शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

वैनगंगेच्या कोरड्या पात्रात पाणीच पाणी

By admin | Updated: May 30, 2017 00:22 IST

कवलेवाडा बॅरेजमधून कोरड्या वैनगंगेच्या पात्रात पाणी विसर्ग करण्यात आले. पाणी विसर्ग केल्याने ...

७० हजार नागरिकांना दिलासा : कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्गलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कवलेवाडा बॅरेजमधून कोरड्या वैनगंगेच्या पात्रात पाणी विसर्ग करण्यात आले. पाणी विसर्ग केल्याने तुमसर शहरासह २० ते २५ गावांतील ७० हजार नागरिकांची पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. प्रथमच कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला हे विशेष. आ. चरण वाघमारे यांच्या प्रयत्नांना येथे यश आले.तुमसर शहरासह तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यापूर्वी बावनथडी प्रकल्पातून एका महिन्यापुर्वी धान पिकाकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात आले होते. त्यानंतर तीव्र पाणीटंचाईवर मात करण्याकरीता बावनथडी प्रकल्पातून पाणी विसर्ग करण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु बावनथडी प्रकल्पात पाणीसाठी शिल्लक कमी असल्याची कारणे पुढे करण्यात आली.बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची जबाबदारी व नियंत्रण मध्यप्रदेश शासनाकडे आहे. मध्यप्रदेश शासनाकडे आ. चरण वाघमारे यांनी पाठपुरावा केला होता. आ. वाघमारे यांनी नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता साकडे घातले. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचेशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. २३ मे रोजी बावनथडी धरणातून ८३ क्सुसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आले.तीन दिवसानंतर हे पाणी कवलेवाडा बॅरेजमध्ये पोहोचले. कवलेवाडा बॅरेजमधून रविवारी सकाळी १० वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात आले. माडगी येथील वैनगंगा पात्रात ते पाणी सोमवारी पहाटे ३ वाजता पोहोचले. नदीपात्रात सध्या पाणीच पाणी दिसत आहे. किमान आठवडाभर पाण्याचा अल्प प्रवाह कवलेवाडा बॅरेजमधून सोडला जाणार आहे. तुमसर शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याच्या मार्गावर होता. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, पाणीपुरवठा सभापती मेहताब सिंग ठाकूर, उपाध्यक्ष कांचन कोडवानी तथा इतर नगरसेवकांनी कवलेवाडा बॅरेजमधून पाणी सोडण्याकरिता आ. चरण वाघमारे यांना भेटून पाणी समस्या सांगितली होती. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी कवलेवाडा बॅरेजमधून पाणी विसर्ग करण्याकरीता जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. पाणी प्रश्न पेटण्यापुर्वीच प्रशासनाने कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग केला.