शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे पऱ्हे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:25 IST

जिल्ह्यात गत ४८ तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतशिवारातील कामांना वेग आला असला तरी काही ठिकाणी धानाचे पऱ्हे पाण्याखाली आले आहेत. संततधार पावसामुळे सोमवारी जनजीवन प्रभावित झाले होते. दरम्यान मंगळवारी काही काळ पावसाने उसंत दिल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी ८० मिमी पाऊस : अनेक तालुक्यात रोवणीला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत ४८ तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतशिवारातील कामांना वेग आला असला तरी काही ठिकाणी धानाचे पऱ्हे पाण्याखाली आले आहेत. संततधार पावसामुळे सोमवारी जनजीवन प्रभावित झाले होते. दरम्यान मंगळवारी काही काळ पावसाने उसंत दिल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले.जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात धानाची (भात पिकाची) लागवड केली जाते. मृग नक्षत्राची चाहूल लागताच बळीराजा शेतीच्या पूर्व मशागतीच्या कामाला प्रारंभ करत असतो. मृग नक्षत्राच्या प्रारंभी पाऊस बरसताच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. तसेच काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध सिंचन क्षमतेनुसार पेरणी आटोपली होती. परिणामी पाऊस बरसल्यानंतर पऱ्हे रोवणीच्या अवस्थेपर्यंत आल्यामुळे रोवणीच्या कामालाही प्रारंभ केला होता. मध्यंतरी मागील आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते. सिंचन सुविधा असलेल्यांना दिलासा मिळाला असला तरी निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावले.दुबार पेरणीनंतरही जवळपास दोन दिवस पाऊस न बरसल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र रविवार मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे रोवणीच्या कामाला पून्हा दमदार सुरुवात झाली.गत २४ तासात जिल्ह्यात संततधार पाऊस बरसला. यात भंडारा, मोहाडी, पवनी, साकोली, लाखांदूर व लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात तालुकानिहाय आकडेवारीअंतर्गत भंडारा तालुक्यात ९१.६ मिमी, मोहाडी ११५.४ मिमी, तुमसर २३.२, पवनी ७७.६, साकोली ९४, लाखांदूर ८५.२ तर लाखनी तालुक्यात ७९.६ मिमी पाऊस बरसला. या सर्वांची सरासरी ८०.९ मिमी इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी उत्तम आहे.दरम्यान जिल्ह्यात संततधार पावसामुळे काही घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे तर काही ठिकाणी मातीच्या घरांची पडझड झाल्याचे वृत्त असले तरी नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पालांदूर : पालांदूरसह परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मंगळवारला त्याची १३३.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. २४ तासाच्या हजेरी धानाचे बांदाण धानासहीत पाण्याखाली आले आहेत. नदी नाले किनारी गावकºयांना पोलीस व महसूल विभागातर्फे सावधानतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. अख्ख्या विदर्भात पावसाची संततधार सुरु असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होत आहे.प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशाराभंडारा : भंडारा जिल्ह्यात १६ व १७ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयाच्यानियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले. नागरिकांनी शक्यतो बाहेर जाण्यास टाळावे. पाणी असेल तेथून वाहन घेऊन जाण्यास टाळावे. पूर असताना नदी, नाला ओलांडू नये. पुलावरून पूराचे पाणी वाहत असताना दुचाकी, चार चाकी वाहने नेऊ नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.