शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

जलयुक्त शिवाराने शेततळे, बंधारे तुडूंब

By admin | Updated: July 31, 2016 00:23 IST

शासनाचे जलयुक्तशिवार अभियान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे.

विहिरींची पातळी वाढली : मोहाडी तालुक्यातील शेतीला संजीवनी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर फुलले हास्यभंडारा : शासनाचे जलयुक्तशिवार अभियान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोहाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यात १५ गावांचा समावेश करण्यात आला. या गावात सर्व यंत्रणांनी मिळून शेततळे, सिमेंटनाला बांध, नाला खोलीकरण, मजगी, साठवण तलाव दुरुस्ती, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती, बोडी नूतनीकरण व भातखाचरे पुनर्जीवन अशी २४३ कामे पूर्ण झाली आहेत.जलयुक्त शिवार अभियानात पूर्ण झालेल्या कामात पाणी साठले असून याचा वापर शेतकरी धान पिकासाठी करत आहे. मोहाडी तालुक्यात या मोसमात जलयुक्त शिवारच्या कामात १७०० टिसीएम पाणीसाठा झाला असून याद्वारे १७०० हेक्टर संरक्षित सिंचन होणे अपेक्षित आहे. २०१५-१६ मध्ये करडी, मोहगाव, बोरी, बच्छेरा, उसर्रा, टांगा, देव्हाडा, नरसिंहटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव, कांद्री, शिवनी व खैरलांजी या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. मोहाडी तालुक्यात नालाबांध व शेततळे तुडूंब भरले असून विहिरीच्या पातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात शेततळे ३१, सिमेंट नालाबांध १९, नाला खोलीकरण ५५, सिमेंट नालाबांध दुरुस्ती १७, मजगी १८ (३५ हेक्टर), साठवण तलाव १३, बोडी नूतनीकरण ७, भातखाचरे पुनर्जीवन ८२ (१२४ हेक्टर) अशी एकूण २४३ कामे पूर्ण झाली आहेत. झालेल्या कामात १७०० टीसीएम पाणी साठले असून या पाण्यावर १७०० हेक्टर संरक्षित सिंचन होणार आहे. जलयुक्त शिवारामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात आले असून त्याचा वापर सिंचनासाठी होत आहे. धान रोवणीसाठी या पाण्याचा वापर केला आहे. पावसाने सरासरी गाठली नसल्याने शेतकऱ्यांच्या मदतीला जलयुक्त शिवारच्या कामातील साठलेले पाणी धावून येत आाहे. (शहर प्रतिनिधी)मोहाडी तालुक्यात १०८ गावे असून त्यापैकी १५ गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. अडलेल्या पाण्याचा शेतकरी सिंचनासाठी वापर करीत आहेत. बांध व शेततळ्यात साठलेले पाणी धानासाठी संजीवन ठरत आहे. सोबतच विहिरीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात १० गावांची निवड झाली असून या ठिकाणी कामे सुरु आहेत.- आर.जे. पात्रीकरतालुका कृषी अधिकारी, मोहाडी