शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी कोरड्या होऊ लागल्याने पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:02 IST

आॅनलाईन लोकमतकेशोरी : गावालगत असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी धानपीक लागवडीची सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील विहिरी झपाट्याने कोरड्या पडू लागल्या आहेत. या प्रकारामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची समस्या उग्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी विभाग व ग्रामपंचायतने गावालगतच्या शेतकºयांनी धान पिकाची लागवड करू नये, असा आदेश शेतकºयांना ...

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : प्रशासनाचे आदेश धुळकावले

आॅनलाईन लोकमतकेशोरी : गावालगत असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी धानपीक लागवडीची सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील विहिरी झपाट्याने कोरड्या पडू लागल्या आहेत. या प्रकारामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची समस्या उग्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी विभाग व ग्रामपंचायतने गावालगतच्या शेतकºयांनी धान पिकाची लागवड करू नये, असा आदेश शेतकºयांना देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाचे पºहे टाकले आहेत. गावालगत शेतजमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी बोअरद्वारे २४ तास मोटार चालू ठेवल्याने गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाळा सुरू होण्यास अजून दोन महिने शिल्लक असताना विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.मार्च, एप्रिल, मे व जून या चार महिन्यांपर्यंत गावातील विहिरींचे पाणी नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. उन्हाळा चालू होण्यापूर्वीच विहिरीतील पाणी पातळी ७० टक्केपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विहिरींची काय अवस्था होईल, याची नागरिकांना चिंता वाटू लागली आहे.उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली तर सर्व ग्रामस्थांना मोठा त्रास होईल व पाण्यासाठी उन्हातान्हात त्यांना भटकंती करावी लागेल. याची दक्षता आताच घेतलेली बरी, असे नागरिकांचे मत आहे. त्यासाठी उन्हाळी पीक न घेण्याचे आदेश देण्याची गरज आहे. याप्रकरणी कृषी विभाग आणि ग्रामपंचायतीने विशेष लक्ष देऊन उन्हाळी पीक घेवू नये, असे आदेश शेतकºयांना देण्यात यावे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.