शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

धानाचे पऱ्हे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:25 IST

जिल्ह्यात गत ४८ तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतशिवारातील कामांना वेग आला असला तरी काही ठिकाणी धानाचे पऱ्हे पाण्याखाली आले आहेत. संततधार पावसामुळे सोमवारी जनजीवन प्रभावित झाले होते. दरम्यान मंगळवारी काही काळ पावसाने उसंत दिल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी ८० मिमी पाऊस : अनेक तालुक्यात रोवणीला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत ४८ तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतशिवारातील कामांना वेग आला असला तरी काही ठिकाणी धानाचे पऱ्हे पाण्याखाली आले आहेत. संततधार पावसामुळे सोमवारी जनजीवन प्रभावित झाले होते. दरम्यान मंगळवारी काही काळ पावसाने उसंत दिल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले.जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात धानाची (भात पिकाची) लागवड केली जाते. मृग नक्षत्राची चाहूल लागताच बळीराजा शेतीच्या पूर्व मशागतीच्या कामाला प्रारंभ करत असतो. मृग नक्षत्राच्या प्रारंभी पाऊस बरसताच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. तसेच काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध सिंचन क्षमतेनुसार पेरणी आटोपली होती. परिणामी पाऊस बरसल्यानंतर पऱ्हे रोवणीच्या अवस्थेपर्यंत आल्यामुळे रोवणीच्या कामालाही प्रारंभ केला होता. मध्यंतरी मागील आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते. सिंचन सुविधा असलेल्यांना दिलासा मिळाला असला तरी निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावले.दुबार पेरणीनंतरही जवळपास दोन दिवस पाऊस न बरसल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र रविवार मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे रोवणीच्या कामाला पून्हा दमदार सुरुवात झाली.गत २४ तासात जिल्ह्यात संततधार पाऊस बरसला. यात भंडारा, मोहाडी, पवनी, साकोली, लाखांदूर व लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात तालुकानिहाय आकडेवारीअंतर्गत भंडारा तालुक्यात ९१.६ मिमी, मोहाडी ११५.४ मिमी, तुमसर २३.२, पवनी ७७.६, साकोली ९४, लाखांदूर ८५.२ तर लाखनी तालुक्यात ७९.६ मिमी पाऊस बरसला. या सर्वांची सरासरी ८०.९ मिमी इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी उत्तम आहे.दरम्यान जिल्ह्यात संततधार पावसामुळे काही घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे तर काही ठिकाणी मातीच्या घरांची पडझड झाल्याचे वृत्त असले तरी नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पालांदूर : पालांदूरसह परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मंगळवारला त्याची १३३.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. २४ तासाच्या हजेरी धानाचे बांदाण धानासहीत पाण्याखाली आले आहेत. नदी नाले किनारी गावकºयांना पोलीस व महसूल विभागातर्फे सावधानतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. अख्ख्या विदर्भात पावसाची संततधार सुरु असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होत आहे.प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशाराभंडारा : भंडारा जिल्ह्यात १६ व १७ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयाच्यानियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले. नागरिकांनी शक्यतो बाहेर जाण्यास टाळावे. पाणी असेल तेथून वाहन घेऊन जाण्यास टाळावे. पूर असताना नदी, नाला ओलांडू नये. पुलावरून पूराचे पाणी वाहत असताना दुचाकी, चार चाकी वाहने नेऊ नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.