शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या विहिरीतून पाण्याचा उपसा

By admin | Updated: May 14, 2017 00:19 IST

शीर्षक वाचून आश्चर्यात पडलात ना! मात्र हे खरे असून सत्यात घडलेली बाब आहे.

लोकमत शुभवर्तमान : मऱ्हेगावचे सरपंच बेंदवार यांच्या प्रयत्नाला यशमुखरू बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शीर्षक वाचून आश्चर्यात पडलात ना! मात्र हे खरे असून सत्यात घडलेली बाब आहे. लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील कोरड्या विहिरीतून जलसंचय करण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला असून ग्रामस्थांना भेडसावणारी पाण्याची चिंता यातून मिटली आहे. दुर्लक्षित ठरलेल्या विहिरीतून पाण्याचा नवा जलस्त्रोत शोधणे हा नवलाईचा विषय ठरला आहे.‘रगडता वाळूचे कण, तेलही गळे’ या म्हणीला तंतोतंत जुळणारे कर्तृत्व मऱ्हेगाव येथे सत्यात उतरविण्यात आले. मऱ्हेगाव या जेमतेम १५०० लोकवस्तीचे हे गाव नवीन व जुनी अशा दोन वस्त्यांमध्ये विभागली आहे. या गावातील दोनही विहिरी मार्च, एप्रिल दरम्यानच कोरड्या ठाक पडल्याने ग्रामस्थांना पाण्याची चणचण भासत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. दोन्ही वस्त्यांमिळून एकमेव हातपंप असून तोही सध्या कामात नाही. त्यामुळे पाण्यांसाठी येथील आया-बहिणींची होणारी कुचंबना व वेळप्रसंगी महिलांमध्ये होणारे भांडण, तंटे. ही बाब लक्षात घेवून येथील सरपंच श्यामा बेंदवार यांनी गावातील एका सार्वजनिक विहिरीत जलस्त्रोत आटल्याने आता केवळ वाळूच दिसते. मऱ्हेगाव हे गाव चुलबंद नदीच्या काठावर असल्याने या नदीलगतच्या गावांमधील विहिरींमध्ये वाळूचे थर दिसून येते. अशा वाळवंट प्रदेश सारख्या दिसणाऱ्या या गावातील सरपंच बेंदवार यांनी गावातील पाणीटंचाईची झळ बघविली गेली नाही. त्यामुळे त्यांनी गावातील युवांना हाताशी धरून विहिरीतील वाळूत लोखंडी पाईप टाकला. त्यावर मोटारपंप बसवून पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केला. तीन तासाच्या प्रयत्नानंतर जलस्त्रोत सापडला. आज सकाळी या विहिरीवर पाणी भरणाऱ्यांची मोठी गर्दी उसळली. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता.असा केला प्रयत्न४० फूट खोल विहिरीतील जलस्त्रोत आटला. त्यामुळे एप्रिल महिन्यापासूनच विहिरी कोरड्या झाल्या असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली. ही गंभीर समस्या दिसून आल्याने बेंदवार यांनी विहिरीत १५ फूट लोखंडी पाईप वाळूत खोलवर खुपसला. त्यावर फिल्टर पंप लावून पाणी ओढले व क्षणात सर्वांचे चेहरे आनंदी झाले. ही किमया मोटरपंप सुरू केल्याने हवेच्या दाबामुळे जमिनीत खोलवर असलेले पाणी बाहेर फेकू लागले. गावकऱ्यांसाठी ही किमया एका आश्चर्यापलीकडची ठरली आहे.चुलबंद नदीकाठावरील गावांमध्ये रेतीच्या अमाप उपशामुळे भुजल स्त्रोत कमी होत आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांपुढे पाण्याची समस्या आहे. ग्रामस्थांनी केलेल्या एकजुटीच्या प्रयत्नातून पाण्याचा नवा स्त्रोत शोधण्यात यश आले- श्यामा बेंदवार, सरपंच मऱ्हेगाव.