शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

पाणी टंचाई ठरली बाटलीबंद पाण्याला वरदान

By admin | Updated: April 7, 2017 00:37 IST

मानवाला दैनंदिन वापर, शेती, उद्योग, विद्युत आदी बाबींसाठी तसेच अन्य सजिवांच्या अस्तित्वासाठी पाणी हवे.

पाणी टंचाई आराखडा नावापुरता : बारा हजार रुपयांच्या पाण्याची विक्रीमोहाडी : मानवाला दैनंदिन वापर, शेती, उद्योग, विद्युत आदी बाबींसाठी तसेच अन्य सजिवांच्या अस्तित्वासाठी पाणी हवे. तथापि, पाण्याच्या संकटाची तिव्रता वाढत आहे. त्यासाठी पाणीटंचाई आराखडा मंजूर होतो. पण, पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी निधीच वेळेवर उपलब्ध करुन दिला जात नाही. परिणामी पाणी टंचाईचा आराखडा केवळ नावापूरता तयार केला जातो. याच बाबीचा लाभ बॉटलीबंद पाण्याच्या विक्रीसाठी होत आहे.शेती, उद्योग तसेच घरगुती वापरासाठी भूगर्भजलाचा अतिरिक्त वापर केला जात असल्याने भूजलपातळी वेगाने कमी होत आहे. दरवर्षी पिण्याच्या पाण्याची तिव्रता अधिक जानवत आहे. त्यासाठी प्रशासन स्तरावर दरवर्षीच पिण्याचे पाणी टंचाई निवारणासाठी आराखडा तयार केला जातो. टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित केल्या जातात. उपाय योजनांवर किती खर्च अपेक्षित असेल हेही ठरविण्यात येतो. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडून उपाययोजनाद्वारे कोणती कामे प्राधान्याने घ्यावयाची असतात. याचा सर्वेक्षण भूवैज्ञानिकच्या चमूकडून केला जातो. तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरी केलेला प्रपत्र ब भरुन शिफारशीसह प्रशासकीय मंजूरीसाठी जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे पाठविला जातो. ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद भंडारा येथील भूवैज्ञानिक चमूने ८ फेब्रुवारी रोजी प्रपत्र भरुन प्रशासकीय मंजूरीसाठी प्रपत्र ब सादर करण्यात आले. मोहाडी तालुक्याचा पाणी टंचाई आराखडा जानेवारी ते मार्च २०१७ तयार केला गेला. मार्च अखेरपर्यंत विहिर खोल करणे, विहिरीतील गाळ काढणे, विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरी घेणे, आदी कामे प्रस्तावित करुन ५ जानेवारी २०१७ रोजी प्रस्तावित कामांना जिल्हाधिकारी भंडारा यांनी मंजूरी दिली होती. आराखडा मंजूर करण्यात आला. पाणी टंचाई निवारणासाठी मार्च अखेर मंजूर कामे करायची होती. पण, जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडून कामांना प्रशासकीय मंजूरी व ८ लक्ष ७७ हजार रुपये निधीची आवश्यकता अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे शिवनी, मुंढरी खुर्द, पांजराबोरी, खमारी बू., रोहणा, आंधळगाव, निलज बू, धुसाळा येथे विधन विहिरी, मलिदा, पांजरा ग्राम, वासेरा येथे विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, खमारी बू येथे विहिरी खोल करणे, गाळ काढणे ही उपाययोजना मार्च पूर्ण होवून करता आली नाही. तसेच एप्रिल ते जून २०१७ च्या पाणी टंचाई आराखडाही तयार करुन मंजूर करण्यात आला.विहिरी खोल करणे विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, विंधन विहिरी घेणे अशी २४ कामे करावयाची आहेत. यासाठी १४ लक्ष ६२ हजार रुपये खर्च येणार आहे. या प्रस्तावित कामे करण्यासाठी २१ गावांची निवड करण्यात आली आहे. यात चिचोली, सिरसोली, पांजरा/ बोरी, बोरी, खडकी, डोंगरदेव, पालोरा, पारडी, वडेगाव, खुटसावरी, चिचखेडा, भोसा, हिवरा, पाचगाव, रोहा, सालईबूज, उसर्रा, देव्हाडा खू, हरदोली/ झंझाड, डोंगरगाव, टाकला ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भूवैज्ञनिक चमूकडून सर्वेक्षण होणे अपेक्षीत होते. अजूनही सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे पाणी टंचाई आराखडा व त्याचावरचा निवारण केवळ कागदावरच केला जातो असे निर्देशनास आले आहे. प्रखर उन्हाळा तापतोय पाण्याची भिषणत: जाणवू लागली आहे. प्रशासकीय कारभार करणारे अधिकारी वातानुकूलीत ठिकाणी बसत असल्याने त्यांना पाणी टंचाईची प्रखरता व गंभीरता कशी कळणार असा सवाल निर्माण होत आहे. (तालुका प्रतिनिधी)मोहाडीत पाण्यासाठी पायपीटमोहाडी येथे दरवर्षीच पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला उन्हाळ्याच्या मोसामात संघर्ष करावा लागतो. जलस्वराज्य व इतर पाणी पुरवठा कुचकामी ठरली. अनेक वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविता आला नाही. दोन दिवसानी नळाला पाणी येतो. तेही दिवसभर पुरेल इतका पाणी मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे मोहाडीत पिण्याचा पाण्याची तिव्रता, टंचाई सहनशिलतेची कसोटी पाहणारी आहे. मोहाडीत चार आरो प्लांट आहेत. त्यामुळे दर दिवशी बारा हजार रुपयाचा पाणी मोहाडी व शेजारील गावात विकला जातो. यामुळे मोहाडी मध्ये असणारी तिव्र पाणी टंचाई बॉटली, कॅन बंद पाण्याचा विक्रीला वरदान ठरली आहे.