शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
7
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
8
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
9
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
10
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
11
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
12
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
13
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
14
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
15
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
16
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
17
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
18
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
19
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
20
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप

वैनगंगेच्या कोरड्या पात्रात पाणीच पाणी

By admin | Updated: May 30, 2017 00:22 IST

कवलेवाडा बॅरेजमधून कोरड्या वैनगंगेच्या पात्रात पाणी विसर्ग करण्यात आले. पाणी विसर्ग केल्याने ...

७० हजार नागरिकांना दिलासा : कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्गलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कवलेवाडा बॅरेजमधून कोरड्या वैनगंगेच्या पात्रात पाणी विसर्ग करण्यात आले. पाणी विसर्ग केल्याने तुमसर शहरासह २० ते २५ गावांतील ७० हजार नागरिकांची पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. प्रथमच कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला हे विशेष. आ. चरण वाघमारे यांच्या प्रयत्नांना येथे यश आले.तुमसर शहरासह तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यापूर्वी बावनथडी प्रकल्पातून एका महिन्यापुर्वी धान पिकाकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात आले होते. त्यानंतर तीव्र पाणीटंचाईवर मात करण्याकरीता बावनथडी प्रकल्पातून पाणी विसर्ग करण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु बावनथडी प्रकल्पात पाणीसाठी शिल्लक कमी असल्याची कारणे पुढे करण्यात आली.बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची जबाबदारी व नियंत्रण मध्यप्रदेश शासनाकडे आहे. मध्यप्रदेश शासनाकडे आ. चरण वाघमारे यांनी पाठपुरावा केला होता. आ. वाघमारे यांनी नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता साकडे घातले. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचेशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. २३ मे रोजी बावनथडी धरणातून ८३ क्सुसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आले.तीन दिवसानंतर हे पाणी कवलेवाडा बॅरेजमध्ये पोहोचले. कवलेवाडा बॅरेजमधून रविवारी सकाळी १० वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात आले. माडगी येथील वैनगंगा पात्रात ते पाणी सोमवारी पहाटे ३ वाजता पोहोचले. नदीपात्रात सध्या पाणीच पाणी दिसत आहे. किमान आठवडाभर पाण्याचा अल्प प्रवाह कवलेवाडा बॅरेजमधून सोडला जाणार आहे. तुमसर शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याच्या मार्गावर होता. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, पाणीपुरवठा सभापती मेहताब सिंग ठाकूर, उपाध्यक्ष कांचन कोडवानी तथा इतर नगरसेवकांनी कवलेवाडा बॅरेजमधून पाणी सोडण्याकरिता आ. चरण वाघमारे यांना भेटून पाणी समस्या सांगितली होती. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी कवलेवाडा बॅरेजमधून पाणी विसर्ग करण्याकरीता जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. पाणी प्रश्न पेटण्यापुर्वीच प्रशासनाने कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग केला.