शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

सीमावर्ती गावात पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: May 11, 2015 00:12 IST

सिहोरा परिसरातील गावांगावात नळयोजना असल्याने पाणी टंचाई नसली तरी बावनथडी नदीचे पात्र आटल्याने ...

प्रकल्प कोरडा : महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील गावे प्रभावितचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील गावांगावात नळयोजना असल्याने पाणी टंचाई नसली तरी बावनथडी नदीचे पात्र आटल्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती गावात भीषण पाणी टंचाई सुरु झाली आहे. यामुळे राजीव सागर प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची ओरड गावात आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा नदीपात्रात धरणात पाणी अडविण्यात आल्याने नळ योजनांना संजीवनी मिळाली आहे. परंतु बावनथडी नदीचे पात्र यात अपवाद ठरले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस या नदीचे पात्र पूर्णत: आटले आहे. या नदीच्या काठावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याचे सीमावर्ती गावे असून पात्रात गावांना पाणी पुरवठा कारणाऱ्या नळ योजनांचे पंपगृह आहेत. नदीपात्रात पाणीच नसल्याने नळयोजनांचे पंपगृह अडचणीत आले आहे. या शिवाय पाल्याची पातळी खोलवर गेल्याने गावातील विहिरी आणि हातपंपांना पाणी टंचाईची झळ पोहचली आहे. यामुळे गावात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु आहे. जंगलव्याप्त भागात या गावांचे वास्तव्य असून जनावरांची मोठी संख्या गावकऱ्यांकडे आहे. नदीपात्रात पाणी नसल्याने पिण्याचे पाणी प्राप्त करण्यासाठी जनावरांची लाही लाही सुरु झाली आहे. पाण्यासाठी मध्यप्रदेशातील जनावरे सीमावर्ती गावात दाखल होत आहेत.याच नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. धरण पूर्णत: कोरडा पडला आहे. या नदीवर महत्वाकांक्षी राजीव सागर प्रकल्प असून नदीपात्रात पाणी सोडण्याची ओरड गावात सुरु झाली आहे. नागरिकांना पिण्याची पाणी मिळत नाही. प्रकल्पात पाणी असताना नियोजन करण्यात येत नाही. नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणी मिळत नाही. यावरून प्रकल्पात असणाऱ्या पाण्याचा काय उपयोग असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. यामुळे परिसरात पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे.