८३ लक्ष रूपयांची पाणीपट्टी वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी वित्तीय वर्षात चालु महिन्यात ३९ लाखांची ‘आऊटस्टॅडिंग’ उर्वरित आहे. म्हणजेच नळग्राहकांकडून पाणीपुरठयाचे ३९ लक्ष रूपये घेणे शिल्लक (घेणे) आहे. जीर्ण जलवाहिनी व पालिकेच्या नियोजनशुन्य प्रशासनामुळे शहरातील समांतर पाणी वाटप होत नाही, असे नागरिकांचे म्हणने. अव्वा सव्वा बिल दिले जाते. पाणी येण्यापूर्वी जलवाहिनीतील हव्याच्या दाबामुळे मीटर जलद गतीने फिरते ; मात्र मुबलक व शुद्ध प्रमाणात पाणी मिळत नाही. बील भरण्यासाठी म्हटल्या जाते. हवचा पैसा द्यायचा काय? पंरतु पाणीपुरवठ्याच्या सुविधांमध्ये बदल केला जात नसल्याचे ग्राहकांचे म्हणने आहे.