शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

१३५ कोटींवर पोहोचली पाणीपुरवठा योजना

By admin | Updated: December 1, 2014 22:48 IST

सव्वा लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहर वासीयांना दोन वेळी पाण्याचा शुध्द पुरवठा व्हावा यासाठी नगर पालिका प्रशासनाने ४ वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजना तयार केली होती. आता दुसऱ्या फेरीत

इंद्रपाल कटकवार - भंडारासव्वा लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहर वासीयांना दोन वेळी पाण्याचा शुध्द पुरवठा व्हावा यासाठी नगर पालिका प्रशासनाने ४ वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजना तयार केली होती. आता दुसऱ्या फेरीत सत्तारुढ झालेल्या सत्ताधाऱ्यांनी पाणीपुरवठा योजनेत बदल करुन ७० कोटींची ही योजना १३५ कोटींपर्यंत गेली आहे. या आशयाचा प्रस्ताव जानेवारी २०१५ पर्यंत पाठविला जाण्याची शक्यता आहे. भंडारा शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेची नितांत गरज होती. याअंतर्गत काही वर्षांपूर्वी नगर पालिकेने सुजल निर्माण व नगरोत्थान योजनेअंतर्गत जवळपास ७० कोटींची योजना तयार केली होती. याचा प्रस्तावही मुंबई येथील संबधित मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. यात प्रथम ट्प्प्यातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सर्वेक्षणासाठी ५० लाखांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला होता. त्याअंतर्गत एनर्जी आॅडीट, वॉटर आॅडीट, ग्राहक सर्वेक्षण, जीआयएस मॅपींग सर्वेक्षण व हायड्रोलिक मॉडयूलींग चे काम करण्याचे ठरविण्यात आले होते. यातील फक्त मॉडयूलींग चे काम शिल्लक असून दुसऱ्या टप्प्यातील कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.आगामी ३० वर्षासाठी ही वाढीव पाणीपुरवठा योजना असून नव्याने बाबू बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आरुढ झालेल्या प्रशासनाने या पाणीपुरवठा योजनेची रुपरेषा काही प्रमाणात बदलली आहे. या योजनेचा समावेश आता ‘अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फार स्मॉल अ‍ॅण्ड मिडीयम टाऊन’ मध्ये करण्यात आला आहे. परिणामी या योजनेचा खर्च ७० कोटी वरुन १३५ कोटीपर्यंत जाण्याची शक्यता अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आशयाच्या प्रस्तावाला अंतिम रुप देण्याचे काम सुरु असून तो प्रस्ताव जानेवारी अखेरी संबंधित मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.