शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

कोरड्या विहिरीतून पाण्याचा उपसा

By admin | Updated: May 14, 2017 00:19 IST

शीर्षक वाचून आश्चर्यात पडलात ना! मात्र हे खरे असून सत्यात घडलेली बाब आहे.

लोकमत शुभवर्तमान : मऱ्हेगावचे सरपंच बेंदवार यांच्या प्रयत्नाला यशमुखरू बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शीर्षक वाचून आश्चर्यात पडलात ना! मात्र हे खरे असून सत्यात घडलेली बाब आहे. लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील कोरड्या विहिरीतून जलसंचय करण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला असून ग्रामस्थांना भेडसावणारी पाण्याची चिंता यातून मिटली आहे. दुर्लक्षित ठरलेल्या विहिरीतून पाण्याचा नवा जलस्त्रोत शोधणे हा नवलाईचा विषय ठरला आहे.‘रगडता वाळूचे कण, तेलही गळे’ या म्हणीला तंतोतंत जुळणारे कर्तृत्व मऱ्हेगाव येथे सत्यात उतरविण्यात आले. मऱ्हेगाव या जेमतेम १५०० लोकवस्तीचे हे गाव नवीन व जुनी अशा दोन वस्त्यांमध्ये विभागली आहे. या गावातील दोनही विहिरी मार्च, एप्रिल दरम्यानच कोरड्या ठाक पडल्याने ग्रामस्थांना पाण्याची चणचण भासत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. दोन्ही वस्त्यांमिळून एकमेव हातपंप असून तोही सध्या कामात नाही. त्यामुळे पाण्यांसाठी येथील आया-बहिणींची होणारी कुचंबना व वेळप्रसंगी महिलांमध्ये होणारे भांडण, तंटे. ही बाब लक्षात घेवून येथील सरपंच श्यामा बेंदवार यांनी गावातील एका सार्वजनिक विहिरीत जलस्त्रोत आटल्याने आता केवळ वाळूच दिसते. मऱ्हेगाव हे गाव चुलबंद नदीच्या काठावर असल्याने या नदीलगतच्या गावांमधील विहिरींमध्ये वाळूचे थर दिसून येते. अशा वाळवंट प्रदेश सारख्या दिसणाऱ्या या गावातील सरपंच बेंदवार यांनी गावातील पाणीटंचाईची झळ बघविली गेली नाही. त्यामुळे त्यांनी गावातील युवांना हाताशी धरून विहिरीतील वाळूत लोखंडी पाईप टाकला. त्यावर मोटारपंप बसवून पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केला. तीन तासाच्या प्रयत्नानंतर जलस्त्रोत सापडला. आज सकाळी या विहिरीवर पाणी भरणाऱ्यांची मोठी गर्दी उसळली. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता.असा केला प्रयत्न४० फूट खोल विहिरीतील जलस्त्रोत आटला. त्यामुळे एप्रिल महिन्यापासूनच विहिरी कोरड्या झाल्या असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली. ही गंभीर समस्या दिसून आल्याने बेंदवार यांनी विहिरीत १५ फूट लोखंडी पाईप वाळूत खोलवर खुपसला. त्यावर फिल्टर पंप लावून पाणी ओढले व क्षणात सर्वांचे चेहरे आनंदी झाले. ही किमया मोटरपंप सुरू केल्याने हवेच्या दाबामुळे जमिनीत खोलवर असलेले पाणी बाहेर फेकू लागले. गावकऱ्यांसाठी ही किमया एका आश्चर्यापलीकडची ठरली आहे.चुलबंद नदीकाठावरील गावांमध्ये रेतीच्या अमाप उपशामुळे भुजल स्त्रोत कमी होत आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांपुढे पाण्याची समस्या आहे. ग्रामस्थांनी केलेल्या एकजुटीच्या प्रयत्नातून पाण्याचा नवा स्त्रोत शोधण्यात यश आले- श्यामा बेंदवार, सरपंच मऱ्हेगाव.