शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

चौरास भागात पाण्याची पातळी घसरली

By admin | Updated: October 12, 2015 01:14 IST

चौरास भागात सध्याचे मोसम जीवघेणे ठरत आहे. १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तसेच पावसाळा ऋतूसारखा वाटला नाही.

कोंढा कोसरा : चौरास भागात सध्याचे मोसम जीवघेणे ठरत आहे. १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तसेच पावसाळा ऋतूसारखा वाटला नाही. त्यामुळे नदी, नाले, तलाव यांना पूर आले. जमिनीत पाणी साचले नसल्याने पाण्याची पातळी खोल गेली असून सिंचन सुविधा असलेले शेतकरी देखील उन्हाळी धान पिक घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्या कोंढा परिसरात पावसाळ्यात ३८ ते ४० अंश तापमान आहे. पावसाची वाट पाहून शेतकऱ्यांचे डोळे उणेमुळे तापून गेले. पण पाऊस पडत नाही. या हंगामात पाऊस अत्यल्प पडल्याने तलाव, नाले, नदी यांना पूर आले नाही. शेतात देखील दीर्घकाळ पाऊस न पडल्याने पाणी साचले नाही. म्हणून पावसाचे पाणी जमिनीत मुरलेन ाही. जमिनीची उष्णता न निघाल्याने वातावरण उन्हाळ्यासारखे वाटत आहे. सध्या सिंचन विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली असून शेतकरी कसेतरी धानाचे पीक वाचवीत आहे. पण येणाऱ्या उन्हाळ्यात पुन्हा उन्हाळी धान पिकणे अशक्य असल्याचे अनेक शेतकरी बोलत आहेत. मागील तीन वर्षापासून चौरास भागात अत्यल्प पडत असल्याने चौरास भागाचा वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी चौरास भाग सुजलाम् सुफलाम समजले जात असे. पण सध्या पाण्याची पातळी अतीशय खोल गेल्याने कृषी पंपधारक शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसते .पाण्याची पातळी खोल गेल्याने आधीच शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करणे कमी केले आहे. येणाऱ्या काळात या भागात पिण्याच्या पाण्याची देखील तीव्र समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.गोसे प्रकल्पाचे पाणी सध्या चौरास भाग समजलेल्या कोंढा येथून डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोडले जात आहे. या कालव्याचे पाणी चौरास भागातील नाले, तलाव यामध्ये तुडूंब भरून ठेवल्यास उन्हाळ्यात पाण्याची समस्या काही प्रमाणात मिटू शकते. यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी एक आराखडा तयार करून काम करणे आवश्यक आहे. कोंढा, सोमनाळा, आकोट, चिचाळ, कोसरा, सेंद्री (खु), सेंद्री (बु.), रनाळा, खैरी (तेलोता), भावड, अत्री, फनोली अशी अनेक गावे डाव्या कालव्याच्या आजूबाजूला आहेत. या गावातील तलाव पावसाचे पाणी न आल्याने भरलेले नाही. तेव्हा उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या जाणवू शकते. अशावेळी गावच्या तलावात कालव्याचे पाणी साठवून ठेवणे हा पाणी समस्येवर एक उपाय होऊ शकते. (वार्ताहर)