शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोल्यातून पाण्याचा उपसा

By admin | Updated: September 12, 2016 00:28 IST

बावनथडी नदीतून पाण्याचा उपसा करुन चांदपूर तलावात सोडणे सध्या सुरु आहे. चांदपूर तलावात सुमारे ५० टक्के जलसाठा झाला आहे.

कालवा फुटल्याने नदीत प्रवाह : चांदपूर तलाव ५०.६७ टक्के जलसाठातुमसर : बावनथडी नदीतून पाण्याचा उपसा करुन चांदपूर तलावात सोडणे सध्या सुरु आहे. चांदपूर तलावात सुमारे ५० टक्के जलसाठा झाला आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेच्या नऊपैकी सात मशीन्स सुरु आहे. चांदपुर तलावातील पाणी सिहोरा परिसरातील गावांना खरीप पिकांकरिता मिळणार आहे. बावनथडी प्रकल्पाचा कालवा फुटल्याने नदीत पाण्याचा प्रवाह असल्याची माहिती आहे.सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेवर सुमारे ३५ लाखांचे वीज बिल थकीत होते. याकरिता सिहोरा परिसरात राजकीय पक्षांनी आंदोलने करुन शासनाचे लक्ष आकर्षीत केले होते. आ. चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांची भेट घेवून थकीत वीज बिलाकरिता प्रयत्न केले. राज्य शासनाने १५ लाखांचा निधी देण्याचे जाहिर केले. मागील आठ ते दहा दिवसापासून बावनथडी नदीतून चांदपूर तलावात पाणी उपसा करण्यात येत आहे. चांदपूर तलावात सुमारे ३५ टक्के जलसाठा यामुळे उपलब्ध झाला आहे. खरीप व रब्बी पिकांकरिता हा जलसाठा उपलब्ध करण्यात येणार आहे.सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावांना चांदपूर जलाशयातून शेती सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होते. तलावात मासेमारी सुध्दा करण्यात येते. यावर्षी पाऊस न आल्याने तलाव रिकामाच आहे. केवळ सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेमुळे पाणी उपसा केल्याने तलावात किमान जलसाठा दिसत आहे. यापूर्वीच पाणी उपसा करण्याची गरज होती. अर्धा पावसाळा निघून गेल्यानंतर पाणी उपसण्याला सुरुवात झाली. पाणी उपशण्याचे नियोजन किमान उन्हाळ्यात करण्याची गरज आहे. तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार येथे दिसून येतो. जलसाठवण योजनेवर लाखोंचा निधी खर्च करण्यात येतो. येथे केवळ पाणी उपसा करुन तलावात सोडण्याकरिताच मोठ्या अग्नीदिव्यातून जावे लागते.या जलसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांसोबतच पर्यावरणालाही येथे फायदयाचा ठरतो. हे विशेष. १२ सप्टेंबरपासून येरली परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उजवा कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. १५ सप्टेंबरपासून डावा कालव्याअंतर्गत सिहोरा, चुल्हाड, रेंगेपार, परसवाडा (सि) परिसरात शेतकऱ्यांकरिता पाणी सोडण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)बावनथडी नदीतील प्रवाह व येवा यानुसार पाणी उपसा करण्यात येतो. खरीप व रब्बी पिकांकराित मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल. पाणी उपश्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या चांदपूर तलावात ५०.६७ टक्के जलसाठा आहे.- सुरेश वाईदेशकर,शाखा अभियंता, चांदपूर