शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा

By admin | Updated: April 5, 2017 00:19 IST

येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरटीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

केंद्रात तुरटीचा तुटवडा : नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्हभंडारा : येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरटीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील आठ दिवसांपासून तुरटीअभावी दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला विद्युतभार नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. वस्तुमान वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. त्यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते.येथील जलशुद्धीकरण केंद्रात फाऊंटेनवर तुरटी लावली जाते. त्यातून पाणी शुद्ध होऊन त्यानंतर पाण्यावर उर्वरित प्रक्रिया केली जाते. परंतु, मागील आठ दिवसांपासून तुरटी संपल्याने पाणी शुद्ध होत नाही. नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.सव्वा लाख लोकसंख्येच्या शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठ्याची जबाबदारी नगर पालिकेची आहे. नगर पालिकेची पाणी व मालमत्ता करवसुली सक्तीने सुरू आहे. कर भरण्यासाठी नागरिकांना मीटर काढून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. परिणामी कर वसुली मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. दुसरीकडे, कर भरूनही नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये पालिकेप्रती संताप व्यक्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील तुरटीचे गोदाम रिकामे आहेत. वर्षभरासाठी लागणाऱ्या तुरटीची निविदा काढून ते संबंधित एजन्सीला देण्यात आले. मात्र सदर एजन्सीकडून साहित्याचा पुरवठा बंद आहे. तरीसुद्धा या साहित्याचे देयक मात्र दर महिन्याला काढले जात आहे? संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसातून तीनदा जलकुंभ भरावा लागत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण न करताच नदीतून ओढलेले पाणी जलकुंभात चढविले जात आहे. आणि तेच पाणी नळाद्वारे सोडण्यात येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दूषित पाण्याचे बील का भरायचे? -सूर्यकांत ईलमेदूषित पाणी पुरवठा होण्याला नगर परिषदेचे उदासीन धोरण कारणीभूत ठरत आहे. दूषित पाण्याचा पुरवठा करूनही पिण्याच्या पाण्याचे कर वसुल करण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिने ‘आरओ’ संच बसवून घेण्याची वेळ आली आहे. आहे. आरओ खरेदीचा नाहक खर्च नळधारकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा कर द्यायचे कशाला? असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख सूर्यकांत ईलमे यांनी केला आहे.