शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात

By admin | Updated: March 30, 2015 00:29 IST

ग्रामीण पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदद्वारे लाखनी व मुरमाडी येथे नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

चंदन मोटघरे  लाखनीग्रामीण पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदद्वारे लाखनी व मुरमाडी येथे नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाळयाला प्रारंभ झाल्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य जानवत असते. स्थानिक नळयोजना लोकांना पिण्याचे शुध्द पाणी पुरविण्यात अपयशी ठरली असुन ग्रामीण पानी पुरवठा योजनेचे ढिसाळ व निष्क्रीय कार्य लोकांसमोर आले आहे. पाणीपुरवठा विभागाने जनतेच्या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे.लाखनी येथे नळयोजनेची २ लक्ष ३५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे येथे जांभळी सडक बंधाऱ्यावरील पंपहाऊसवरुन पाणी पुरविले जाते. पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन सडलेली आहे. वारंवार लिकेज होत असल्याने पाणी वाया जाते. टाकी भरत नाही. दोन बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची टाकी भरली जाते. २५ वर्षापुर्वापासून टाकलेली पाईपलाईन निकृष्ट झाली आहे. पाणी आणण्याच्या समस्येमुळे पाण्याची टाकी अर्धी भरत असते. लाखनी व मुरमाडी येथे एक दिवसाआड पाणी पुरविला जातो. सकाळी ६.१५ वाजता पाणी सुरु केले जाते. कधी विस मिनिट तर कधी पंधरा मिनिट पाण्याचा पुरवठा केला जातो.लाखनी व मुरमाडी येथे १२०० नळ कनेक्शनधारक आहेत. त्यापैकी सध्या १००० नळ कनेक्शन सुरु आहेत. या आर्थिक वर्षात ३ लक्ष ३० हजार रुपयापर्यंत वसुली झाली आहे. अद्यापही ५ लक्ष रुपयांची वसुली बाकी आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजना हा शासनाची योजना पांढरा हत्ती ठरली आहे. सावरी येथील नळयोजना बंद आहे. मागील महिन्यात नळयोजना बंद होती सद्या १० ते १५ मिनिट पाणी पुरवठा होतो. ते सुध्दा एक दिवसाआड. पाणी पुरवठा विभागाचे तीन महिन्यापासून वेतन झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष आहे. नळयोजना निकृष्ट असल्याने तात्काळ दुरुस्ती केली जात नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्येशी काहीही सोयरसुतक राहिलेली नाही. कोट्यवधी रुपयांचा चुराडामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेद्वारे लाखनी येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या २.२५ लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीशेजारी १० वर्षापूर्वी नवीन ७ लक्ष ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. दुर्गाबाई डोह चुलबंद घाटावरुन नवीन टाकीमध्ये पाणी आणण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. प्राधिकरणाद्वारे या योजनेची तपासणी करुन मागील वर्षी १ महिना लाखनी व मुरमाडी येथे पाणी पुरवठा करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे काम पूर्णत्वास आले असून जिल्हा परिषदेकडे या योजनेचे हस्तांतरण झालेले नाही. नवीन योजना सुरु झाल्यानंतर लाखनी शहर, मुरमाडी, सावरी येथील पाण्याला प्रश्नसुटेल, जनतेच्या समस्येपासून दूर पळणारी जिल्हा परिषद नवीन पाणी पुरवठा योजनेची विद्युत बिल दर महिन्याला पाच लक्ष रुपयाच्या जवळ असेल. लाभार्थ्यांची संख्या कमी यामुळे जिल्हा परिषद नवीन योजना स्विकारण्यास टाळाटाळ करत असावी असा अंदाज आहे. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधीरकणाच्या नावावर पाण्याची टाकी व पाईपलाईनसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असून त्याचा लोकांना काहीही फायदा नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेची पाणी पुरवठा योजना तयार असल्याने जिल्हा परिषद जुन्या पाईपालाईन जास्त निधी उपलब्ध करुन देत नाही. ३५ वर्षापूर्वीच्या योजनेवर खर्च करण्यास निधी अपुरा पडत आहे. लाखनी नगरपंचायत झाल्याने लाखनी शहरातील नळ योजना नगर विकास खात्याकडे हस्तांतरित होईल. जीवन प्राधिकरणने पाण्याची टाकी व पाईप लाईन तयार करुन दिली आहे. परंतु अंतर्गत गावातील पाईपलाईन तयार करुन दिलेली नाही. यामुळे पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत आहे. व नवीन योजना जिल्हा परिषदेने स्विकारलेली नाही.- एस. डी. मारबते, शाखा अभियंता, ग्रा.पा.पु.यो. लाखनी