शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

कोरड्या विहिरीतून पाण्याचा उपसा

By admin | Updated: May 14, 2017 00:19 IST

शीर्षक वाचून आश्चर्यात पडलात ना! मात्र हे खरे असून सत्यात घडलेली बाब आहे.

लोकमत शुभवर्तमान : मऱ्हेगावचे सरपंच बेंदवार यांच्या प्रयत्नाला यशमुखरू बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शीर्षक वाचून आश्चर्यात पडलात ना! मात्र हे खरे असून सत्यात घडलेली बाब आहे. लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील कोरड्या विहिरीतून जलसंचय करण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला असून ग्रामस्थांना भेडसावणारी पाण्याची चिंता यातून मिटली आहे. दुर्लक्षित ठरलेल्या विहिरीतून पाण्याचा नवा जलस्त्रोत शोधणे हा नवलाईचा विषय ठरला आहे.‘रगडता वाळूचे कण, तेलही गळे’ या म्हणीला तंतोतंत जुळणारे कर्तृत्व मऱ्हेगाव येथे सत्यात उतरविण्यात आले. मऱ्हेगाव या जेमतेम १५०० लोकवस्तीचे हे गाव नवीन व जुनी अशा दोन वस्त्यांमध्ये विभागली आहे. या गावातील दोनही विहिरी मार्च, एप्रिल दरम्यानच कोरड्या ठाक पडल्याने ग्रामस्थांना पाण्याची चणचण भासत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. दोन्ही वस्त्यांमिळून एकमेव हातपंप असून तोही सध्या कामात नाही. त्यामुळे पाण्यांसाठी येथील आया-बहिणींची होणारी कुचंबना व वेळप्रसंगी महिलांमध्ये होणारे भांडण, तंटे. ही बाब लक्षात घेवून येथील सरपंच श्यामा बेंदवार यांनी गावातील एका सार्वजनिक विहिरीत जलस्त्रोत आटल्याने आता केवळ वाळूच दिसते. मऱ्हेगाव हे गाव चुलबंद नदीच्या काठावर असल्याने या नदीलगतच्या गावांमधील विहिरींमध्ये वाळूचे थर दिसून येते. अशा वाळवंट प्रदेश सारख्या दिसणाऱ्या या गावातील सरपंच बेंदवार यांनी गावातील पाणीटंचाईची झळ बघविली गेली नाही. त्यामुळे त्यांनी गावातील युवांना हाताशी धरून विहिरीतील वाळूत लोखंडी पाईप टाकला. त्यावर मोटारपंप बसवून पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केला. तीन तासाच्या प्रयत्नानंतर जलस्त्रोत सापडला. आज सकाळी या विहिरीवर पाणी भरणाऱ्यांची मोठी गर्दी उसळली. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता.असा केला प्रयत्न४० फूट खोल विहिरीतील जलस्त्रोत आटला. त्यामुळे एप्रिल महिन्यापासूनच विहिरी कोरड्या झाल्या असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली. ही गंभीर समस्या दिसून आल्याने बेंदवार यांनी विहिरीत १५ फूट लोखंडी पाईप वाळूत खोलवर खुपसला. त्यावर फिल्टर पंप लावून पाणी ओढले व क्षणात सर्वांचे चेहरे आनंदी झाले. ही किमया मोटरपंप सुरू केल्याने हवेच्या दाबामुळे जमिनीत खोलवर असलेले पाणी बाहेर फेकू लागले. गावकऱ्यांसाठी ही किमया एका आश्चर्यापलीकडची ठरली आहे.चुलबंद नदीकाठावरील गावांमध्ये रेतीच्या अमाप उपशामुळे भुजल स्त्रोत कमी होत आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांपुढे पाण्याची समस्या आहे. ग्रामस्थांनी केलेल्या एकजुटीच्या प्रयत्नातून पाण्याचा नवा स्त्रोत शोधण्यात यश आले- श्यामा बेंदवार, सरपंच मऱ्हेगाव.