शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जलशुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा

By admin | Updated: April 5, 2017 00:19 IST

येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरटीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

केंद्रात तुरटीचा तुटवडा : नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्हभंडारा : येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरटीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील आठ दिवसांपासून तुरटीअभावी दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला विद्युतभार नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. वस्तुमान वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. त्यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते.येथील जलशुद्धीकरण केंद्रात फाऊंटेनवर तुरटी लावली जाते. त्यातून पाणी शुद्ध होऊन त्यानंतर पाण्यावर उर्वरित प्रक्रिया केली जाते. परंतु, मागील आठ दिवसांपासून तुरटी संपल्याने पाणी शुद्ध होत नाही. नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.सव्वा लाख लोकसंख्येच्या शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठ्याची जबाबदारी नगर पालिकेची आहे. नगर पालिकेची पाणी व मालमत्ता करवसुली सक्तीने सुरू आहे. कर भरण्यासाठी नागरिकांना मीटर काढून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. परिणामी कर वसुली मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. दुसरीकडे, कर भरूनही नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये पालिकेप्रती संताप व्यक्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील तुरटीचे गोदाम रिकामे आहेत. वर्षभरासाठी लागणाऱ्या तुरटीची निविदा काढून ते संबंधित एजन्सीला देण्यात आले. मात्र सदर एजन्सीकडून साहित्याचा पुरवठा बंद आहे. तरीसुद्धा या साहित्याचे देयक मात्र दर महिन्याला काढले जात आहे? संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसातून तीनदा जलकुंभ भरावा लागत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण न करताच नदीतून ओढलेले पाणी जलकुंभात चढविले जात आहे. आणि तेच पाणी नळाद्वारे सोडण्यात येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दूषित पाण्याचे बील का भरायचे? -सूर्यकांत ईलमेदूषित पाणी पुरवठा होण्याला नगर परिषदेचे उदासीन धोरण कारणीभूत ठरत आहे. दूषित पाण्याचा पुरवठा करूनही पिण्याच्या पाण्याचे कर वसुल करण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिने ‘आरओ’ संच बसवून घेण्याची वेळ आली आहे. आहे. आरओ खरेदीचा नाहक खर्च नळधारकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा कर द्यायचे कशाला? असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख सूर्यकांत ईलमे यांनी केला आहे.