शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पालोरा येथील शाळा, वस्ती, दवाखाना परिसरात पाणीच पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST

अड्याळ : पवनी तालुक्यातील पालोरा येथील शाळा, वस्ती, दवाखाना परिसरात पाणीच पाणी साचल्याने आजाराला आमंत्रण मिळत आहे. महामार्गाच्या बांधकामाने ...

अड्याळ : पवनी तालुक्यातील पालोरा येथील शाळा, वस्ती, दवाखाना परिसरात पाणीच पाणी साचल्याने आजाराला आमंत्रण मिळत आहे. महामार्गाच्या बांधकामाने हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भंडारा-पवनी महामार्गावरील केवळ तीन हजार वस्तीचे पालोरा ग्रामवासी आज दहशतीखाली जीवन जगत आहेत. नशीब बलवत्तर की गेली दोन दिवसांत मुसळधार पाऊस आला नाही आणि तेही आले असते तर स्थिती अजून बिकट असती. या गावातील जिल्हा परिषद शाळा असो वा चार गावांचा संपर्क असणारा आयुर्वेदिक दवाखाना, रघुते हायस्कूल असो की तिथे तब्बल १४० विद्यार्थी रोज विद्यार्जनासाठी येतात त्या तिन्ही ठिकाणी पाणीच पाणी नियमितपणे साचून राहते आहे. जेव्हापासून महामार्गाचे काम झाले तेव्हापासून गावातील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्गच बनला नाही. नियमितपणे साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूची साथ गावात पसरण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. तसे झालेच तर याला ग्रामपंचायत प्रशासन वा ग्रामस्थही जबाबदार राहणार नाही. कारण साचलेले पाणी जाण्यासाठी मार्गच बंद झाले. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे मत सरपंच अनिता गिऱ्हेपुंजे यांनी व्यक्त केले आहे.

समस्येच्या निराकरणासाठी रघुते हायस्कूल, आयुर्वेदिक दवाखाना तथा ग्रामपंचायत प्रशासनाने एकमेकांना तथा बीडीओ, तहसीलदार, जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अशा संबंधित अधिकारी यांना अनेकदा पत्रव्यवहार केला; मात्र उपयोग शून्य. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी खासदार,आमदार यांचेही दुर्लक्ष होत असल्याची खंतही सरपंच गिऱ्हेपुंजे यांनी व्यक्त केली.

गावातील महामार्गाच्या कडेला असणाऱ्या वस्ती, शाळा व आयुर्वेदिक दवाखान्यात जाण्यासाठी ग्रामस्थांना रस्ताच दिसेनासरा झाला आहे. सध्याच्या दिवसात डेंग्यूचे ग्रहण लागल्यासारखेच आहे; पण यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे अजूनपर्यंत गावात एकही डेंग्यूचा रुग्ण नाही. हातावर हात देऊन राहणेसुध्दा चुकीचे ठरेल. यासाठी जिल्हा तथा तालुका प्रशासन गावात साथ पसरल्यानंतर आरोग्य यंत्रणा लावण्या आधीच आत्ताच आरोग्य यंत्रणा गावात कामाला लावावी आणि गावात साचलेल्या पाण्याचा कशाप्रकारे निचरा होईल यासाठी प्रयत्न करावे, अशीही मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.