शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

चौरास भागात पाण्याची पातळी घसरली

By admin | Updated: October 12, 2015 01:14 IST

चौरास भागात सध्याचे मोसम जीवघेणे ठरत आहे. १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तसेच पावसाळा ऋतूसारखा वाटला नाही.

कोंढा कोसरा : चौरास भागात सध्याचे मोसम जीवघेणे ठरत आहे. १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तसेच पावसाळा ऋतूसारखा वाटला नाही. त्यामुळे नदी, नाले, तलाव यांना पूर आले. जमिनीत पाणी साचले नसल्याने पाण्याची पातळी खोल गेली असून सिंचन सुविधा असलेले शेतकरी देखील उन्हाळी धान पिक घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्या कोंढा परिसरात पावसाळ्यात ३८ ते ४० अंश तापमान आहे. पावसाची वाट पाहून शेतकऱ्यांचे डोळे उणेमुळे तापून गेले. पण पाऊस पडत नाही. या हंगामात पाऊस अत्यल्प पडल्याने तलाव, नाले, नदी यांना पूर आले नाही. शेतात देखील दीर्घकाळ पाऊस न पडल्याने पाणी साचले नाही. म्हणून पावसाचे पाणी जमिनीत मुरलेन ाही. जमिनीची उष्णता न निघाल्याने वातावरण उन्हाळ्यासारखे वाटत आहे. सध्या सिंचन विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली असून शेतकरी कसेतरी धानाचे पीक वाचवीत आहे. पण येणाऱ्या उन्हाळ्यात पुन्हा उन्हाळी धान पिकणे अशक्य असल्याचे अनेक शेतकरी बोलत आहेत. मागील तीन वर्षापासून चौरास भागात अत्यल्प पडत असल्याने चौरास भागाचा वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी चौरास भाग सुजलाम् सुफलाम समजले जात असे. पण सध्या पाण्याची पातळी अतीशय खोल गेल्याने कृषी पंपधारक शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसते .पाण्याची पातळी खोल गेल्याने आधीच शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करणे कमी केले आहे. येणाऱ्या काळात या भागात पिण्याच्या पाण्याची देखील तीव्र समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.गोसे प्रकल्पाचे पाणी सध्या चौरास भाग समजलेल्या कोंढा येथून डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोडले जात आहे. या कालव्याचे पाणी चौरास भागातील नाले, तलाव यामध्ये तुडूंब भरून ठेवल्यास उन्हाळ्यात पाण्याची समस्या काही प्रमाणात मिटू शकते. यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी एक आराखडा तयार करून काम करणे आवश्यक आहे. कोंढा, सोमनाळा, आकोट, चिचाळ, कोसरा, सेंद्री (खु), सेंद्री (बु.), रनाळा, खैरी (तेलोता), भावड, अत्री, फनोली अशी अनेक गावे डाव्या कालव्याच्या आजूबाजूला आहेत. या गावातील तलाव पावसाचे पाणी न आल्याने भरलेले नाही. तेव्हा उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या जाणवू शकते. अशावेळी गावच्या तलावात कालव्याचे पाणी साठवून ठेवणे हा पाणी समस्येवर एक उपाय होऊ शकते. (वार्ताहर)