शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

जलशुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा

By admin | Updated: April 5, 2017 00:19 IST

येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरटीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

केंद्रात तुरटीचा तुटवडा : नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्हभंडारा : येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरटीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील आठ दिवसांपासून तुरटीअभावी दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला विद्युतभार नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. वस्तुमान वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. त्यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते.येथील जलशुद्धीकरण केंद्रात फाऊंटेनवर तुरटी लावली जाते. त्यातून पाणी शुद्ध होऊन त्यानंतर पाण्यावर उर्वरित प्रक्रिया केली जाते. परंतु, मागील आठ दिवसांपासून तुरटी संपल्याने पाणी शुद्ध होत नाही. नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.सव्वा लाख लोकसंख्येच्या शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठ्याची जबाबदारी नगर पालिकेची आहे. नगर पालिकेची पाणी व मालमत्ता करवसुली सक्तीने सुरू आहे. कर भरण्यासाठी नागरिकांना मीटर काढून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. परिणामी कर वसुली मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. दुसरीकडे, कर भरूनही नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये पालिकेप्रती संताप व्यक्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील तुरटीचे गोदाम रिकामे आहेत. वर्षभरासाठी लागणाऱ्या तुरटीची निविदा काढून ते संबंधित एजन्सीला देण्यात आले. मात्र सदर एजन्सीकडून साहित्याचा पुरवठा बंद आहे. तरीसुद्धा या साहित्याचे देयक मात्र दर महिन्याला काढले जात आहे? संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसातून तीनदा जलकुंभ भरावा लागत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण न करताच नदीतून ओढलेले पाणी जलकुंभात चढविले जात आहे. आणि तेच पाणी नळाद्वारे सोडण्यात येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दूषित पाण्याचे बील का भरायचे? -सूर्यकांत ईलमेदूषित पाणी पुरवठा होण्याला नगर परिषदेचे उदासीन धोरण कारणीभूत ठरत आहे. दूषित पाण्याचा पुरवठा करूनही पिण्याच्या पाण्याचे कर वसुल करण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिने ‘आरओ’ संच बसवून घेण्याची वेळ आली आहे. आहे. आरओ खरेदीचा नाहक खर्च नळधारकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा कर द्यायचे कशाला? असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख सूर्यकांत ईलमे यांनी केला आहे.