शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात

By admin | Updated: March 30, 2015 00:29 IST

ग्रामीण पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदद्वारे लाखनी व मुरमाडी येथे नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

चंदन मोटघरे  लाखनीग्रामीण पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदद्वारे लाखनी व मुरमाडी येथे नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाळयाला प्रारंभ झाल्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य जानवत असते. स्थानिक नळयोजना लोकांना पिण्याचे शुध्द पाणी पुरविण्यात अपयशी ठरली असुन ग्रामीण पानी पुरवठा योजनेचे ढिसाळ व निष्क्रीय कार्य लोकांसमोर आले आहे. पाणीपुरवठा विभागाने जनतेच्या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे.लाखनी येथे नळयोजनेची २ लक्ष ३५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे येथे जांभळी सडक बंधाऱ्यावरील पंपहाऊसवरुन पाणी पुरविले जाते. पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन सडलेली आहे. वारंवार लिकेज होत असल्याने पाणी वाया जाते. टाकी भरत नाही. दोन बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची टाकी भरली जाते. २५ वर्षापुर्वापासून टाकलेली पाईपलाईन निकृष्ट झाली आहे. पाणी आणण्याच्या समस्येमुळे पाण्याची टाकी अर्धी भरत असते. लाखनी व मुरमाडी येथे एक दिवसाआड पाणी पुरविला जातो. सकाळी ६.१५ वाजता पाणी सुरु केले जाते. कधी विस मिनिट तर कधी पंधरा मिनिट पाण्याचा पुरवठा केला जातो.लाखनी व मुरमाडी येथे १२०० नळ कनेक्शनधारक आहेत. त्यापैकी सध्या १००० नळ कनेक्शन सुरु आहेत. या आर्थिक वर्षात ३ लक्ष ३० हजार रुपयापर्यंत वसुली झाली आहे. अद्यापही ५ लक्ष रुपयांची वसुली बाकी आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजना हा शासनाची योजना पांढरा हत्ती ठरली आहे. सावरी येथील नळयोजना बंद आहे. मागील महिन्यात नळयोजना बंद होती सद्या १० ते १५ मिनिट पाणी पुरवठा होतो. ते सुध्दा एक दिवसाआड. पाणी पुरवठा विभागाचे तीन महिन्यापासून वेतन झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष आहे. नळयोजना निकृष्ट असल्याने तात्काळ दुरुस्ती केली जात नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्येशी काहीही सोयरसुतक राहिलेली नाही. कोट्यवधी रुपयांचा चुराडामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेद्वारे लाखनी येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या २.२५ लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीशेजारी १० वर्षापूर्वी नवीन ७ लक्ष ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. दुर्गाबाई डोह चुलबंद घाटावरुन नवीन टाकीमध्ये पाणी आणण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. प्राधिकरणाद्वारे या योजनेची तपासणी करुन मागील वर्षी १ महिना लाखनी व मुरमाडी येथे पाणी पुरवठा करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे काम पूर्णत्वास आले असून जिल्हा परिषदेकडे या योजनेचे हस्तांतरण झालेले नाही. नवीन योजना सुरु झाल्यानंतर लाखनी शहर, मुरमाडी, सावरी येथील पाण्याला प्रश्नसुटेल, जनतेच्या समस्येपासून दूर पळणारी जिल्हा परिषद नवीन पाणी पुरवठा योजनेची विद्युत बिल दर महिन्याला पाच लक्ष रुपयाच्या जवळ असेल. लाभार्थ्यांची संख्या कमी यामुळे जिल्हा परिषद नवीन योजना स्विकारण्यास टाळाटाळ करत असावी असा अंदाज आहे. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधीरकणाच्या नावावर पाण्याची टाकी व पाईपलाईनसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असून त्याचा लोकांना काहीही फायदा नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेची पाणी पुरवठा योजना तयार असल्याने जिल्हा परिषद जुन्या पाईपालाईन जास्त निधी उपलब्ध करुन देत नाही. ३५ वर्षापूर्वीच्या योजनेवर खर्च करण्यास निधी अपुरा पडत आहे. लाखनी नगरपंचायत झाल्याने लाखनी शहरातील नळ योजना नगर विकास खात्याकडे हस्तांतरित होईल. जीवन प्राधिकरणने पाण्याची टाकी व पाईप लाईन तयार करुन दिली आहे. परंतु अंतर्गत गावातील पाईपलाईन तयार करुन दिलेली नाही. यामुळे पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत आहे. व नवीन योजना जिल्हा परिषदेने स्विकारलेली नाही.- एस. डी. मारबते, शाखा अभियंता, ग्रा.पा.पु.यो. लाखनी