शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चौरास भागात पाण्याची पातळी घसरली

By admin | Updated: October 12, 2015 01:14 IST

चौरास भागात सध्याचे मोसम जीवघेणे ठरत आहे. १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तसेच पावसाळा ऋतूसारखा वाटला नाही.

कोंढा कोसरा : चौरास भागात सध्याचे मोसम जीवघेणे ठरत आहे. १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तसेच पावसाळा ऋतूसारखा वाटला नाही. त्यामुळे नदी, नाले, तलाव यांना पूर आले. जमिनीत पाणी साचले नसल्याने पाण्याची पातळी खोल गेली असून सिंचन सुविधा असलेले शेतकरी देखील उन्हाळी धान पिक घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्या कोंढा परिसरात पावसाळ्यात ३८ ते ४० अंश तापमान आहे. पावसाची वाट पाहून शेतकऱ्यांचे डोळे उणेमुळे तापून गेले. पण पाऊस पडत नाही. या हंगामात पाऊस अत्यल्प पडल्याने तलाव, नाले, नदी यांना पूर आले नाही. शेतात देखील दीर्घकाळ पाऊस न पडल्याने पाणी साचले नाही. म्हणून पावसाचे पाणी जमिनीत मुरलेन ाही. जमिनीची उष्णता न निघाल्याने वातावरण उन्हाळ्यासारखे वाटत आहे. सध्या सिंचन विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली असून शेतकरी कसेतरी धानाचे पीक वाचवीत आहे. पण येणाऱ्या उन्हाळ्यात पुन्हा उन्हाळी धान पिकणे अशक्य असल्याचे अनेक शेतकरी बोलत आहेत. मागील तीन वर्षापासून चौरास भागात अत्यल्प पडत असल्याने चौरास भागाचा वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी चौरास भाग सुजलाम् सुफलाम समजले जात असे. पण सध्या पाण्याची पातळी अतीशय खोल गेल्याने कृषी पंपधारक शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसते .पाण्याची पातळी खोल गेल्याने आधीच शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करणे कमी केले आहे. येणाऱ्या काळात या भागात पिण्याच्या पाण्याची देखील तीव्र समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.गोसे प्रकल्पाचे पाणी सध्या चौरास भाग समजलेल्या कोंढा येथून डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोडले जात आहे. या कालव्याचे पाणी चौरास भागातील नाले, तलाव यामध्ये तुडूंब भरून ठेवल्यास उन्हाळ्यात पाण्याची समस्या काही प्रमाणात मिटू शकते. यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी एक आराखडा तयार करून काम करणे आवश्यक आहे. कोंढा, सोमनाळा, आकोट, चिचाळ, कोसरा, सेंद्री (खु), सेंद्री (बु.), रनाळा, खैरी (तेलोता), भावड, अत्री, फनोली अशी अनेक गावे डाव्या कालव्याच्या आजूबाजूला आहेत. या गावातील तलाव पावसाचे पाणी न आल्याने भरलेले नाही. तेव्हा उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या जाणवू शकते. अशावेळी गावच्या तलावात कालव्याचे पाणी साठवून ठेवणे हा पाणी समस्येवर एक उपाय होऊ शकते. (वार्ताहर)