शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
3
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉचिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
4
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
5
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
7
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
8
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
9
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
10
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
11
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
12
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
13
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
14
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
15
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
16
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
17
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
19
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
20
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा

लोहारा येथे पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: April 10, 2017 00:37 IST

तुमसर तालुक्यातील लोहारा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे.

प्रशासन सुस्त : उपाययोजना शून्य, महिला काढणार घागरमोर्चा, गावातील विहिरी पडल्या कोरड्यारमेश लेदे  जांब (लोहारा) तुमसर तालुक्यातील लोहारा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. परिणामी महिलांमध्ये असंतोष पसरला आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने लोहारा येथील संपूर्ण विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. पाण्याची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. भर उन्हामध्ये शेतातील विहिरीचे पाणी आणावे लागत आहे. नळ योजनेकरिता गावामध्ये दोन बोअरवेल आहेत. त्यापैकी एक बोअरवेल मार्च महिन्यापूर्वीच पाण्याअभावी बंद पडली तर दुसरी बोअरवेल येत्या दोन ते चार दिवसात बंद पडण्याच्या मार्गावर आहे. लोहारा येथे सन २०११ ते २०१२ पासून सतत पाणीटंचाई भासत आहे. पाणी टंचाईवर पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाकडून उपाययोजना केली गेली नाही. मार्च महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. मे आणि जून महिना शिल्लक आहे. लोहारा गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या वर असून गावामध्ये तीन सार्वजनिक विहिरी आहेत. पण त्या सन २०११ पासून कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलची संख्या आठ आहे. मात्र दोन वगळता पूर्ण पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या बंद पडल्या आहेत. नळ योजनेकरिता दोन बोअर मारण्यात आल्या होत्या. एक पूर्वीच बंद पडली तर दुसरी झटके देत आहे.गावकऱ्यांना पिण्याचा पाणी सुद्धा पुरेसा मिळत नाही. लोहारा येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या जलकुंभामध्ये पाणी पुरवठा करणारी दोन्ही बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे गावात पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तरीपण गावालगत गाव फिडरवर असलेल्या बोअरवेल कृषी फिडरवर करण्यात यावे. जेणेकरून शेतीसाठी होणारा निरंतर पाणी उपसा थांबल्यास काही प्रमाणात पाणी टंचाईवर मात करता येवू शकते. या संदर्भात मागील वर्षापासून गाव फिडर व कृषी फिडर वेगवेगळे करण्यासाठी खांब उभे केले. पण "तार" अजूनपर्यंत लावण्यात आले नसून त्यांचे काम मागील वर्षापासून कासवगतीने असल्याची तक्रार सरपंच शामराव ठाकरे व उपसरपंच गुलाब पिलारे यांनी केली आहे. गावामध्ये ग्रामपंचायतकडून सकाळपाळीमध्ये ७ ते ८ वाजता दरम्यान नळ सुरु करतेवेळी गावातील १ तासाकरिता विद्युत पुरवठा ताबडतोब खंडीत करण्यात यावा. जेणेकरून टिल्लू पंपाद्वारे अवैध पाणी उपसा करणाऱ्या नळ खातेदारांना पाणी उपसा करता येणार नाही. पाणी टंचाईवर मात करता येईल, असे ग्रामपंचायतमध्ये ठराव सर्वानुमते मंजूर करून शाखा अभियंता, विद्युत विभाग, आमदार चरण वाघमारे, तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी काय उपाययोजना करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून लोहारा येथील पाणी समस्या मिटविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायत तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला आहे.