शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा

By admin | Updated: April 5, 2017 00:19 IST

येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरटीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

केंद्रात तुरटीचा तुटवडा : नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्हभंडारा : येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरटीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील आठ दिवसांपासून तुरटीअभावी दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला विद्युतभार नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. वस्तुमान वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. त्यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते.येथील जलशुद्धीकरण केंद्रात फाऊंटेनवर तुरटी लावली जाते. त्यातून पाणी शुद्ध होऊन त्यानंतर पाण्यावर उर्वरित प्रक्रिया केली जाते. परंतु, मागील आठ दिवसांपासून तुरटी संपल्याने पाणी शुद्ध होत नाही. नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.सव्वा लाख लोकसंख्येच्या शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठ्याची जबाबदारी नगर पालिकेची आहे. नगर पालिकेची पाणी व मालमत्ता करवसुली सक्तीने सुरू आहे. कर भरण्यासाठी नागरिकांना मीटर काढून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. परिणामी कर वसुली मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. दुसरीकडे, कर भरूनही नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये पालिकेप्रती संताप व्यक्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील तुरटीचे गोदाम रिकामे आहेत. वर्षभरासाठी लागणाऱ्या तुरटीची निविदा काढून ते संबंधित एजन्सीला देण्यात आले. मात्र सदर एजन्सीकडून साहित्याचा पुरवठा बंद आहे. तरीसुद्धा या साहित्याचे देयक मात्र दर महिन्याला काढले जात आहे? संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसातून तीनदा जलकुंभ भरावा लागत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण न करताच नदीतून ओढलेले पाणी जलकुंभात चढविले जात आहे. आणि तेच पाणी नळाद्वारे सोडण्यात येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दूषित पाण्याचे बील का भरायचे? -सूर्यकांत ईलमेदूषित पाणी पुरवठा होण्याला नगर परिषदेचे उदासीन धोरण कारणीभूत ठरत आहे. दूषित पाण्याचा पुरवठा करूनही पिण्याच्या पाण्याचे कर वसुल करण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिने ‘आरओ’ संच बसवून घेण्याची वेळ आली आहे. आहे. आरओ खरेदीचा नाहक खर्च नळधारकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा कर द्यायचे कशाला? असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख सूर्यकांत ईलमे यांनी केला आहे.