शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

सोंड्याटोल्यातून पाण्याचा उपसा

By admin | Updated: September 12, 2016 00:28 IST

बावनथडी नदीतून पाण्याचा उपसा करुन चांदपूर तलावात सोडणे सध्या सुरु आहे. चांदपूर तलावात सुमारे ५० टक्के जलसाठा झाला आहे.

कालवा फुटल्याने नदीत प्रवाह : चांदपूर तलाव ५०.६७ टक्के जलसाठातुमसर : बावनथडी नदीतून पाण्याचा उपसा करुन चांदपूर तलावात सोडणे सध्या सुरु आहे. चांदपूर तलावात सुमारे ५० टक्के जलसाठा झाला आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेच्या नऊपैकी सात मशीन्स सुरु आहे. चांदपुर तलावातील पाणी सिहोरा परिसरातील गावांना खरीप पिकांकरिता मिळणार आहे. बावनथडी प्रकल्पाचा कालवा फुटल्याने नदीत पाण्याचा प्रवाह असल्याची माहिती आहे.सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेवर सुमारे ३५ लाखांचे वीज बिल थकीत होते. याकरिता सिहोरा परिसरात राजकीय पक्षांनी आंदोलने करुन शासनाचे लक्ष आकर्षीत केले होते. आ. चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांची भेट घेवून थकीत वीज बिलाकरिता प्रयत्न केले. राज्य शासनाने १५ लाखांचा निधी देण्याचे जाहिर केले. मागील आठ ते दहा दिवसापासून बावनथडी नदीतून चांदपूर तलावात पाणी उपसा करण्यात येत आहे. चांदपूर तलावात सुमारे ३५ टक्के जलसाठा यामुळे उपलब्ध झाला आहे. खरीप व रब्बी पिकांकरिता हा जलसाठा उपलब्ध करण्यात येणार आहे.सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावांना चांदपूर जलाशयातून शेती सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होते. तलावात मासेमारी सुध्दा करण्यात येते. यावर्षी पाऊस न आल्याने तलाव रिकामाच आहे. केवळ सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेमुळे पाणी उपसा केल्याने तलावात किमान जलसाठा दिसत आहे. यापूर्वीच पाणी उपसा करण्याची गरज होती. अर्धा पावसाळा निघून गेल्यानंतर पाणी उपसण्याला सुरुवात झाली. पाणी उपशण्याचे नियोजन किमान उन्हाळ्यात करण्याची गरज आहे. तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार येथे दिसून येतो. जलसाठवण योजनेवर लाखोंचा निधी खर्च करण्यात येतो. येथे केवळ पाणी उपसा करुन तलावात सोडण्याकरिताच मोठ्या अग्नीदिव्यातून जावे लागते.या जलसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांसोबतच पर्यावरणालाही येथे फायदयाचा ठरतो. हे विशेष. १२ सप्टेंबरपासून येरली परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उजवा कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. १५ सप्टेंबरपासून डावा कालव्याअंतर्गत सिहोरा, चुल्हाड, रेंगेपार, परसवाडा (सि) परिसरात शेतकऱ्यांकरिता पाणी सोडण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)बावनथडी नदीतील प्रवाह व येवा यानुसार पाणी उपसा करण्यात येतो. खरीप व रब्बी पिकांकराित मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल. पाणी उपश्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या चांदपूर तलावात ५०.६७ टक्के जलसाठा आहे.- सुरेश वाईदेशकर,शाखा अभियंता, चांदपूर