शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

सीमावर्ती गावात पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: May 11, 2015 00:12 IST

सिहोरा परिसरातील गावांगावात नळयोजना असल्याने पाणी टंचाई नसली तरी बावनथडी नदीचे पात्र आटल्याने ...

प्रकल्प कोरडा : महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील गावे प्रभावितचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील गावांगावात नळयोजना असल्याने पाणी टंचाई नसली तरी बावनथडी नदीचे पात्र आटल्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती गावात भीषण पाणी टंचाई सुरु झाली आहे. यामुळे राजीव सागर प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची ओरड गावात आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा नदीपात्रात धरणात पाणी अडविण्यात आल्याने नळ योजनांना संजीवनी मिळाली आहे. परंतु बावनथडी नदीचे पात्र यात अपवाद ठरले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस या नदीचे पात्र पूर्णत: आटले आहे. या नदीच्या काठावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याचे सीमावर्ती गावे असून पात्रात गावांना पाणी पुरवठा कारणाऱ्या नळ योजनांचे पंपगृह आहेत. नदीपात्रात पाणीच नसल्याने नळयोजनांचे पंपगृह अडचणीत आले आहे. या शिवाय पाल्याची पातळी खोलवर गेल्याने गावातील विहिरी आणि हातपंपांना पाणी टंचाईची झळ पोहचली आहे. यामुळे गावात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु आहे. जंगलव्याप्त भागात या गावांचे वास्तव्य असून जनावरांची मोठी संख्या गावकऱ्यांकडे आहे. नदीपात्रात पाणी नसल्याने पिण्याचे पाणी प्राप्त करण्यासाठी जनावरांची लाही लाही सुरु झाली आहे. पाण्यासाठी मध्यप्रदेशातील जनावरे सीमावर्ती गावात दाखल होत आहेत.याच नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. धरण पूर्णत: कोरडा पडला आहे. या नदीवर महत्वाकांक्षी राजीव सागर प्रकल्प असून नदीपात्रात पाणी सोडण्याची ओरड गावात सुरु झाली आहे. नागरिकांना पिण्याची पाणी मिळत नाही. प्रकल्पात पाणी असताना नियोजन करण्यात येत नाही. नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणी मिळत नाही. यावरून प्रकल्पात असणाऱ्या पाण्याचा काय उपयोग असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. यामुळे परिसरात पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे.