शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वैनगंगेच्या कोरड्या पात्रात पाणीच पाणी

By admin | Updated: May 30, 2017 00:22 IST

कवलेवाडा बॅरेजमधून कोरड्या वैनगंगेच्या पात्रात पाणी विसर्ग करण्यात आले. पाणी विसर्ग केल्याने ...

७० हजार नागरिकांना दिलासा : कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्गलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कवलेवाडा बॅरेजमधून कोरड्या वैनगंगेच्या पात्रात पाणी विसर्ग करण्यात आले. पाणी विसर्ग केल्याने तुमसर शहरासह २० ते २५ गावांतील ७० हजार नागरिकांची पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. प्रथमच कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला हे विशेष. आ. चरण वाघमारे यांच्या प्रयत्नांना येथे यश आले.तुमसर शहरासह तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यापूर्वी बावनथडी प्रकल्पातून एका महिन्यापुर्वी धान पिकाकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात आले होते. त्यानंतर तीव्र पाणीटंचाईवर मात करण्याकरीता बावनथडी प्रकल्पातून पाणी विसर्ग करण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु बावनथडी प्रकल्पात पाणीसाठी शिल्लक कमी असल्याची कारणे पुढे करण्यात आली.बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची जबाबदारी व नियंत्रण मध्यप्रदेश शासनाकडे आहे. मध्यप्रदेश शासनाकडे आ. चरण वाघमारे यांनी पाठपुरावा केला होता. आ. वाघमारे यांनी नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता साकडे घातले. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचेशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. २३ मे रोजी बावनथडी धरणातून ८३ क्सुसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आले.तीन दिवसानंतर हे पाणी कवलेवाडा बॅरेजमध्ये पोहोचले. कवलेवाडा बॅरेजमधून रविवारी सकाळी १० वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात आले. माडगी येथील वैनगंगा पात्रात ते पाणी सोमवारी पहाटे ३ वाजता पोहोचले. नदीपात्रात सध्या पाणीच पाणी दिसत आहे. किमान आठवडाभर पाण्याचा अल्प प्रवाह कवलेवाडा बॅरेजमधून सोडला जाणार आहे. तुमसर शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याच्या मार्गावर होता. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, पाणीपुरवठा सभापती मेहताब सिंग ठाकूर, उपाध्यक्ष कांचन कोडवानी तथा इतर नगरसेवकांनी कवलेवाडा बॅरेजमधून पाणी सोडण्याकरिता आ. चरण वाघमारे यांना भेटून पाणी समस्या सांगितली होती. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी कवलेवाडा बॅरेजमधून पाणी विसर्ग करण्याकरीता जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. पाणी प्रश्न पेटण्यापुर्वीच प्रशासनाने कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग केला.