शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात वैनगंगेचा जलस्तर घटला, पूर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 20:58 IST

भंडारा जिल्ह्यातील ५८ गावांना महापूराचा फटका बसला असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देपंधरा हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविलेकोट्यवधींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  गत दोन दिवसांपासून महापूराचा सामना करणाऱ्या नागरिकांना सोमवारची पहाट दिलासा देऊन उजाडली. सकाळपासून वैनगंगेचा जलस्तर घटण्यास सुरूवात झाली. मात्र पूरस्थिती कायम होती. पूर ओसरलेल्या गावांत उद्ध्वस्त झालेली घरे आणि चिखल असे विदारक चित्र दिसत होते. जिलह्यातील ५८ गावांना महापूराचा फटका बसला असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाच्यावतीने १४ हजार ८१३ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदत कार्य सुरूच आहे. महापुरात सुदैवाने कुणाचाही मृत्यू झाला नाही.

मध्यप्रदेशातील संजय सरोवर तसेच गोंदिया जिल्ह्यातील दोन धरणातील पाणी सोडल्याने वैनगंगा नदीसह  सुर व चुलबंद या उपनद्याही दुथडी भरून वाहत आहेत. सातत्याने जलस्तर वाढत गेल्याने शनिवारी रात्रीपासून नदी काठावरील गावांमध्ये पूराचे पाणी शिरले. विशेष म्हणजे प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येत असल्याची पुर्वसूचना वेळेवर मिळाली नसल्याने पूरस्थिती गंभीर झाली. भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर तालुक्यात ५८ गावांना महापूराचा फटका बसला. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक नागरिकांनी दोन दिवस अहोरात्र बचाव व मदत कार्य करून १४ हजार ८१३ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याले. मात्र अनेक गावांत मदत पोहचलीच नसल्याचे दिसून आले. काही गावांतील नागरिकांनी मंदिर अथवा उंच ठिकाणी आश्रय घेतला होता. अन्न आणि पाण्यावाचून त्यांना दोन दिवस काढावे लागले.भंडारा शहरातही भीषण परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी घरात पाच ते सात फुट शिरल्याने नागरिकांनी घराच्या छताचा आश्रय घेतला. शहरातील ग्रामसेवक कॉलनी, मेंढा परिसर, कपिलनगर, समतानगर, गणेशपूर, भोजापूर परिसर, आनंदनगर, शिक्षक कॉलनी, नागपूर नाका आदी भागात सोमवारीही पूर कायम होता. पूर ओसरायला लागल्याने अनेकांनी तेथून बाहेर पडण्या सुरूवात केली. तर गत दोन दिवसात सुरक्षित बाहेर काढलेल्या नागरिकांना शहरात उभारण्यात आलेल्या शिबिरात ठेवण्यात आले आहे.

आपत्ती निवारण अंतर्गत जिल्हा प्रशासनाने ३० नावा तयार ठेवल्या होत्या. तसेच पट्टीचे पोहणारे १३३ व्यक्ती मदतीला तैनात होते. यात भंडारा तालुका अंतर्गत १४ नावांची व्यवस्था करण्यात आली होती. या कामासाठी ३६ कर्मचारी तैनात करण्यात  होते. जिल्हा प्रशासनाचे जवळपास ८०० कर्मचारी मदतकार्यात गुंतले आहेत. शेती पिकांचे आणि मालमत्तेचे किती नुकसान झाले याची नेमकी माहिती सध्या उपलब्ध नाही. संपूर्ण यंत्रणा बचाव व मदतीच व्यस्त आहे.

संजय सरोवरातून आतापर्यंत २० हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशातून वैनगंगेच्या पात्रात पाणी पोहोचायला तब्बल ३९ तास लागतात. पाणी सोडल्यानंतर त्याची पूर्वकल्पना मध्यप्रदेश सरकारने दिली नाही, असे गोसेखुर्द व जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.  ५८ गावे पूर्णत: बाधितपूर परिस्थिती उदभवल्यानंतर जिल्ह्यातील नदी काठावरील ५८ गावे पूर्णत: बाधित झाली तर उर्वरित काही गावे अंशत: बाधीत झाल्याची माहिती आहे. यात भंडारा तालुक्यातील २३, पवनी २२, तुमसर पाच, मोहाडी सहा तर लाखांदूर तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नदीकाठावरील गावांना सर्वाधिक फटका बसला असून हजारो हेक्टरमधील धान शेती, बागायत शेती व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.राष्ट्रीय महामार्ग ३६ तासांपासून ठप्पमहापूरमुळे मुंबई - कोलकात राष्ट्रीय महामार्ग गत ३६ तासांपासून ठप्प आहे. भंडारा शहरालगत नागपूर नाका परिसरात आणि भिलेवाडी पुलावर चार फूट पाणी आहे. त्यामुळे हा मार्ग बंद असून वाहनांच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या आहे. वाहतूक केव्हा सुरळीत होईल हे अद्यापही निश्चित सांगण्यात आले नाही. 

टॅग्स :floodपूर