शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

चौरास भागात पाण्याची पातळी घसरली

By admin | Updated: October 12, 2015 01:14 IST

चौरास भागात सध्याचे मोसम जीवघेणे ठरत आहे. १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तसेच पावसाळा ऋतूसारखा वाटला नाही.

कोंढा कोसरा : चौरास भागात सध्याचे मोसम जीवघेणे ठरत आहे. १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तसेच पावसाळा ऋतूसारखा वाटला नाही. त्यामुळे नदी, नाले, तलाव यांना पूर आले. जमिनीत पाणी साचले नसल्याने पाण्याची पातळी खोल गेली असून सिंचन सुविधा असलेले शेतकरी देखील उन्हाळी धान पिक घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्या कोंढा परिसरात पावसाळ्यात ३८ ते ४० अंश तापमान आहे. पावसाची वाट पाहून शेतकऱ्यांचे डोळे उणेमुळे तापून गेले. पण पाऊस पडत नाही. या हंगामात पाऊस अत्यल्प पडल्याने तलाव, नाले, नदी यांना पूर आले नाही. शेतात देखील दीर्घकाळ पाऊस न पडल्याने पाणी साचले नाही. म्हणून पावसाचे पाणी जमिनीत मुरलेन ाही. जमिनीची उष्णता न निघाल्याने वातावरण उन्हाळ्यासारखे वाटत आहे. सध्या सिंचन विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली असून शेतकरी कसेतरी धानाचे पीक वाचवीत आहे. पण येणाऱ्या उन्हाळ्यात पुन्हा उन्हाळी धान पिकणे अशक्य असल्याचे अनेक शेतकरी बोलत आहेत. मागील तीन वर्षापासून चौरास भागात अत्यल्प पडत असल्याने चौरास भागाचा वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी चौरास भाग सुजलाम् सुफलाम समजले जात असे. पण सध्या पाण्याची पातळी अतीशय खोल गेल्याने कृषी पंपधारक शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसते .पाण्याची पातळी खोल गेल्याने आधीच शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करणे कमी केले आहे. येणाऱ्या काळात या भागात पिण्याच्या पाण्याची देखील तीव्र समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.गोसे प्रकल्पाचे पाणी सध्या चौरास भाग समजलेल्या कोंढा येथून डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोडले जात आहे. या कालव्याचे पाणी चौरास भागातील नाले, तलाव यामध्ये तुडूंब भरून ठेवल्यास उन्हाळ्यात पाण्याची समस्या काही प्रमाणात मिटू शकते. यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी एक आराखडा तयार करून काम करणे आवश्यक आहे. कोंढा, सोमनाळा, आकोट, चिचाळ, कोसरा, सेंद्री (खु), सेंद्री (बु.), रनाळा, खैरी (तेलोता), भावड, अत्री, फनोली अशी अनेक गावे डाव्या कालव्याच्या आजूबाजूला आहेत. या गावातील तलाव पावसाचे पाणी न आल्याने भरलेले नाही. तेव्हा उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या जाणवू शकते. अशावेळी गावच्या तलावात कालव्याचे पाणी साठवून ठेवणे हा पाणी समस्येवर एक उपाय होऊ शकते. (वार्ताहर)