शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

३९ लाख रुपयांचा पाणी पट्टीकर थकीत

By admin | Updated: March 12, 2016 00:35 IST

दीड लक्ष नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या भंडारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी पाणी पट्टीकर लक्षावधी रूपयांनी अडवून ठेवला आहे.

इंद्रपाल कटकवार भंडारादीड लक्ष नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या भंडारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी पाणी पट्टीकर लक्षावधी रूपयांनी अडवून ठेवला आहे. जवळपास ३९ लक्ष रूपये थकीत असल्याने बरीचशी कामेही अडकली आहेत. शहरात शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याची बोंब असताना दुसरीकडे नागरिक व शासकीय कार्यालयांनी लक्षावधींची पाण्याची बिले लटकवून ठेवली आहे.तृष्णातृप्ती करणारे पाणी वैनगंगेच्या पदरात असतानाही भंडारेकरांना शुद्ध पाण्यासाठी तरसावे लागत असल्याचा प्रकाराला भंडारेकर वैतागले. कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मुबलकता यावी, या दृष्टीकोनातून साकारण्यात येणारे प्रयत्न व निर्णय फसले आहेत. भविष्यकालीन योजना अंमलात आणण्याची तयारी सुरू झालेली नाही.हा उन्हाळाही नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठ्यात काढावा लागणार आहे. दुसरीकडे दीड दशकापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून भंडारा शहरात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगर पलिकेच्या खांद्यावर देण्यात आली. आजघडीला शहरात जवळपास १० हजार ५०० च्यावर नळ ग्राहकांची संख्या आहे. ज्या शासकीय कार्यालयांमध्ये पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरवठा केला जातो, त्या कार्यालयांची बिले नियमित असल्याचे दिसून येते.नागरिकांनी वेळेवर पाणी पट्टीकर दिल्यास त्याचा नगर पलिकेला फायदाच होईल. पाण्याची समस्या पाहता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच शहरात कुठेही जलवाहिनी लिकेज असल्यास त्याची माहिती पाणी पुरवठा विभागाला द्यावी, याची तत्काळ दखल घेण्यात येईल.- रवींद्र देवतळे, मुख्याधिकारी, नगर परिषद, भंडारा.१ कोटी ८३ लाख रूपयांचे उद्दिष्टभंडारा नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सन २०१५-१६ मध्ये १ कोटी ८३ लक्ष रूपयांची पाणीपट्टी वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी वित्तीय वर्षात चालु महिन्यात ३९ लाखांची ‘आऊटस्टॅडिंग’ उर्वरित आहे. म्हणजेच नळग्राहकांकडून पाणीपुरठयाचे ३९ लक्ष रूपये घेणे शिल्लक (घेणे) आहे. जीर्ण जलवाहिनी व पालिकेच्या नियोजनशुन्य प्रशासनामुळे शहरातील समांतर पाणी वाटप होत नाही, असे नागरिकांचे म्हणने. अव्वा सव्वा बिल दिले जाते. पाणी येण्यापूर्वी जलवाहिनीतील हव्याच्या दाबामुळे मीटर जलद गतीने फिरते ; मात्र मुबलक व शुद्ध प्रमाणात पाणी मिळत नाही. बील भरण्यासाठी म्हटल्या जाते. हवचा पैसा द्यायचा काय? पंरतु पाणीपुरवठ्याच्या सुविधांमध्ये बदल केला जात नसल्याचे ग्राहकांचे म्हणने आहे.