शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पालोरा येथील शाळा, वस्ती, दवाखाना परिसरात पाणीच पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST

अड्याळ : पवनी तालुक्यातील पालोरा येथील शाळा, वस्ती, दवाखाना परिसरात पाणीच पाणी साचल्याने आजाराला आमंत्रण मिळत आहे. महामार्गाच्या बांधकामाने ...

अड्याळ : पवनी तालुक्यातील पालोरा येथील शाळा, वस्ती, दवाखाना परिसरात पाणीच पाणी साचल्याने आजाराला आमंत्रण मिळत आहे. महामार्गाच्या बांधकामाने हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भंडारा-पवनी महामार्गावरील केवळ तीन हजार वस्तीचे पालोरा ग्रामवासी आज दहशतीखाली जीवन जगत आहेत. नशीब बलवत्तर की गेली दोन दिवसांत मुसळधार पाऊस आला नाही आणि तेही आले असते तर स्थिती अजून बिकट असती. या गावातील जिल्हा परिषद शाळा असो वा चार गावांचा संपर्क असणारा आयुर्वेदिक दवाखाना, रघुते हायस्कूल असो की तिथे तब्बल १४० विद्यार्थी रोज विद्यार्जनासाठी येतात त्या तिन्ही ठिकाणी पाणीच पाणी नियमितपणे साचून राहते आहे. जेव्हापासून महामार्गाचे काम झाले तेव्हापासून गावातील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्गच बनला नाही. नियमितपणे साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूची साथ गावात पसरण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. तसे झालेच तर याला ग्रामपंचायत प्रशासन वा ग्रामस्थही जबाबदार राहणार नाही. कारण साचलेले पाणी जाण्यासाठी मार्गच बंद झाले. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे मत सरपंच अनिता गिऱ्हेपुंजे यांनी व्यक्त केले आहे.

समस्येच्या निराकरणासाठी रघुते हायस्कूल, आयुर्वेदिक दवाखाना तथा ग्रामपंचायत प्रशासनाने एकमेकांना तथा बीडीओ, तहसीलदार, जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अशा संबंधित अधिकारी यांना अनेकदा पत्रव्यवहार केला; मात्र उपयोग शून्य. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी खासदार,आमदार यांचेही दुर्लक्ष होत असल्याची खंतही सरपंच गिऱ्हेपुंजे यांनी व्यक्त केली.

गावातील महामार्गाच्या कडेला असणाऱ्या वस्ती, शाळा व आयुर्वेदिक दवाखान्यात जाण्यासाठी ग्रामस्थांना रस्ताच दिसेनासरा झाला आहे. सध्याच्या दिवसात डेंग्यूचे ग्रहण लागल्यासारखेच आहे; पण यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे अजूनपर्यंत गावात एकही डेंग्यूचा रुग्ण नाही. हातावर हात देऊन राहणेसुध्दा चुकीचे ठरेल. यासाठी जिल्हा तथा तालुका प्रशासन गावात साथ पसरल्यानंतर आरोग्य यंत्रणा लावण्या आधीच आत्ताच आरोग्य यंत्रणा गावात कामाला लावावी आणि गावात साचलेल्या पाण्याचा कशाप्रकारे निचरा होईल यासाठी प्रयत्न करावे, अशीही मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.